शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खानापूरचे प्रवेशद्वार अन् बुरूज नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:26 IST

खानापूर गावाची स्थापना अकराव्या शतकापूर्वी भुईकोट किल्ला स्वरूपात झाली. तत्कालीन यादव राजवटीत गावाच्या तटबंदीचे, सोळा बुरूजांचे व मुख्य प्रवेशद्वाराचे ...

खानापूर गावाची स्थापना अकराव्या शतकापूर्वी भुईकोट किल्ला स्वरूपात झाली. तत्कालीन यादव राजवटीत गावाच्या तटबंदीचे, सोळा बुरूजांचे व मुख्य प्रवेशद्वाराचे (वेस) काम पूर्ण झाले. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खानापूर येथील तटबंदीची व बुरूजांची आतापर्यंत पूर्ण पडझड झाली आहे. सध्या केवळ मुख्य प्रवेशद्वार व त्याचे संरक्षण करण्यासाठी बांधलेला मातीचा बुरूज अस्तित्वात आहे.

ऐतिहासिक प्रवेशद्वार व बुरूजही शेवटची घटका मोजत आहे. गेली नऊशे वर्षे ऊन, पाऊस, वारा यांचा मारा सोसत उभ्या असलेल्या या ऐतिहासिक बांधकामाच्या देखभालीची व दुरूस्तीची आवश्यकता आहे. मात्र संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे.

प्रवेशद्वाराचे छत खराब झाले आहे. पावसाळ्यात पाणी पाझरत आहे. प्रवेशद्वारातून जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढत गेल्याने मोठी वाहने ये-जा करू शकत नाहीत. मातीचा बुरूज ठिकठिकाणी ढासळू लागला आहे.

चाैकट

नगरपंचायतीने लक्ष द्यावे

खानापूर गावाचा समावेश केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. यामुळे दुरूस्ती करण्यात अडचणी येत आहेत, असे समजते. मात्र खानापूर नगरपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

फोटो-२१खानापूर१.२