शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

सगळे संपावेत, हीच जयंतरावांची भावना

By admin | Updated: May 3, 2015 00:57 IST

पतंगराव कदम : महत्त्वाकांक्षेपोटी राजकारण

सांगली : जयंतराव जबरदस्त महत्त्वाकांक्षी माणूस आहे. जिल्ह्यातले सगळे मेले पाहिजेत, आपण तेवढे राहिले पाहिजे, अशी भावना ठेवून सर्वांना खेळवत ठेवायचा प्रकार ते करतात, अशी टीका काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारात दोन दिवसांपूर्वी डॉ. कदम यांच्यावर माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी टीका केली होती. त्याबाबत पतंगराव म्हणाले की, मला कुणी ‘टार्गेट’ केले तरी मी अशा गोष्टींना जुमानत नाही. वादळे अनेक झेलली आहेत. पचवलीसुद्धा आहेत. त्यामुळे माझ्याविषयी कोणी काहीही टीका केली तरी त्याला मी कधी उत्तर देत नाही. जयंतराव हे एक जबरदस्त महत्त्वाकांक्षा असणारे नेते आहेत. सर्वांनी आपल्या मर्जीप्रमाणे खेळत रहावे, असे त्यांना वाटत असते. त्यांच्या मर्जीनुसार सर्वकाळ सर्वजण खेळत राहतील, असे होणार नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला मी कधी गेलो नाही, कोणावर टीकाही केली नाही, तरीही कोणी मला टार्गेट करीत असेल, तर मला काही त्याच्याशी देणे-घेणे नाही. जिल्ह्यातील सहकाराच्या अधोगतीस संस्थेमधील कारभारीच कारणीभूत आहेत. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या आदेशामुळे शासनाला अशा सहकारी संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करणे भाग पडले. त्यावेळी मी सहकारमंत्रीही नव्हतो. त्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता मतदारच काय करायचे ते ठरवतील. कोणाला निवडून द्यायचे, कोणाच्या हाती कारभार द्यायचा, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. दुष्काळी प्रश्नावर ते म्हणाले की, लोकांच्या जिवाशी कोणी खेळ करू नये. दुष्काळाच्या विषयात राजकारण करणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांच्यासारखा देशपातळीवरील नेता दुष्काळी भागात फिरत असताना त्याला स्टंटबाजी म्हटले जात आहे. वास्तविक दुष्काळी भागातील लोकांच्या भावना समजून घेतल्यानंतर त्या संसदेत योग्य पद्धतीने मांडता येतात. त्यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधीने असे दौरे केले म्हणजे तो स्टंट नसतो. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नावरील असे राजकारण थांबवावे. आघाडी सरकारने आपत्ती व्यवस्थापनाचे चांगले काम केले होते. साडेबारा हजार कोटी रुपये मदत व पुनर्वसन खात्याने दिले. धडाडीने निर्णय आम्ही घेतले होते. संजय पाटलांच्या मी स्वप्नात आलो का? खासदार संजय पाटील यांच्याबद्दल एक अक्षरही मी बोललो नाही, तरीही मी दमबाजी केल्याचे ते सांगत आहेत. त्यांना मी स्वप्नात दिसलो का? की त्यांना माझा भास होतोय, असा सवाल पतंगरावांनी केला. (प्रतिनिधी)