शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

डाळिंब बागांसाठी उद्योजक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 00:32 IST

शेततळ्यातून मोफत पाणी : वाळेखिंडीत हिंगमिरे, जमादार यांचा उपक्रम

भागवत काटकर- शेगाव--दुष्काळाच्या तीव्रतेत दिसेंदिवस वाढ होत आहे. लाखो रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी जिवापाड जपल्या आहेत. वाळेखिंडी (ता. जत) येथे पाण्याची पातळी ८०० ते १००० फुटांपर्यंत गेली आहे. डाळिंब बागा जगविण्यासाठी बोेअरवेल खोदूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांपुढे डाळिंब बागा जगविण्याचे आव्हान होते. गावाच्या दक्षिणेला उद्योजक महादेव हिंगमिरे व इकबाल जमादार यांनी मोठे शेततळे खोदले आहे. या तलावातील पाणी त्यांनी डाळिंब बागा जगविण्यासाठी व जनावरांना पाण्यासाठी सर्वांना खुले करून मोफत पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे वाळेखिंडीतील डाळिंब बागांना जीवदान मिळणार आहे. उद्योजक हिंगमिरे व जमादार यंच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई तर आहेच, शिवाय शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणारे डाळिंब क्षेत्रही वाढत आहे. मात्र पाण्याची पातळी खालावल्याने डाळिंब बागा वाचावयाच्या कशा? या काळजीत येथील शेतकरी होते. हिंगमिरे व जमादार यांनी शेतकऱ्यांना शेतातील शेततलाव खुले केले आहे. सर्वत्र शेतकऱ्यांना या तलावातून पाणी बागांना देण्यासाठी उपलब्ध केले आहे. या तलावातून पाण्याचे काही छोटे टॅँकरही लोकांना पिण्यासाठी उपलब्ध होत आहेत. रोज सुमारे १ लाख लिटर पाणी बागा व पिण्यासाठी उपलब्ध होत आहे. परिसरातील जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळत आहे. बागा वाचविण्यासाठी १० कि. मी. अंतरावर असणाऱ्या कोसारी येथील तलावातून शेतकऱ्यांना पाणी आणावे लागत होते. आता हे अंतर तर वाचलेच आहे. शिवाय खर्चात बचतही झाली आहे.पाणी काटकसरीने वापरामहाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कार्यरत नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. शेततलावात पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी डाळिंब बागा वाचविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी उपलब्ध व्हावे, ही तळमळ आहे. बोअरवेलला जादा ताण न देता शिल्लक राहिलेले थोडे थोडे पाणी एका शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यांना दिले, तरच डाळिंब बागा व पशुधन वाचेल. शेतकऱ्यांनीही एकमेकांना सहकार्य केले, तरच शेती व शेतकरी उद्ध्वस्त न होता टिकेल. सहा महिने पावसाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे जरुरीचे आहे, असे मत उद्योजक, महादेव हिंगमिरे, इकबाल जमादार यांनी व्यक्त केले.