शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश: राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:21 IST

सांगली : विकासाच्या नावावर जे काही प्रकल्प आता येत आहेत, त्यातून विकास होतोय की पर्यावरणाची हानी, याचा शांतपणे विचार ...

सांगली : विकासाच्या नावावर जे काही प्रकल्प आता येत आहेत, त्यातून विकास होतोय की पर्यावरणाची हानी, याचा शांतपणे विचार करायला हवा. विकासाच्या नावावर पर्यावरणाचा नाश योग्य नाही, असे स्पष्ट मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सांगलीत आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात ‘जलसंवर्धन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य भास्कर ताम्हनकर, किशोर पंडित, विलास चौथाई उपस्थित होते.राणा म्हणाले की, पर्यावरणावर आपले जीवन अवलंबून आहे, याचे भान प्रत्येकाने प्रत्येक कृती करताना ठेवले पाहिजे. पर्यावरणास हानी न पोहोचविता विधायक उपक्रम राबविले पाहिजेत. ‘जागतिक तापमान वाढ’ हा विषय गंभीर बनला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी व तिच्या योग्य देखभालीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व काही सरकार करेल, अशी मानसिकता बदलायला हवी. लोकांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. समाजात सकारात्मक बदल व्हावा, असे वाटत असेल तर, प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी.राजस्थान येथे जनसहभागाच्या मदतीने आम्ही हजारो जोहड म्हणजेच कच्चे तलाव निर्माण केले आहेत. तलावांमध्ये पावसाच्या पाण्याचे संकलन झाले. परिणामी परिसरातील दीड लाखाहून अधिक विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. देशात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. त्यामुळे पाण्याविषयी अधिक काळजी घ्यावी लागेल. पाणी वाचविणे व पाण्याचे स्रोत निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. दैनंदिन जीवनातही आपण पाण्याचा गैरवापर करण्यात आघाडीवर आहोत. कोणत्याही परिस्थितीत या गोष्टी रोखायला हव्यात. पाणी नियोजनाचे महत्त्व प्रत्येकाने समजून त्यानुसारच वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.मूलभूत प्रश्नांपेक्षा धर्म-जातीत अडकलो!मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आपण धर्म आणि जातीच्या राजकारणात गुंतून पडत आहोत. समाजातील एकता महत्त्वाची आहे. समाज एकवटून अनेक चांगली व पर्यावरणासाठी पोषक कामे करता येतात. लोकसहभागातून राजस्थानातील बारा मृत नद्या आम्ही जिवंत केल्या आहेत. आज त्यांचा लाभ ग्रामस्थांनाच होत आहे, असे राणा म्हणाले.देश पाणीदार बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज..!राणा म्हणाले की, लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याप्रमाणात पाणीसाठे वाढत नाहीत. लोकांमध्ये अजूनही ‘आम्हाला काय त्याचे’ असाच विचार करण्याची वृत्ती कायम आहे. असा विचार घातक आहे. भविष्यात पाणीसंकट टाळायचे असेल तर, सर्वांनीच पुढाकार घेऊन देश पाणीदार बनविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.