शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

डाळिंब बागांसाठी उद्योजक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 00:32 IST

शेततळ्यातून मोफत पाणी : वाळेखिंडीत हिंगमिरे, जमादार यांचा उपक्रम

भागवत काटकर- शेगाव--दुष्काळाच्या तीव्रतेत दिसेंदिवस वाढ होत आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी जिवापाड जपल्या आहेत. वाळेखिंडी (ता. जत) येथे पाण्याची पातळी ८०० ते १००० फुटांपर्यंत गेली आहे. डाळिंब बागा जगविण्यासाठी बोेअरवेल खोदूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांपुढे डाळिंब बागा जगविण्याचे आव्हान होते. गावाच्या दक्षिणेला उद्योजक महादेव हिंगमिरे व इकबाल जमादार यांनी मोठे शेततळे खोदले आहे. या तलावातील पाणी त्यांनी डाळिंब बागा जगविण्यासाठी व जनावरांना पाण्यासाठी सर्वांना खुले करून मोफत पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे वाळेखिंडीतील डाळिंब बागांना जीवदान मिळणार आहे. उद्योजक हिंगमिरे व जमादार यंच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई तर आहेच, शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणारे डाळिंब क्षेत्रही वाढत आहे. मात्र पाण्याची पातळी खालावल्याने डाळिंब बागा वाचावयाच्या कशा? या काळजीत येथील शेतकरी होते. हिंगमिरे व जमादार यांनी शेतकऱ्यांना शेतातील शेततलाव खुले केले आहे. सर्वत्र शेतकऱ्यांना या तलावातून पाणी बागांना देण्यासाठी उपलब्ध केले आहे. या तलावातून पाण्याचे काही छोटे टॅँकरही लोकांना पिण्यासाठी उपलब्ध होत आहेत. रोज सुमारे १ लाख लिटर पाणी बागा व पिण्यासाठी उपलब्ध होत आहे. परिसरातील जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत आहे. बागा वाचविण्यासाठी १० कि. मी. अंतरावर असणाऱ्या कोसारी येथील तलावातून शेतकऱ्यांना पाणी आणावे लागत होते. आता हे अंतर तर वाचलेच आहे. शिवाय खर्चात बचतही झाली आहे.पाणी काटकसरीने वापरामहाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कार्यरत नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. शेततलावात पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी डाळिंब बागा वाचविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी उपलब्ध व्हावे, ही तळमळ आहे. बोअरवेलला जादा ताण न देता शिल्लक राहिलेले थोडे थोडे पाणी एका शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यांना दिले, तरच डाळिंब बागा व पशुधन वाचेल. शेतकऱ्यांनीही एकमेकांना सहकार्य केले, तरच शेती व शेतकरी उद्ध्वस्त न होता टिकेल. सहा महिने पावसाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे जरुरीचे आहे, असे मत उद्योजक, महादेव हिंगमिरे, इकबाल जमादार यांनी व्यक्त केले.