शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

By admin | Updated: October 14, 2014 23:26 IST

२१ पर्यंत मुदतवाढ : शिक्षण मंडळाचा निर्णय

चिपळूण : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. ही निवडणूक संपूर्ण राज्यात उद्या (दि. १५) एकाच वेळी होत आहे. निवडणूक कामासाठी शिक्षकांनाही नेमण्यात आले असल्याने पुढील वर्षी फेब्रुवारी - मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. ज्युनिअर कॉलेजमधील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक काम देण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत ८ दिवसांनी वाढविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेचे अनिल देशमुख आदींसह विविध मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी संघटनांनी केली होती.  निवडणूक काळात शिक्षक कामकाजात सहभागी असल्याने याबाबतची मागणी लक्षात घेऊन माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सचिव कृष्णकांत पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे विलंब शुल्क वाचणार आहे. शिक्षण मंडळाने मागणीची दखल घेत बारावी परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करण्याची मुदत तत्काळ वाढवल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)