शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कोरोनाच्या फैलावाला जनता कर्फ्यूचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तासगाव शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरदिवशी तालुक्यातून १००पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तासगाव शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरदिवशी तालुक्यातून १००पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी आता पदाधिकारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय अत्यावश्यक सेवावगळता किराणा मालाची दुकाने, बेकरी यासह सर्व सेवा कडकडीत बंद करण्यात येणार आहेत. सावळज, राजापूर, जरंडी यासह अन्य गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

शुक्रवारी तासगाव नगरपालिकेत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत २ मेपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. यावेळी सकाळी एक तासातच दूध पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भाजीपाला विक्रीही एका जागेला बसून न करता घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय सेवेत अतिरिक्त रस्त्यावर नागरिक फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाला.