शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:24 IST

संख : राज्य शासनाने मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू न करता असंवैधानिक श्रेणीतील आरक्षण लागू केले. केंद्र सरकारने ...

संख : राज्य शासनाने मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू न करता असंवैधानिक श्रेणीतील आरक्षण लागू केले. केंद्र सरकारने विशेष घटनादुरुस्तीच्या माध्यमातून राज्यघटनेत नवे ३४२(अ) कलम आणले. राज्य शासनाने मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी हे मराठा समाजाला पुन्हा एकदा फसवणुकीकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत. या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व मिळाले तरी घटनाबाह्य असल्याने टिकणार नाही.

एसईबीसी हा नवीन प्रवर्ग निर्माण केला आहे.

तांत्रिक व कायदेशीर अंगाने विचार केला तर कलम ३४० अंतर्गत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यात व ३४२(अ) यामध्ये फरक दिसून येत नाही. त्यामुळे याचा राज्य शासनाने गांंभीर्याने विचार करून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुधीर नाईक, तालुका उपाध्यक्ष रोहित चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष खंडू शिंदे, जत शहराध्यक्ष प्रमोद काटे, तालुका सचिव बजिरंग शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.