शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

राजू शेट्टी रिंगणात येऊनही ‘स्वाभिमानी’ अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST

अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी स्वत: माजी खासदार राजू शेट्टी उसाच्या एकरकमी ...

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी स्वत: माजी खासदार राजू शेट्टी उसाच्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा घेऊन रिंगणात उतरले आहेत. त्याची सुरुवात राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलनाने झाली आहे. मात्र कमी प्रतिसादामुळे संघटना अस्वस्थ आहे. कारण शेतकऱ्यांना दरापेक्षा ऊस घालवण्याची चिंता जास्त आहे.

शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळवून देण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगदान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक समाधानी आहे. मात्र सांगली जिह्यातील बहुतांशी कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली नाही. हाच मुद्दा घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. एकीकडे या संघटनेचे विरोधक, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांनी भाजपशी सलगी केली आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपासून राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या जवळ गेले आहेत. या दोघांच्या भूमिकेने शेतकऱ्यांत उलट-सुलट चर्चा आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. यापूर्वी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन या कारखान्याने मोडित काढले आहे. वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी आहे. कोणत्याही आंदोलनावेळी राष्ट्रवादीला ऊस उत्पादकांची साथ मिळते. यंदा शेतातील ऊस गळितासाठी वेळेत जाणे, हे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे एफआरपीबाबत संघटनेच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद दिसतो. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटना अस्वस्थ आहे. संघटनेची ताकद वाढविण्यासाठी शेट्टी रिंगणात उतरले आहेत.

कोट

राजारामबापू कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे एफआरपी देण्याबाबत विलंब होत आहे. सध्या ऊसतोड होणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना सरासरी २५०० रुपये दर मिळतो. त्यामुळे आमच्या कारखान्याचे सभासद समाधानी आहेत.

आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू कारखाना

कोट

राजारामबापू कारखान्यावर आंदोलनाचे नियोजन होते. त्यापूर्वीच प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या आंदोलनात स्वत: राजू शेट्टी उतरले. पोलिसांच्या धरपकडीमुळे ऊसउत्पादक आंदोलनाकडे आले नाहीत.

- भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.