शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश: राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:21 IST

सांगली : विकासाच्या नावावर जे काही प्रकल्प आता येत आहेत, त्यातून विकास होतोय की पर्यावरणाची हानी, याचा शांतपणे विचार ...

सांगली : विकासाच्या नावावर जे काही प्रकल्प आता येत आहेत, त्यातून विकास होतोय की पर्यावरणाची हानी, याचा शांतपणे विचार करायला हवा. विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश योग्य नाही, असे स्पष्ट मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सांगलीत आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात ‘जलसंवर्धन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य भास्कर ताम्हनकर, किशोर पंडित, विलास चौथाई उपस्थित होते.राणा म्हणाले की, पर्यावरणावर आपले जीवन अवलंबून आहे, याचे भान प्रत्येकाने प्रत्येक कृती करताना ठेवले पाहिजे. पर्यावरणास हानी न पोहोचविता विधायक उपक्रम राबविले पाहिजेत. ‘जागतिक तापमान वाढ’ हा विषय गंभीर बनला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी व तिच्या योग्य देखभालीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व काही सरकार करेल, अशी मानसिकता बदलायला हवी. लोकांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. समाजात सकारात्मक बदल व्हावा, असे वाटत असेल तर, प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी.राजस्थान येथे जनसहभागाच्या मदतीने आम्ही हजारो जोहड म्हणजेच कच्चे तलाव निर्माण केले आहेत. तलावांमध्ये पावसाच्या पाण्याचे संकलन झाले. परिणामी परिसरातील दीड लाखाहून अधिक विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. देशात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. त्यामुळे पाण्याविषयी अधिक काळजी घ्यावी लागेल. पाणी वाचविणे व पाण्याचे स्रोत निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. दैनंदिन जीवनातही आपण पाण्याचा गैरवापर करण्यात आघाडीवर आहोत. कोणत्याही परिस्थितीत या गोष्टी रोखायला हव्यात. पाणी नियोजनाचे महत्त्व प्रत्येकाने समजून त्यानुसारच वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.मूलभूत प्रश्नांपेक्षा धर्म-जातीत अडकलो!मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आपण धर्म आणि जातीच्या राजकारणात गुंतून पडत आहोत. समाजातील एकता महत्त्वाची आहे. समाज एकवटून अनेक चांगली व पर्यावरणासाठी पोषक कामे करता येतात. लोकसहभागातून राजस्थानातील बारा मृत नद्या आम्ही जिवंत केल्या आहेत. आज त्यांचा लाभ ग्रामस्थांनाच होत आहे, असे राणा म्हणाले.देश पाणीदार बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज..!राणा म्हणाले की, लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याप्रमाणात पाणीसाठे वाढत नाहीत. लोकांमध्ये अजूनही ‘आम्हाला काय त्याचे’ असाच विचार करण्याची वृत्ती कायम आहे. असा विचार घातक आहे. भविष्यात पाणीसंकट टाळायचे असेल तर, सर्वांनीच पुढाकार घेऊन देश पाणीदार बनविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.