शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

देशभरातील पुरोगामी संघटनांची संयुक्त शिखर समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

सांगली : पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या विविध संघटनांची जिल्हा सेवा समिती नावाने शिखर संघटना स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्र ...

सांगली : पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या विविध संघटनांची जिल्हा सेवा समिती नावाने शिखर संघटना स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत निर्णय झाला. हिंदी भाषिक नसलेल्या डझनभर राज्यांतील १७८ जिल्ह्यांमध्ये चार महिन्यांत शाखा स्थापना केल्या जातील.

बैठकीला ज्येष्ठ विचारवंत डाॅ. बाबूराव गुरव, व्ही. वाय. पाटील, ॲड. सुभाष पाटील, विजयकुमार जोखे, गौतमीपुत्र कांबळे आदी उपस्थित होते.

डॉ. देवी पत्रकार बैठकीत म्हणाले की, डाव्या विचारसरणीचे पक्ष समितीमध्ये सहभागी असतील. राजकीय पक्षांनाही झेंडे मागे ठेवून प्रवेश असेल. देशात सध्या संघराज्याच्या उद्दिष्टाला धक्का पोहोचविणारी कृत्ये सत्ताधारी पक्ष करत आहेत. त्याला एकगठ्ठा ताकदीने विरोधाचे काम समिती करेल. महाराष्ट्रासह केरळ, पुद्दुचेरी, अंदमान, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांतील जिल्ह्यांत समितीचे काम चालेल. सर्वात पहिली समिती सांगलीत शुक्रवारी स्थापन केली. समितीला कोणीही नेता किंवा अनुयायी नाही. नव्या केंद्रीय कायद्यांना समितीचा कडाडून विरोध असेल.

बैठकीला डॉ. लता देशपांडे, डॉ. संजय पाटील, सदाशिव मगदूम, विकास मगदूम, बाळासाहेब पाटील, प्रा. सर्जेराव गायकवाड, कृष्णा पाटील, तृप्ती लव्हटे, विद्या स्वामी, मुनीर मुल्ला, तोहीद शेख हेदेखील उपस्थित होते.

चौकट

पहिली बैठक २३ जानेवारीला सांगलीत

शिखऱ समितीची पहिली बैठक सांगलीत २३ जानेवारीला होणार असल्याचे डॉ. देवी म्हणाले. दक्षिणी राज्यांतून प्रतिनिधी उपस्थित राहतील.

चौकट

काॅर्पोरेट उद्योगांकडून सरकारचा ताबा

डॉ. देवी म्हणाले, काॅर्पोरेट उद्योगांनी सरकारचा ताबा घेतला आहे. त्याविरोधात जनतेलाच पुढे यावे लागेल. घटनेत अभिप्रेत लोकशाही टिकविण्यासाठी समितीला पाठबळ द्यावे. राज्यांचे अधिकार कमी होऊन केंद्राचे वाढू नयेत यासाठी समिती संघर्ष करेल.

चौकट

आमदार खरेदीला ६० कोटी मिळतात...

एक देश, एक निवडणूक धोरणाला विरोध असल्याचे सांगून डॉ. देवी म्हणाले, सत्ताधारी पक्ष कर्नाटकात आमदार खरेदीसाठी ६० कोटी रुपये उधळतो, मग वेगवेगळ्या निवडणुकांमुळे खर्च वाढतो असे म्हणणे ढोंगीपणाचे आहे. या पद्धतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचा भंग होईल.

----------------

-----------