शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’ येऊनही आटपाडीचे तलाव कोरडेच

By admin | Updated: March 15, 2017 23:48 IST

पाणीपट्टीचा प्रश्न : परवाने, आवर्तन निश्चित नसल्याने पैसे भरण्याबाबत शेतकरी उदासीन

अविनाश बाड ल्ल आटपाडीज्या टेंभू योजनेच्या पाण्यासाठी आटपाडीकरांना गेली २५ वर्षे अविरतपणे लढा सुरू आहे, त्या योजनेचे पाणी ऐन उन्हाळ्यात आटपाडी तालुक्यात येऊनही त्याचा लोकांना लाभ होऊ शकत नाही. तालुक्यातील ८ तलावात कृष्णामाई येऊ शकत असताना, सध्या फक्त आटपाडी तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित तलाव कोरडे राहणार आहेत. सर्व तलावांमध्ये पाणी सोडले नाही, तर तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी कुठेही पावसाळ्यातसुध्दा ओढे, नाले वाहिले नाहीत. माणगंगा नदीही कोरडीच राहिली. विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत सध्या टेंभू योजना सुरू झाली आहे. या योजनेचे पाणी दि. ४ मार्चपासून आटपाडी तलावात सोडण्यात येत आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता ३०८.९७ द.ल.घ.फूट एवढी असली तर तलावात सध्या फक्त ७७.0१ द.ल.घ.फूट एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ४७ द.ल.घ.फूट एवढे पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे.टेंभू योजनेच्या पाण्याचा दर ४५ हजार रुपये प्रति द.ल.घ.फूट असा आहे. या अवाच्या सवा दरामुळे एवढे महाग पाणी तेही सध्या थेट शेतकऱ्यांच्या शेतात न दिले गेल्याने शेतकऱ्यांनी पैसे भरणे कठीण आहे. सध्या टेंभूचे पाणी फक्त ओढ्याने तालुक्यातील ८ तलावात जाऊ शकते. पण तलावातून थेट पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांना परवाने देत नाही. शिवाय ज्या ओढापात्रातून पाणी जाते, तिथल्या शेतकऱ्यांच्या विहिरीलाही फार काळ पाणी टिकत नाही. त्यामुळे हौसेने आधी ५-१0 हजार प्रत्येक विहिरीसाठी पाणीपट्टी देणारे शेतकरी आता पाणीपट्टीसाठी पैसे देण्यास असमर्थता दाखवित आहेत. त्यात टेंभू योजनेची आवर्तने ठरलेली नाहीत. आता पाणी सोडल्यानंतर पुन्हा कधी पाणी सोडण्यात येणार हे ठरलेले नाही. कोणतेही पीक घेण्यासाठी किमान ३ ते ४ महिने हमखास पाणी मिळावे लागते. टेंभूचे पाणी कधी येणार, हे अद्याप ठरलेले नसल्याने शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत नाही. यावर पाटबंधारे विभागाने तातडीने मार्ग काढणे गरजेचे आहे.हा सावळा गोंधळ कोण आणि कधी संपविणार ?पाटबंधारे विभागाने यंदा तलावातील पाणी रब्बी हंगामासाठी १६९८ रुपये द.ल.घ.फूट या दराने शेतीसाठी दिले. हे पावसाचे पाणी होते. आटपाडी तालुक्यात पाऊस कमी पडतो म्हणून शासनाचा टेंभू योजनेच्या पाण्याचा दर ४५ हजार रुपये द.ल.घ.फूट आहे. शिवाय जगात सर्वत्र शेतकऱ्याचा हंगाम यशस्वी झाल्यानंतर पाणीपट्टी घेण्याची पध्दत आहे. दुष्काळी भागासाठी केलेल्या टेंभू योजनेची पाणीपट्टी आधी भरावी लागत आहे. त्यामुळे यंदा केवळ आटपाडी तलावातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांनी २0 लाख रुपये आधी भरले. इतरत्र कुणीच पैसे दिले नाहीत. म्हणून शेतकऱ्यांच्या नावाने शिमगा करणे योग्य आहे काय? हा सावळागोंधळ कोण आणि कधी संपविणार? हा प्रश्न आहे.