शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

इथेनॉल निर्मितीमधून शेतकऱ्यांचे हित जपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

इस्लामपूर : साखर कारखानदारी अडचणीच्या काळातून जात आहे. अशावेळी फायदेशीर ठरणाऱ्या उपपदार्थांची निर्मिती महत्त्वाची ठरते. इथेनॉल निर्मिती ...

इस्लामपूर : साखर कारखानदारी अडचणीच्या काळातून जात आहे. अशावेळी फायदेशीर ठरणाऱ्या उपपदार्थांची निर्मिती महत्त्वाची ठरते. इथेनॉल निर्मिती प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यातून साखर कारखान्यांना दिलासा मिळू शकतो. साखराळे युनिटमध्ये दिवसाला ७८ हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली जाणार असून वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये दिवसाला १ लाख ५० हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारला जाईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.

राजारामबापू साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा पाटील यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, अतिरित साखर उत्पादन हा साखर उद्योगासमोरील मोठा प्रश्न आहे. साखर विकल्यावर पैसे मिळणार. तोपर्यंत प्रत्येक पोत्यास २५० ते २७५ रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बसतो. एफआरपी १४ दिवसांच्या आत देणे कायद्याने बंधनकारक आहे. इथेनॉल ऑईल कंपनीस विकल्यावर १५ दिवसात पैसे मिळू शकतात.

पी. आर. पाटील म्हणाले, एक क्विंटल साखर तयार करायला ३३५० रुपये खर्च येत असून साखरेचा दर ३१०० रुपये आहे. क्विंटलला २५० चा घाटा आहे. साखरेचे उत्पादन वाढले, मात्र खप नाही. आपणास डिसेंबर महिन्यात १ लाख ७५ हजार क्विंटल साखर विक्रीचा कोटा मिळाला. मात्र त्यातील केवळ ६५ हजार क्विंटल साखरच विकली गेली आहे. साखरेला ३५०० रुपये दर मिळावा, ही आपली मागणी आहे. केंद्र सरकारने ३३०० चा दर जुलै महिन्यात जाहीर केला. अद्याप त्याची कार्यवाही नाही. एकरकमी एफआरपी देणे अडचणीचे झाले आहे. केंद्राकडून ९२ कोटी रुपयांचे येणे आहे.

कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सभापती शुभांगी पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, अरुण कांबळे, छायाताई पाटील, सुस्मिता जाधव, शहाजी पाटील उपस्थित होते.

विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळी- ३११२२०२०-आयएसएलएम-राजारामबापू न्यूज : राजारामबापू कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या प्रारंभ कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, प्रा. शामराव पाटील, अविनाश पाटील, सभापती शुभांगी पाटील उपस्थित होत्या.