शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

राजू शेट्टी रिंगणात येऊनही ‘स्वाभिमानी’ अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी स्वत: माजी खासदार राजू शेट्टी उसाच्या एकरकमी ...

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी स्वत: माजी खासदार राजू शेट्टी उसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा घेऊन रिंगणात उतरले आहेत. त्याची सुरुवात राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलनाने झाली आहे. मात्र कमी प्रतिसादामुळे संघटना अस्वस्थ आहे. कारण शेतकऱ्यांना दरापेक्षा ऊस घालवण्याची चिंता जास्त आहे.

शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळवून देण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगदान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक समाधानी आहे. मात्र सांगली जिह्यातील बहुतांशी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली नाही. हाच मुद्दा घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. एकीकडे या संघटनेचे विरोधक, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांनी भाजपशी सलगी केली आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपासून राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या जवळ गेले आहेत. या दोघांच्या भूमिकेने शेतकऱ्यांत उलट-सुलट चर्चा आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. यापूर्वी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन या कारखान्याने मोडित काढले आहे. वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी आहे. कोणत्याही आंदोलनावेळी राष्ट्रवादीला ऊस उत्पादकांची साथ मिळते. यंदा शेतातील ऊस गळितासाठी वेळेत जाणे, हे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे एफआरपीबाबत संघटनेच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद दिसतो. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटना अस्वस्थ आहे. संघटनेची ताकद वाढविण्यासाठी शेट्टी रिंगणात उतरले आहेत.

कोट

राजारामबापू कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे एफआरपी देण्याबाबत विलंब होत आहे. सध्या ऊसतोड होणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना सरासरी २५०० रुपये दर मिळतो. त्यामुळे आमच्या कारखान्याचे सभासद समाधानी आहेत.

आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू कारखाना

कोट

राजारामबापू कारखान्यावर आंदोलनाचे नियोजन होते. त्यापूर्वीच प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या आंदोलनात स्वत: राजू शेट्टी उतरले. पोलिसांच्या धरपकडीमुळे ऊसउत्पादक आंदोलनाकडे आले नाहीत.

- भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.