शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासासाठी व्हिजन सांगली फोरमची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:23 IST

सांगली : विविध क्षेत्रांत जिल्ह्याने वेगळी ओळख निर्माण केली. जिल्हा २०३५ मध्ये अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. तत्पूर्वी जिल्ह्याच्या विकासाचा ...

सांगली : विविध क्षेत्रांत जिल्ह्याने वेगळी ओळख निर्माण केली. जिल्हा २०३५ मध्ये अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. तत्पूर्वी जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा ‘व्हिजन सांगली ॲट ७५’ हा फोरम स्थापन केल्याची माहिती समन्वयक माजी महापौर सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, कृषी, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, सहकार, राजकारण या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेऊन आराखडा तयार करावा लागेल. त्यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. सर्व समाजघटकांच्या अपेक्षा विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत पीडब्ल्यूसी, मेकेन्झी अशा नामवंत कंपन्यांकडून विकास आराखडा तयार करून घेतला जाईल. पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन हाती घेतले आहे. पुढील १५ वर्षांमध्ये आराखड्यानुसार विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल. जागतिक बँक, नाबार्ड, केंद्र व राज्य शासन, खासगी संस्था आदी माध्यमातून निधी उभारण्याचाही प्रयत्न आहे.

या फोरममध्ये आटपाडी येथील अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे सचिव आनंदराव पाटील, विट्याचे बाबासाहेब मुळीक, भारती विद्यापीठाचे डॉ. हणमंतराव कदम, पलूसचे श्रीपाद चितळे, मिरज मिशन हॉस्पिटलचे डॉ. नथानियल ससे, उद्योजक दीपक शिंदे-म्हैसाळकर, राजाराम सॉल्व्हेक्सचे कार्डिले, दिनकर नायकवडी, सचिन संख, सुभाष आर्वे, टूरिझम ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, दिल्ली येथील ऋषभ सावनसुखा यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.