शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

करुंगलीत उन्हाळ्यातही भात शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : करुंगली (ता. शिराळा) येथील शेतकरी शामराव रावजी पाटील यांनी त्यांच्या शेतात खोडवा पद्धतीने उन्हाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : करुंगली (ता. शिराळा) येथील शेतकरी शामराव रावजी पाटील यांनी त्यांच्या शेतात खोडवा पद्धतीने उन्हाळी भात पीक घेतले आहे. पाटील यांच्या या यशस्वी प्रयोगाने भात हे कोणत्याही हंगामात येणारे पीक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

शामराव पाटील हे आपली शेती आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. इतर शेतकऱ्यांच्याप्रमाणे पावसाळ्यात त्यांनी लागण पद्धतीने भात पीक केले होते. खरीप हंगामात म्हणजे पावसाळ्यात कापणी केलेल्या भात पिकाचे त्यांनी परत उन्हाळी खोडवा पद्धतीने भात पीक घेण्याचे ठरविले.

पावसाळ्यात त्यांना याच चार गुंठ्याच्या क्षेत्रात पाच मण (५ पोती) भात घेतले होते. आता खोडवा पद्धतीने केलेले उन्हाळी भात पीक देखील चांगलेच तरारून आले आहे. हे भात पीक परिसरातील शेतकऱ्यांचे सध्या लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी या पिकास पाणी व दोन-तीनवेळा खतेे दिली आहेत. सध्या हे भात पीक कापणीस आले असून, कमीत कमी चार ते पाच मण भात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोट

उन्हाळी भात पीक घेताना जंगली पक्षी मोर, लांडोर यांच्यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी शेतीची राखण करावी लागत असली,तरी पहिल्यांदाच उन्हाळी खोडवा पध्दतीने केलेला भात शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्याने समाधान वाटत आहे. चांदोली परिसरात वर्षातून एकवेळेस पावसाळी भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रयोगामुळे नवी ऊर्जा मिळेल.

- शामराव पाटील, शेतकरी, करुंगली.