शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांचे ‘तारीख पे तारीख’

By admin | Updated: January 10, 2016 00:59 IST

‘म्हैसाळ’चे आवर्तन लांबणार : प्रशासनाची मात्र उद्यापासून वसुली मोहीम

सांगली : जिल्ह्याच्या पूर्वभागातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभदायी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सर्वमान्य तोडगा काढण्यात आला असतानाही कारखानदारांना दिलेली मुदत संपल्याने आता थकबाकी भरण्यासाठी कारखानदारांनी पुढच्या तारखेचा वायदा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, थकबाकी भरण्यासाठी कारखानदारांची चालढकल सुरू असतानाच कृष्णा खोरे प्रशासनाकडून मात्र सोमवारपासून वसुलीसाठी खास मोहीम राबविण्यात येणार आहे. मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्यातील काही भागाला म्हैसाळ योजनेच्या आवर्तनामुळे फायदा होत असून, सध्या या भागात निर्माण झालेली टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यसाठी योजनेचे आवर्तन फायद्याचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालयात या लाभक्षेत्रातील साखर कारखानदार आणि प्रशासनाची बैठक बोलाविण्यात आली होती. यात म्हैसाळ योजनेतून पाणी सुरु होण्यासाठी १४ कोटी २५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याची चर्चा झाली होती. त्यातही लाभक्षेत्रातील सांगलीचा वसंतदादा कारखाना, आरग येथील मोहनराव शिंदे कारखाना, केंपवाड येथील अथणी शुगर, कवठेमहांकाळमधील महांकाली कारखाना, जत कारखाना या कारखान्यांना त्यांच्या लाभक्षेत्रातील उसाच्या क्षेत्रावरुन थकबाकी भरण्यासाठी ‘टार्गेट’ देण्यात आले होते. या टार्गेटनुसार ५ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम कारखानदार देणार आहेत, तर उर्वरित दोन कोटींची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करुन थकबाकीच्या किमान पन्नास टक्के रक्कम भरुन योजना चालू करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. यात कारखानदारांना उद्दिष्ट देत दोन दिवसात थकबाकीची रक्कम भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवार, दि. ८ जानेवारीपर्यंत साखर कारखानदारांनी बैठकीत ठरलेली रक्कम भरणे अपेक्षित असताना, आता कारखानदारांनी चालढकल सुरू केल्याचे दिसून येत आहे. बैठकीत ठरल्यानुसार पाटबंधारे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारखान्याच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता प्रत्येकाने वेगवेगळे कारण देत सोमवारपर्यंत रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली. प्रशासनाने कारखानदारांशी संपर्क केला असता, मोहनराव शिंदे साखर कारखाना, आरग आणि जत कारखान्याच्या प्रशासनाने माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन रक्कम भरणार असल्याचे सांगितले, तर महांकाली कारखान्याने इतर कारखान्यांनी रक्कम देताच थकबाकी भरण्याची तयारी दर्शवली आहे. वसंतदादा कारखान्याने रक्कम देण्यास कोणतीही अडचण नसून वसुलीसाठी मोहीम राबविणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी दिली. कारखानदारांनी सोमवारनंतर रक्कम भरण्याबाबत विनंती केली असली तरी यामुळे म्हैसाळ योजनेचे आवर्तन मात्र लांबणार आहे. या दोन दिवसात थकबाकी भरली असती तर किमान जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तरी पाणी चालू होण्याची शक्यता होती, मात्र आता आवर्तन लांबणार आहे. रक्कम भरण्यास कोणत्याही कारखान्याने प्रतिसाद न दिल्याने योजनेचे भवितव्य या घडीला तरी अधांतरीच बनले आहे. खासदारांची भूमिका : सर्वांचे लक्ष म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या दीड महिन्यापासून थकबाकी वसुलीसाठी आणि त्यावरील तोडगा काढण्यासाठी त्यांनी बैठका घेत योजनेतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीतही त्यांनी कारखानदारांच्या प्रतिनिधींना चांगलेच दमात घेतले होते. दोन दिवसात रक्कम भरण्याचे आश्वासन देणाऱ्या कारखानदारांनी आता कारण सांगण्यास सुरुवात केल्याने खासदारांच्या आगामी भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. थकबाकीचीच अडचण टंचाई अथवा शासनाच्या इतर कोणत्या तरी योजनेतून थकबाकीची रक्कम भरली जाईल आणि म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले जाईल, ही शक्यता मात्र आता मावळली आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता, पहिल्यांदा थकबाकी भरा, मगच योजना सुरू करण्याबाबत चर्चा करुया, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितल्याने आता थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरु होणे अशक्य बनले आहे.