शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

खानापूरचे प्रवेशद्वार अन् बुरूज नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST

खानापूर गावाची स्थापना अकराव्या शतकापूर्वी भुईकोट किल्ला स्वरूपात झाली. तत्कालीन यादव राजवटीत गावाच्या तटबंदीचे, सोळा बुरूजांचे व मुख्य प्रवेशद्वाराचे ...

खानापूर गावाची स्थापना अकराव्या शतकापूर्वी भुईकोट किल्ला स्वरूपात झाली. तत्कालीन यादव राजवटीत गावाच्या तटबंदीचे, सोळा बुरूजांचे व मुख्य प्रवेशद्वाराचे (वेस) काम पूर्ण झाले. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खानापूर येथील तटबंदीची व बुरूजांची आतापर्यंत पूर्ण पडझड झाली आहे. सध्या केवळ मुख्य प्रवेशद्वार व त्याचे संरक्षण करण्यासाठी बांधलेला मातीचा बुरूज अस्तित्वात आहे.

ऐतिहासिक प्रवेशद्वार व बुरूजही शेवटची घटका मोजत आहे. गेली नऊशे वर्षे ऊन, पाऊस, वारा यांचा मारा सोसत उभ्या असलेल्या या ऐतिहासिक बांधकामाच्या देखभालीची व दुरूस्तीची आवश्यकता आहे. मात्र संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे.

प्रवेशद्वाराचे छत खराब झाले आहे. पावसाळ्यात पाणी पाझरत आहे. प्रवेशद्वारातून जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढत गेल्याने मोठी वाहने ये-जा करू शकत नाहीत. मातीचा बुरूज ठिकठिकाणी ढासळू लागला आहे.

चाैकट

नगरपंचायतीने लक्ष द्यावे

खानापूर गावाचा समावेश केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. यामुळे दुरूस्ती करण्यात अडचणी येत आहेत, असे समजते. मात्र खानापूर नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

फोटो-२१खानापूर१.२