शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पर्यावरणपूरक रक्षाविसर्जन आणि पक्षी संवर्धन एकाच वेळी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:29 IST

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : एखाद्या व्यक्तीने कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांची रक्षा पाण्यामध्ये विसर्जित केली जाते. ...

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : एखाद्या व्यक्तीने कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांची रक्षा पाण्यामध्ये विसर्जित केली जाते. मात्र भटवाडी (ता. शिराळा) येथे सर्वच ग्रामस्थ घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर रक्षा झाडांना देतात. त्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून येथील स्मशानभूमीच्या परिसरात खडकाळ माळरानावर विविध प्रकारची झाडे लावली आहेत. रक्षाविसर्जनाची राख ओढ्यात, शेतात अथवा नदीत न सोडता ती प्रत्येक झाडाला घातली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये या परिसरात पक्षांचा किलबिलाट वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक रक्षाविसर्जनासह पक्षी संवर्धन चळवळीलाही बळ मिळत आहे.

शिराळा औद्योगिक वसाहतीनजीक असणारे भटवाडी हे एक लहानसे, पण कर्तृत्वाने मोठे असणारे गाव. युवा सरपंच विजय महाडिक यांनी लोकसहभागातून गावात अनेक उपक्रम राबविले आहेत.

‘चिमणी-पाखरांनो या... चारा खा, पाणी प्या. निवांत झाडावर बसून जीवन गाणे गा. अन् भुर्रर्र उडून जा’ असा अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रम येथील ग्रामस्थांनी हाती घेतला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून येथील स्मशानभूमीच्या परिसरात खडकाळ माळरानावर विविध प्रकारची झाडे लावली आहेत. रक्षाविसर्जनाची राख ओढ्यात, शेतात अथवा नदीत न सोडता ती प्रत्येक झाडाला घातली जाते. झाडांना पाणी घालण्यासाठी स्वतंत्र छोटी पाईपलाईन केली आहे. दररोज पाणी घालण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. कडक उन्हामुळे झाडांना पाणी कमी पडू नये, म्हणून बुंध्याला मडकी ठेवली आहेत. त्यात दररोज पाणी सोडले जाते. झाडांची चांगल्या प्रकारे वाढ झाल्याने त्या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. येणाऱ्या पक्षांना चारा पाणी मिळावे, यासाठी येथे दररोज धान्य टाकले जाते. त्यांना पाणी मिळावे, म्हणून मडकी व अंघोळ करण्यासाठी मोठा पाण्याने भरलेला डबाही ठेवला आहे.

रक्षाविसर्जन विधीसह, प्रत्येक सणाला व वर्षश्रद्धाला नैवैद्य ठेवला जातो. त्यामुळे पक्षांना मुबलक खायला मिळते. इतर वेळी त्यांच्या खाण्याची कुचंबणा होऊ नये, म्हणून तांदूळ, ज्वारी, गहू असे धान्य त्या ठिकाणी ठेवले जाते. त्यामुळे या परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड दिल्याने भटवाडी गावात एक आदर्शवत काम उभे राहत आहे.