शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

फडणवीस, सदाभाऊंचा संप मोडण्याचा डाव...

By admin | Updated: June 4, 2017 01:15 IST

पाटील, औंधकर : इस्लामपुरात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचे षड्यंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रचल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी शनिवारी केला. शासनाच्या कृषी प्रदर्शनाचे ठेके घेणारा आरएसएसचा व सदाभाऊंचा हस्तक संदीप गिड्डे व जयाजी सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीत घुसवून शेतकऱ्यांचे आंदोलन ‘हायजॅक’करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व खोत यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला.पेठ-सांगली रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या पश्चिमेस असणाऱ्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर सकाळी बळीराजा संघटना व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, स्वामिनाथन आयोग लागू करा, अशा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री व कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना जोडे मारून त्यांचे दहन केले. बी. जी. पाटील, सुयोग औंधकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी सचिन थोरबोले, सुधीर कदम, अमोल चव्हाण, अशोक सलगर, आबासाहेब काळे, गणेश काळे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी संप मागे घेतला, अशी खोटी व फसवी घोषणा शासन करीत आहे, मात्र संप अजूनही सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांनी या खोट्या प्रचाराला बळी न पडता सावध रहावे, असे आवाहन पाटील व औंधकर यांनी केले.त्यानंतर पत्रकार बैठकीत पाटील म्हणाले की, फडणवीस आणि खोत यांनी संदीप गिड्डे व जयाजी सूर्यवंशी यांना हाताश्ी धरून कोअर कमिटी बैठकीवेळी काय बोलायचे, कशी भूमिका घ्यायची, याची प्राथमिक बोलणी करत पुणतांबा येथील आंदोलनस्थळी पाठविले. त्यानुसार या दोघांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीचा आणि बैठकीचा ताबा घेतला. बैठकीत गिड्डे व सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांच्या मूळ मागण्यांना बगल देत चर्चा घडवली. यावेळी शेतकरी प्रतिनिधी बैठकीतून बाहेर निघून गेले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्याच्या मुद्द्याशी सहमत व्हायला कोअर कमिटीला भाग पाडले. हा तपशील गिड्डे याने सोशल मीडियावर पोस्ट करून शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याची कोल्हेकुई सुरू केली.पाटील म्हणाले की, फडणवीस आणि खोत यांच्या शेतकरी संप मोडीत काढण्याच्या कृत्याची सखोल चौकशी व्हावी तसेच शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या गिड्डे व सूर्यवंशी यांच्या संपत्तीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्यांकडून समोर आलेल्या सर्व मागण्या न्याय्य आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आवश्यक आहे.विशेष अधिवेशन बोलवाबी. जी. पाटील म्हणाले की, राज्यात अराजकता माजण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे. हे अधिवेशन राज्यातील शेतकरी व जनतेसाठी खुले ठेवून मुख्यमंत्री, मंत्री व २८८ आमदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत काय बोलतात, हे कानाने ऐकता आणि डोळ्यांनी पाहता येईल. कर्जमाफीबाबत कोणाची काय भूमिका आहे, हे स्पष्ट होईल. त्यासाठी कोणाच्या मध्यस्थीची गरज भासणार नाही.