शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इथेनॉल निर्मितीमधून शेतकऱ्यांचे हित जपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

इस्लामपूर : साखर कारखानदारी अडचणीच्या काळातून जात आहे. अशावेळी फायदेशीर ठरणाऱ्या उपपदार्थांची निर्मिती महत्त्वाची ठरते. इथेनॉल निर्मिती ...

इस्लामपूर : साखर कारखानदारी अडचणीच्या काळातून जात आहे. अशावेळी फायदेशीर ठरणाऱ्या उपपदार्थांची निर्मिती महत्त्वाची ठरते. इथेनॉल निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यातून साखर कारखान्यांना दिलासा मिळू शकतो. साखराळे युनिटमध्ये दिवसाला ७८ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार असून वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये दिवसाला १ लाख ५० हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारला जाईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.

राजारामबापू साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा पाटील यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, अतिरित साखर उत्पादन हा साखर उद्योगासमोरील मोठा प्रश्न आहे. साखर विकल्यावर पैसे मिळणार. तोपर्यंत प्रत्येक पोत्यास २५० ते २७५ रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बसतो. एफआरपी १४ दिवसांच्या आत देणे कायद्याने बंधनकारक आहे. इथेनॉल ऑईल कंपनीस विकल्यावर १५ दिवसात पैसे मिळू शकतात.

पी. आर. पाटील म्हणाले, एक क्विंटल साखर तयार करायला ३३५० रुपये खर्च येत असून साखरेचा दर ३१०० रुपये आहे. क्विंटलला २५० चा घाटा आहे. साखरेचे उत्पादन वाढले, मात्र खप नाही. आपणास डिसेंबर महिन्यात १ लाख ७५ हजार क्विंटल साखर विक्रीचा कोटा मिळाला. मात्र त्यातील केवळ ६५ हजार क्विंटल साखरच विकली गेली आहे. साखरेला ३५०० रुपये दर मिळावा, ही आपली मागणी आहे. केंद्र सरकारने ३३०० चा दर जुलै महिन्यात जाहीर केला. अद्याप त्याची कार्यवाही नाही. एकरकमी एफआरपी देणे अडचणीचे झाले आहे. केंद्राकडून ९२ कोटी रुपयांचे येणे आहे.

कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सभापती शुभांगी पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, अरुण कांबळे, छायाताई पाटील, सुस्मिता जाधव, शहाजी पाटील उपस्थित होते.

विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी- ३११२२०२०-आयएसएलएम-राजारामबापू न्यूज : राजारामबापू कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या प्रारंभ कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, प्रा. शामराव पाटील, अविनाश पाटील, सभापती शुभांगी पाटील उपस्थित होत्या.