शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आजी-माजी सैनिकांना सर्वांनी सन्मान देणे गरजेचे - अनिल धुमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : आजी-माजी सैनिकांना सर्वांनी सन्मान देणे गरजेचे असून, त्यांच्याप्रती योग्य तो आदरभाव राखणे गरजेचे आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : आजी-माजी सैनिकांना सर्वांनी सन्मान देणे गरजेचे असून, त्यांच्याप्रती योग्य तो आदरभाव राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन निवृत्त सुभेदार मेजर व सांगली जिल्हा वाहतूक परिवहन निरीक्षक अनिल धुमाळ यांनी व्यक्त केले.

शिराळा येथे आजी-माजी सैनिक संघटना यांच्यावतीने आयोजित कारगील विजय दिनानिमित्त वीर जवान मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष सुनिता निकम, निवृत्त सुभेदार कॅप्टन रामचंद्र मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख प्रमुख उपस्थित होते.

यावेळी वाहतूक निरीक्षक अनिल धुमाळ म्हणाले, ‘‘आजी-माजी सैनिक यांना समाजात वावरत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. समाज त्यांचा योग्य तो सन्मान करत नाही. सैनिकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या असतील तर संघटनेच्या माध्यमातून कार्यरत रहावे. महाराष्ट्र सरकारने इतर राज्याप्रमाणे माजी सैनिकांना इतर सोई-सुविधा आणि आरक्षित जागा उपलब्ध करून द्याव्यात. अनेक जाचक अटींमुळे इच्छा असूनदेखील माजी सैनिक त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. या सगळ्यांसाठी सैनिक संघटना यांच्यावतीने आवाज उठवणे गरजेचे आहे.

यावेळी स्वरा पाटील, अमृत पाटील, शंकर गायकवाड, ज्योर्तिलींग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास निवृत्त सुभेदार पांडुरंग शेळके, शिवाजी इंगवले, ब्रम्हदेव पाटील, वीरचक्र विजेते, मारुती नाकील यांच्या पत्नी हिराबाई नाकील, अनिता पाटील व मान्यवर उपस्थित होते.