शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

आष्ट्यात महिला वकिलासह कुटुंबियांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:26 IST

आष्टा : येथील खोत मळा (अमृतवाडी) येथील वर्षा शिवाजी पाटील या महिला वकिलासह सासू, दीर, जाऊ, नणंद यांना शेतातील ...

आष्टा :

येथील खोत मळा (अमृतवाडी) येथील वर्षा शिवाजी पाटील या महिला वकिलासह सासू, दीर, जाऊ, नणंद यांना शेतातील रस्त्याच्या वहिवाटीवरून तलवार, काठ्या, कोयता, कुदळीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

खोत मळा येथील शेतातील रस्ता वहिवाटीच्या कारणावरून जालिंदर सोमाजी चोरमुले व त्यांचे नातेवाईक यांच्यासोबत पाटील कुटुंबाचा वाद आहे. तहसीलदारांनी हा रस्ता खुला करून दिला आहे, तरीही चोरमुले यांनी हा रस्ता नांगरून टाकला आहे. गुरुवारी वर्षा पाटील यांच्या जाऊ धनश्री तानाजी पाटील यांना ज्योती जालिंदर चोरमुले, मंगल शहाजी नरुटे, कौशल्या चोरमुले, अंकुश चोरमुले यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार आष्टा पोलिसांत दिली होती.

शनिवारी सकाळी वर्षा पाटील यांच्यासह दीर संभाजी व तानाजी, जाऊ धनश्री व शुभांगी, कल्पना यांच्यासह सासू राजाक्का, नणंद अंजूबाई घरी होत्या. वर्षा पाटील यांची मुलगी मृणाली शाळेतून चोरमुले यांनी नांगरलेल्या वाटेने घरी येत असताना तिच्यापाठोपाठ जालिंदर चोरमुले, रवींद्र चोरमुले, कौशल्या चोरमुले, ज्योती चोरमुले, मंगल नरुटे, अंकुश चोरमुले, बाळासाहेब किसन शेळके, त्यांची दोन मुले संग्राम व किरण यांच्यासह अनोळखी २५ लोक आले. त्यांच्या हातात तलवार, काठ्या, कोयता, कुदळ होती.

त्यांनी पाटील यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कोणालाही जिवंत ठेवू नका, ठार मारून टाका, असे म्हणून घरातील साहित्याची नासधूस केली व घरातील लोकांना धमकावून बाहेर काढले. संभाजी पाटील व तानाजी पाटील अडवण्यासाठी गेले असता किरण शेळके यांनी त्यांच्या हातातील तलवारीने संभाजी पाटील यांच्या डोक्यात मारून जखमी केले. कौशल्या यांनी खांद्यावर कुदळीने मारहाण केली, तर तानाजी पाटील यांना अनोळखी लोकांनी जबरदस्तीने दारू पाजून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कल्पना पाटील यांना अंकुश चोरमुले व रवींद्र चोरमुले यांनी काठ्या व कुदळीच्या दांड्याने, तर शुभांगी व राजाक्का पाटील यांना ज्योती चोरमुले, रवींद्र चोरमुले यांनी काठीने आणि वर्षा पाटील यांना जालिंदर यांच्या पत्नी व बहिणीने काठीने मारहाण केली.

सोबत असलेल्या लोकांनी शिवीगाळ करून पुन्हा रस्त्याने गेल्यास पेटवून देण्याची धमकी दिली. या मारहाणीत संभाजी पाटील, तानाजी पाटील, शुभांगी पाटील, कल्पना पाटील, राजाक्का पाटील गंभीर जखमी झाल्या. वर्षा पाटील यांनी आष्टा पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनास्थळी इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी रात्री नऊच्या सुमारास भेट देऊन माहिती घेतली.