शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

सांगलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:57 IST

सांगली : राज्यात भाजप सरकार कोसळल्याने व नव्याने येणाऱ्या सरकारमध्ये राष्टÑवादीचा सहभाग असल्याने मंगळवारी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा ...

सांगली : राज्यात भाजप सरकार कोसळल्याने व नव्याने येणाऱ्या सरकारमध्ये राष्टÑवादीचा सहभाग असल्याने मंगळवारी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नागरिकांना साखर वाटप करीत राष्टÑवादीच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.येथील जिल्हा कार्यालयासमोर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यकर्ते एकत्र आले. ‘राष्टÑवादीचा विजय असो’, ‘जयंत पाटील यांचा विजय असो’, अशी घोषणाबाजी करीत त्यांनी एकच जल्लोष केला. नागरिकांना साखर वाटप करण्यात आली. राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा आनंद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.यावेळी संगीता हारगे, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, योगेंद्र थोरात, स्वाती पारधी, आयुब बारगीर, संजय तोडकर, उत्तम कांबळे आब्बा, अनिता पांगम, शुभम जाधव, मनोज भिसे, ज्योती आदाटे, वंदना चंदनशिवे, राधिका हारगे, अक्षय अलकुंटे, संदीप व्हनमाने, संदीप कांबळे, आयेशा शेख, जस्विर कौर खुगरा, प्रियांका तुपलोंढे आदी उपस्थित होते.तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा जल्लोषतासगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट होताच, तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. मात्र मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला. मंगळवारी दुपारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तासगाव शहरात आतषबाजी करून जल्लोष केला.राष्टÑवादीच्या एकसंधतेचा विजयराष्टÑवादी पक्षात शरद पवार यांचा शब्द अंतिम असतो. त्यामुळे त्यांच्याशी व पक्षाशी प्रतारणा करून अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचा पराभव आणि राष्टÑवादीच्या एकसंधतेचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.