शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

जिल्ह्याच्या विकासासाठी व्हिजन सांगली फोरमची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:23 IST

सांगली : विविध क्षेत्रांत जिल्ह्याने वेगळी ओळख निर्माण केली. जिल्हा २०३५ मध्ये अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. तत्पूर्वी जिल्ह्याच्या विकासाचा ...

सांगली : विविध क्षेत्रांत जिल्ह्याने वेगळी ओळख निर्माण केली. जिल्हा २०३५ मध्ये अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. तत्पूर्वी जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा ‘व्हिजन सांगली ॲट ७५’ हा फोरम स्थापन केल्याची माहिती समन्वयक माजी महापौर सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले, कृषी, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, सहकार, राजकारण या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेऊन आराखडा तयार करावा लागेल. त्यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. सर्व समाजघटकांच्या अपेक्षा विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत पीडब्ल्यूसी, मेकेन्झी अशा नामवंत कंपन्यांकडून विकास आराखडा तयार करून घेतला जाईल. पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन हाती घेतले आहे. पुढील १५ वर्षांमध्ये आराखड्यानुसार विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल. जागतिक बँक, नाबार्ड, केंद्र व राज्य शासन, खासगी संस्था आदी माध्यमातून निधी उभारण्याचाही प्रयत्न आहे.

या फोरममध्ये आटपाडी येथील अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे सचिव आनंदराव पाटील, विट्याचे बाबासाहेब मुळीक, भारती विद्यापीठाचे डॉ. हणमंतराव कदम, पलूसचे श्रीपाद चितळे, मिरज मिशन हॉस्पिटलचे डॉ. नथानियल ससे, उद्योजक दीपक शिंदे-म्हैसाळकर, राजाराम सॉल्व्हेक्सचे कार्डिले, दिनकर नायकवडी, सचिन संख, सुभाष आर्वे, टूरिझम ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, दिल्ली येथील ऋषभ सावनसुखा यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.