शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारिकरणाचा प्रश्न ऐरणीवर...

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

सागरेश्वर अभयारण्य : हरणांच्या जीवितास धोका

प्रताप महाडिक - कडेगाव  -यशवंतराव चव्हाण वन्यजीव सागरेश्वर अभयारण्यातील वन्य जीव धोक्यात आहे. अभयारण्य बंदिस्त नसल्यामुळे मोकाट हरणांचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू होत आहे. हरणांच्या मृत्यूची मालिका अखंडपणे सुरू आहे. याशिवाय येथील मोकाट हरणे शेतकऱ्यांची पिके फस्त करीत आहेत. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सागरेश्वर अभयारण्य ते चौरंगीनाथ निसर्ग पर्यटन केंद्रापर्यंतचा वनविभागाच्या हद्दीतील प्रदेश सागरेश्वर अभयारण्यात समाविष्ट करून संपूर्ण अभयारण्य परिसराभोवती तारेचे कुंपण करून हरणे बंदिस्त करणे गरजेचे आहे.सागरेश्वर अभयारण्य परिसरात सध्या मृत्यू होणाऱ्या हरणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यास जबाबदार कोण? हा प्रश्न अधांतरीतच आहे. तसेच मोकाट हरणांमुळे परिसरातील शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. वनविभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांची पीक नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. हरणे बंदिस्त केल्यावर ही पीक नुकसानभरपाई द्यावी लागणार नाही शिवाय कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणांचा मृत्यू होणार नाही.अन्न व पाण्याच्या शोधात बाहेर पडलेली हरणे रानोमाळ पिकांची नासाडी करतात. तरीही गांधारीची भूमिका घेतलेले शासन गप्पच आहे. सध्या या हरणांना व वन्यप्राण्यांना बंदिस्त करण्याचा खर्च जास्त आहे.माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्याच्या सभोवती ३५ किमी लांबीचे कुंपण घालण्यासाठी कोट्यवधींचा निधी गेल्या दोन वर्षांत टप्प्या-टप्प्याने दिला. ३५ किमीपैकी २७ किमी लांबीचे कुंपण झाले परंतु उर्वरित ७ किमी अंतरावरील मोकळ्या जागेतून हरणे बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या हरणांवर कुत्र्यांचा हल्ला होत आहे. यात हरणांचा मृत्यू होत आहे. मोकाट हरणे पिकांची नासाडी करीत आहेत. शासन शेतकऱ्यांना पिकांची नुकसानभरपाई देते, तिही तुटपुंजी त्यामुळे मोकाट हरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे.सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव या तीन तालुक्यांत हे अभयारण्य विस्तारले आहे. चौरंगीनाथ निसर्ग पर्यटन केंद्रापर्यंतचे वनविभागाचे क्षेत्र यात घेतल्यास सांगली, सातारा जिल्ह्यात अभयारण्याचा विस्तार होईल. यासाठी माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासह सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनी प्रयत्न करावा व शेती, शेतकरी, प्राणी यांचे होणारे नुकसान टाळावे.अभयारण्य विस्तारिकरणाचे फायदेमोकाट हरणे बंदिस्त होतीलपिकांचे नुकसान टळेलकुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका नाहीडोंगरमाथ्यावर वनसंपदा वाढेलसागरेश्वर ते चौरंगीनाथ परिसर घनदाट जंगलांनी हिरवागार होईलपर्यटकांची संख्या वाढेल.