शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

डाळिंब बागांसाठी उद्योजक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 00:32 IST

शेततळ्यातून मोफत पाणी : वाळेखिंडीत हिंगमिरे, जमादार यांचा उपक्रम

भागवत काटकर- शेगाव--दुष्काळाच्या तीव्रतेत दिसेंदिवस वाढ होत आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी जिवापाड जपल्या आहेत. वाळेखिंडी (ता. जत) येथे पाण्याची पातळी ८०० ते १००० फुटांपर्यंत गेली आहे. डाळिंब बागा जगविण्यासाठी बोेअरवेल खोदूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांपुढे डाळिंब बागा जगविण्याचे आव्हान होते. गावाच्या दक्षिणेला उद्योजक महादेव हिंगमिरे व इकबाल जमादार यांनी मोठे शेततळे खोदले आहे. या तलावातील पाणी त्यांनी डाळिंब बागा जगविण्यासाठी व जनावरांना पाण्यासाठी सर्वांना खुले करून मोफत पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे वाळेखिंडीतील डाळिंब बागांना जीवदान मिळणार आहे. उद्योजक हिंगमिरे व जमादार यंच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई तर आहेच, शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणारे डाळिंब क्षेत्रही वाढत आहे. मात्र पाण्याची पातळी खालावल्याने डाळिंब बागा वाचावयाच्या कशा? या काळजीत येथील शेतकरी होते. हिंगमिरे व जमादार यांनी शेतकऱ्यांना शेतातील शेततलाव खुले केले आहे. सर्वत्र शेतकऱ्यांना या तलावातून पाणी बागांना देण्यासाठी उपलब्ध केले आहे. या तलावातून पाण्याचे काही छोटे टॅँकरही लोकांना पिण्यासाठी उपलब्ध होत आहेत. रोज सुमारे १ लाख लिटर पाणी बागा व पिण्यासाठी उपलब्ध होत आहे. परिसरातील जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत आहे. बागा वाचविण्यासाठी १० कि. मी. अंतरावर असणाऱ्या कोसारी येथील तलावातून शेतकऱ्यांना पाणी आणावे लागत होते. आता हे अंतर तर वाचलेच आहे. शिवाय खर्चात बचतही झाली आहे.पाणी काटकसरीने वापरामहाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कार्यरत नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. शेततलावात पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी डाळिंब बागा वाचविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी उपलब्ध व्हावे, ही तळमळ आहे. बोअरवेलला जादा ताण न देता शिल्लक राहिलेले थोडे थोडे पाणी एका शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यांना दिले, तरच डाळिंब बागा व पशुधन वाचेल. शेतकऱ्यांनीही एकमेकांना सहकार्य केले, तरच शेती व शेतकरी उद्ध्वस्त न होता टिकेल. सहा महिने पावसाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे जरुरीचे आहे, असे मत उद्योजक, महादेव हिंगमिरे, इकबाल जमादार यांनी व्यक्त केले.