शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

रिक्षांच्या वैधता प्रमाणपत्रासाठी डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST

कोल्हापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा संघटनांनी निवेदन दिले, यावेळी महेश चौगुले, राजू रसाळ, राजू ...

कोल्हापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा संघटनांनी निवेदन दिले, यावेळी महेश चौगुले, राजू रसाळ, राजू जाधव, वसंत देवडा आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ऑटो रिक्षांच्या वैधता दाखल्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी सांगली, सातारा व कोल्हापूरच्या रिक्षा संघटनांनी केली आहे. तसे निवेदन कोल्हापुरात विभागीय उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.

रिक्षा संघटनांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले वर्षभर कोरोनाने थैमान घातले असल्याने रिक्षाचालकांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. कुटुंबासह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन सात-आठ महिने झाले तरी व्यवसायाचा सूर सापडलेला नाही.

त्यामुळे रिक्षांच्या वैधता कागदपत्रांसाठी जूनपर्यंतची म्हणजे तीन महिन्यांची मुदत योग्य नाही, त्याऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी. मोटर वाहन गटातील ऑटो रिक्षा वाहनाचे वाढीव नोंदणी शुल्क व फिटनेस विलंबास दररोज ५० रुपये दंड आकारू नये.

निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी रिक्षा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, रफिक खतीब, अरिफ शेख, मोहसीन पठाण, संभाजी ब्रिगेड रिक्षा संघटनेचे शिवाजी जाधव, रशीद शेख, राजू जाधव, विद्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायतीचे राजू रसाळ, प्रकाश चव्हाण, अजित नाईक, सुखदेव कोळी, शाहीर फडतरे, संताजी ठोंबरे, इचलकरंजीतून महाराष्ट्र रिक्षा संघटनेच्या नंदाताई साळुंके, रामचंद्र जाधव, मोहन भिसे, सुनील गायकवाड, अल्ताफ शेख, राजाराम माळगे, कोल्हापूर रिक्षा युनियन संघर्ष समितीचे राजू जाधव, सुभाष शेट्टी, महादेव विभुते, शिवाजी पाटील, कराड रिक्षा संघटनेचे वसंत देवडा, इम्रान बागवान, शौकत बागवान, सातारा रिक्षा संघटनेचे अशोक खैरमोडे, अय्याज शेख यांचा समावेश होता.

चौकट

रेल्वे, बस बंदचा फटका

रिक्षा व्यवसाय इतर मोठ्या प्रवासी वाहतुकीवर म्हणजे रेल्वे, बस, लक्झरी यांच्यावर अवलंबून आहे. त्यापैकी रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद होऊन एक वर्ष झाले आहे. मोजक्याच एक्सप्रेस रेल्वे व लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत. याचा मोठा दुष्परिणाम रिक्षा व्यवसायावर झाला आहे.