शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

काँग्रेसची कीड संपवा!

By admin | Updated: January 6, 2017 00:17 IST

सुभाष देशमुख : सांगलीत रस्ते, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सांगली : सांगली जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांची काँग्रेसने वाट लावली आहे. सहकाराची वाट लावणारी काँग्रेसची कीड संपवा, असे आवाहन नूतन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी केले. सांगलीतील विश्रामबाग ते कृपामयी या रस्त्याचे सहापदरीकरण, तसेच कुपवाड ते सूतगिरणी रस्ता कामाचा प्रारंभ व संजयनगर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात देशमुख बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सुजित काटे, सुभाष गडदे यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांचा सत्कार करण्यात आला. देशमुख म्हणाले की, संजयनगर परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी झाले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची काँग्रेसने वाट लावली. अनेक सहकारी संस्था संपविल्या. काँग्रेस संपली की सांगलीची कीड संपेल. सांगलीकरांनी काँग्रेसमुक्त शहराचा संकल्प करावा. देशातील व राज्यातील भाजप सरकारने शेवटच्या माणसाचा उद्धार करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे वर्ष गरीब कल्याण वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यात २०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेत सर्वांनी नोंदणी करावी. मुद्रा योजनेतून तरूणांना कोट्यवधीचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. अन्न, वस्त्र व निवारा या जनतेच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येत्या दोन वर्षात आपण नावीन्यपूर्ण योजना राबविणार असल्याची ग्वाहीही देशमुख यांनी दिली. आ. गाडगीळ म्हणाले की, गेल्या दोन वर्षात संजयनगर परिसरात कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. ही तर सुरुवात आहे. पुढील तीन वर्षात संजयनगर भागातील एकही काम शिल्लक राहणार नाही. प्रारंभी श्रीकांत वाघमोडे यांनी स्वागत, तर दीपक माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नीता केळकर, शेखर इनामदार, दिनकरतात्या पाटील, दरिबा बंडगर, सुजित काटे यांची भाषणे झाली. सुभाष बुवा, किरण सर्जे, सुवर्णा कदम, गंगा तिडके यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी दीपक मासाळ, रमेश शिंदे, नूतन मोटे, गजानन सरगर उपस्थित होते. (प्रतिनिधी)