शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

कारखान्यांच्या संकटांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम

By admin | Updated: October 24, 2015 00:21 IST

पतंगराव कदम : ‘उदगिरी’चा गळीत हंगाम व डिस्टिलरीचा प्रारंभ

विटा : केंद्राने धोरण बदलल्यामुळे साखर कारखान्यांना मंजुरी मिळू शकत नाही. त्यामुळे आम्ही उदगिरी शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी केली. आमच्या सर्वच संस्थांचा कारभार पारदर्शक असून, जास्तीत जास्त ऊस दर देत असल्यामुळे ऊस कमी पडत नाही. मात्र, साखर कारखाने सक्षमपणे चालले पाहिजेत. साखर कारखाने अडचणीत आले तर त्याचा दूरगामी परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे मत माजी वनमंत्री व आ. डॉ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.बामणी-पारे (ता. खानापूर) येथे उदगिरी शुगरच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा प्रारंभ व ३० केएलडीपी डिस्टिलरी प्रकल्पाचे उद्घाटन आ. डॉ. कदम यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, प्रतापराव साळुंखे, आनंदराव मोहिते, रघुनाथ कदम, महेंद्र लाड उपस्थित होते.कदम म्हणाले, उदगिरी कारखाना काटकसरीने चालला असल्यामुळे कर्जाचे हप्ते वेळेत फेडून ३२ कोटी रूपये एफआरपीपेक्षा जास्त दिले आहेत. बाजारातील साखरेचे दर कमी होऊनही प्रसंगी तोटा सहन करून एफआरपी दिलेली आहे. साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर उसाला जादा दर देणे शक्य आहे. सोनहिरा व उदगिरी कारखान्यांची उपपदार्थ निर्मिती असल्यामुळेच एफआरपी देणे शक्य झाले आहे. यावेळी उपाध्यक्ष एन. एस. कदम, डी. ए. माने, प्रा. सयाजीराव पाटील, खोत, भाऊसाहेब यादव, नामदेवराव मोहिते, जयसिंगराव कदम, डॉ. जितेश कदम, सुरेश मोहिते, शहाजी पाटील, जयहिंद साळुंखे, विठ्ठलराव साळुंखे, अशोकराव साळुंखे, नितीन पवार, शशिकांत शिंदे, इंद्रजित साळुंखे, बशीर संदे, महावीर शिंदे, अभिजित शिंदे, धनाजी पाटील उपस्थित होते. बी. एन. संदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)