शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षांच्या वैधता प्रमाणपत्रासाठी डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST

कोल्हापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा संघटनांनी निवेदन दिले, यावेळी महेश चौगुले, राजू रसाळ, राजू ...

कोल्हापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा संघटनांनी निवेदन दिले, यावेळी महेश चौगुले, राजू रसाळ, राजू जाधव, वसंत देवडा आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ऑटो रिक्षांच्या वैधता दाखल्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी सांगली, सातारा व कोल्हापूरच्या रिक्षा संघटनांनी केली आहे. तसे निवेदन कोल्हापुरात विभागीय उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

रिक्षा संघटनांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले वर्षभर कोरोनाने थैमान घातले असल्याने रिक्षाचालकांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. कुटुंबासह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन सात-आठ महिने झाले तरी व्यवसायाचा सूर सापडलेला नाही.

त्यामुळे रिक्षांच्या वैधता कागदपत्रांसाठी जूनपर्यंतची म्हणजे तीन महिन्यांची मुदत योग्य नाही, त्याऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी. मोटर वाहन गटातील ऑटो रिक्षा वाहनाचे वाढीव नोंदणी शुल्क व फिटनेस विलंबास दररोज ५० रुपये दंड आकारू नये.

निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी रिक्षा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, रफिक खतीब, अरिफ शेख, मोहसीन पठाण, संभाजी ब्रिगेड रिक्षा संघटनेचे शिवाजी जाधव, रशीद शेख, राजू जाधव, विद्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायतीचे राजू रसाळ, प्रकाश चव्हाण, अजित नाईक, सुखदेव कोळी, शाहीर फडतरे, संताजी ठोंबरे, इचलकरंजीतून महाराष्ट्र रिक्षा संघटनेच्या नंदाताई साळुंके, रामचंद्र जाधव, मोहन भिसे, सुनील गायकवाड, अल्ताफ शेख, राजाराम माळगे, कोल्हापूर रिक्षा युनियन संघर्ष समितीचे राजू जाधव, सुभाष शेट्टी, महादेव विभुते, शिवाजी पाटील, कराड रिक्षा संघटनेचे वसंत देवडा, इम्रान बागवान, शौकत बागवान, सातारा रिक्षा संघटनेचे अशोक खैरमोडे, अय्याज शेख यांचा समावेश होता.

चौकट

रेल्वे, बस बंदचा फटका

रिक्षा व्यवसाय इतर मोठ्या प्रवासी वाहतुकीवर म्हणजे रेल्वे, बस, लक्झरी यांच्यावर अवलंबून आहे. त्यापैकी रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद होऊन एक वर्ष झाले आहे. मोजक्याच एक्सप्रेस रेल्वे व लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत. याचा मोठा दुष्परिणाम रिक्षा व्यवसायावर झाला आहे.