शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजू शेट्टी रिंगणात येऊनही ‘स्वाभिमानी’ अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी स्वत: माजी खासदार राजू शेट्टी उसाच्या एकरकमी ...

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी स्वत: माजी खासदार राजू शेट्टी उसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा घेऊन रिंगणात उतरले आहेत. त्याची सुरुवात राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलनाने झाली आहे. मात्र कमी प्रतिसादामुळे संघटना अस्वस्थ आहे. कारण शेतकऱ्यांना दरापेक्षा ऊस घालवण्याची चिंता जास्त आहे.

शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळवून देण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगदान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक समाधानी आहे. मात्र सांगली जिह्यातील बहुतांशी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली नाही. हाच मुद्दा घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. एकीकडे या संघटनेचे विरोधक, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांनी भाजपशी सलगी केली आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपासून राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या जवळ गेले आहेत. या दोघांच्या भूमिकेने शेतकऱ्यांत उलट-सुलट चर्चा आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. यापूर्वी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन या कारखान्याने मोडित काढले आहे. वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी आहे. कोणत्याही आंदोलनावेळी राष्ट्रवादीला ऊस उत्पादकांची साथ मिळते. यंदा शेतातील ऊस गळितासाठी वेळेत जाणे, हे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे एफआरपीबाबत संघटनेच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद दिसतो. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटना अस्वस्थ आहे. संघटनेची ताकद वाढविण्यासाठी शेट्टी रिंगणात उतरले आहेत.

कोट

राजारामबापू कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे एफआरपी देण्याबाबत विलंब होत आहे. सध्या ऊसतोड होणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना सरासरी २५०० रुपये दर मिळतो. त्यामुळे आमच्या कारखान्याचे सभासद समाधानी आहेत.

आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू कारखाना

कोट

राजारामबापू कारखान्यावर आंदोलनाचे नियोजन होते. त्यापूर्वीच प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या आंदोलनात स्वत: राजू शेट्टी उतरले. पोलिसांच्या धरपकडीमुळे ऊसउत्पादक आंदोलनाकडे आले नाहीत.

- भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.