शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जिल्ह्यात गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्बंध लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST

सांगली : जिल्ह्यातील कोराेनाबाधितांची संख्या कायम असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. वाढतच चाललेली रुग्णसंख्या कमी आणण्यासाठी आता कठोर उपाय आवश्यक ...

सांगली : जिल्ह्यातील कोराेनाबाधितांची संख्या कायम असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. वाढतच चाललेली रुग्णसंख्या कमी आणण्यासाठी आता कठोर उपाय आवश्यक असून जिल्ह्यात गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांनी आता विशेष लक्ष देऊन गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध लागू करावेत, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, निर्बंध लागू असतानाही जिल्ह्यात गर्दी कायम आहे. विशेषत: लग्नसमारंभात गर्दी वाढत आहे. यासाठी पोलिसांनी आता ग्रामीण भागात विशेष लक्ष द्यावे. पोलिसांनी आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून कारवाईस सुरुवात करावी, जेणेकरून गर्दी कमी होणार आहे. दीड महिन्यांपासून निर्बंध कायम असल्याने रुग्णांची चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने आता पुन्हा एकदा निर्बंध आणखी कडक करत व गर्दीवर नियंत्रण मिळवून बाधितांची संख्या कमी आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

चौकट

कोरोना रुग्णसंख्या अद्यापही कायम असतानाच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचीही शक्यता व्यक्त केली आहे. दुसऱ्या लाटेतच जिल्ह्यातील रुग्णसंख्या हजारावर कायम असल्याने यंत्रणांवर ताण येणार आहे. त्यामुळे प्रसंगी कठोर निर्बंध लागू करत परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी केली.