शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

रिक्षांच्या वैधता प्रमाणपत्रासाठी डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST

कोल्हापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा संघटनांनी निवेदन दिले, यावेळी महेश चौगुले, राजू रसाळ, राजू ...

कोल्हापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा संघटनांनी निवेदन दिले, यावेळी महेश चौगुले, राजू रसाळ, राजू जाधव, वसंत देवडा आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ऑटो रिक्षांच्या वैधता दाखल्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी सांगली, सातारा व कोल्हापूरच्या रिक्षा संघटनांनी केली आहे. तसे निवेदन कोल्हापुरात विभागीय उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

रिक्षा संघटनांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले वर्षभर कोरोनाने थैमान घातले असल्याने रिक्षाचालकांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. कुटुंबासह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन सात-आठ महिने झाले तरी व्यवसायाचा सूर सापडलेला नाही.

त्यामुळे रिक्षांच्या वैधता कागदपत्रांसाठी जूनपर्यंतची म्हणजे तीन महिन्यांची मुदत योग्य नाही, त्याऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी. मोटर वाहन गटातील ऑटो रिक्षा वाहनाचे वाढीव नोंदणी शुल्क व फिटनेस विलंबास दररोज ५० रुपये दंड आकारू नये.

निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी रिक्षा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, रफिक खतीब, अरिफ शेख, मोहसीन पठाण, संभाजी ब्रिगेड रिक्षा संघटनेचे शिवाजी जाधव, रशीद शेख, राजू जाधव, विद्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायतीचे राजू रसाळ, प्रकाश चव्हाण, अजित नाईक, सुखदेव कोळी, शाहीर फडतरे, संताजी ठोंबरे, इचलकरंजीतून महाराष्ट्र रिक्षा संघटनेच्या नंदाताई साळुंके, रामचंद्र जाधव, मोहन भिसे, सुनील गायकवाड, अल्ताफ शेख, राजाराम माळगे, कोल्हापूर रिक्षा युनियन संघर्ष समितीचे राजू जाधव, सुभाष शेट्टी, महादेव विभुते, शिवाजी पाटील, कराड रिक्षा संघटनेचे वसंत देवडा, इम्रान बागवान, शौकत बागवान, सातारा रिक्षा संघटनेचे अशोक खैरमोडे, अय्याज शेख यांचा समावेश होता.

चौकट

रेल्वे, बस बंदचा फटका

रिक्षा व्यवसाय इतर मोठ्या प्रवासी वाहतुकीवर म्हणजे रेल्वे, बस, लक्झरी यांच्यावर अवलंबून आहे. त्यापैकी रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद होऊन एक वर्ष झाले आहे. मोजक्याच एक्सप्रेस रेल्वे व लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत. याचा मोठा दुष्परिणाम रिक्षा व्यवसायावर झाला आहे.