शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

साखरसम्राटांचा अनुदानावरही डोळा

By admin | Updated: October 12, 2015 00:36 IST

राजू शेट्टी : संघटना कारखानदारांचा डाव उधळणार

येळापूर : केंद्र सरकार साखर उद्योगाच्या विरोधात निर्णय घेत आहे, शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे, असे बिनबुडाचे आरोप करण्याचा अधिकार काँग्रेसवाल्यांना नाही. काँग्रेस पक्षाच्या हयातीत साखर उद्योगाला अनुदान दिलेले नाही. आजपर्यंतच्या इतिहासात एनडीए सरकारनेच हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होऊ लागले आहे. मिळणाऱ्या अनुदानावरही साखरसम्राट डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र डल्ला मारण्याचा हा डाव उधळून टाकणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी केले.एफआरपी एकरकमी मिळावी, यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात सागाव (ता. शिराळा) येथील मारुती मंदिरामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.खा. शेट्टी म्हणाले, काँग्रेसवाले लबाड आहेत. अपवाद एकदा घेतला होता, मात्र त्यावेळी काँग्रेसवाल्यांच्या दुर्दैवाने अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्यावेळीही १० टक्के इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र नंतर काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तो निर्णय रद्द केला. कारण त्यांना इथेनॉलमध्ये रस नव्हता, तर दारू करण्यामध्ये रस होता. दर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. त्याचे तुकडे पाडून देणार नसल्याचा इशारा देत शेट्टी म्हणाले, जो कारखाना ते देणार नाही,त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास केंद्र व राज्य सरकारला भाग पाडण्यासाठी एक लाख शेतकऱ्यांचे अर्ज कोल्हापूर येथे साखर संचालक यांना भव्य मोर्चाद्वारे देणार आहे व हा सूर्य आणि हा जयद्रथ हे दाखवून देणार आहे. तेथून पुढे आंदोलनाला सुरुवात करणार आहे. जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत सरकारला घाम फोडायला लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रणधीर नाईक, सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव देशमुख, तालुकाध्यक्ष राम पाटील, पी. के . पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या बैठकीस तालुका उपाध्यक्ष रवींद्र पाटील, अशोकराव दिवे, शिवलिंग शेटे, चंद्रकांत पाटील, संग्राम पवार, बाबा परीट, उद्धव पाटील, किरण गायकवाड, गिरीश पवार, भीमा शंकर, दादासाहेब पाटील, शंकर घोलप, कृष्णा पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अशोकराव दिवे यांनी केले. आभार मानसिंग पाटील यांनी मानले. (वार्ताहर)शासनाच्या इथेनॉलचा निर्णयाचे स्वागतसाखर उद्योगाबाबत एनडीए सरकारने घेतलेले निर्णय चुकलेले नाहीत. त्यांनी योग्यवेळी साखर निर्यातीचा, तसेच १० टक्के इथेनॉल मिसळण्याचा घेतलेला निर्णय आदर्शवत आहे. सरकारलाही निर्णय घ्यायला आम्ही भाग पाडले आहे. हा निर्णय आमच्या पाठपुराव्यामुळे व अट्टाहासामुळे घेतला आहे. याच्या पाठीमागे शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.