शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

केंद्र, राज्याच्या धरसोड वृत्तीने साखर उद्योग अडचणीत--मानसिंगराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : ऊस उद्योगाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुरु असलेल्या धरसोड वृत्तीमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. फक्त शहरी भागातील मतदार दुखावला जाऊ नये, याचाच विचार हे सरकार करत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शेतकरी वर्गाच्या विकासाच्यादृष्टीने हे सरकार मारक ठरत आहे, असे प्रतिपादन विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष ...

ठळक मुद्देभाटशिरगाव येथे विश्वासराव नाईक कारखान्याची वार्षिक सभा उत्साहात; विविध ठराव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : ऊस उद्योगाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुरु असलेल्या धरसोड वृत्तीमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. फक्त शहरी भागातील मतदार दुखावला जाऊ नये, याचाच विचार हे सरकार करत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शेतकरी वर्गाच्या विकासाच्यादृष्टीने हे सरकार मारक ठरत आहे, असे प्रतिपादन विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

ही संस्था चांगली सुरु असताना जे सभासद नाहक बदनामी करीत आहेत, अशा सभासदांवर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सभागृहात विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.प्रारंभी विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पाटील यांनी आदरांजलीचे वाचन केले, तर कार्यकारी संचालक राम पाटील यांनी नोटीस वाचन केले.

मानसिंगराव नाईक म्हणाले, केंद्र व राज्य शासनाची धोरणे शेतकºयांना मारक ठरत आहेत. साखर व इथेनॉलबाबत एक ठोस धोरण ठरविणे गरजेचे आहे. शहरातील मतदार दुखावतील, म्हणून या धोरणामध्ये सतत बदल केला जात आहे. साहजिकच यामुळे शेती व शेतकरी अडचणीत आला आहे. विश्वास साखर उद्योग हा शेतकरी सभासद यांच्या विश्वासाच्या आधारावर चालत आहे.

यावेळी सुरेश चिंचोलकर, पी. के. अण्णा पाटील, बाबू नाकील आदींनी ठराव मांडले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, दिनकरराव पाटील, अर्बन बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, सुरेशराव चव्हाण, विराज नाईक, अशोकराव पाटील, उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, बाबासाहेब पवार, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक, रोहित नाईक, राजेंद्र नाईक, दिनकर महिंद, ए. ए. पाटील, राजेंद्र लाड, पी. एस. पाटील, विवेक नाईक, डॉ. राजाराम पाटील, प्रमोद नाईक उपस्थित होते. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.