शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अतिक्रमण काढण्यापूर्वीच जागा खोकीधारकांच्या घशात

By admin | Updated: May 27, 2015 01:02 IST

वांगी ग्रामपंचायतीचा अजब कारभार : ग्रामस्थांत संतप्त प्रतिक्रिया; खोकीधारक व पदाधिकाऱ्यांत तडजोड

मोहन मोहिते - वांगी -वांगी येथील एसटी बसस्थानक परिसरात यल्लम्मा मंदिराजवळ गेल्या ४० वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या जागेवर असणारे अतिक्रमण काढण्यापूर्वीच ती जागा संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात घालण्याचा अजब प्रकार वांगी ग्रामपंचायतीच्या प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही जागा मोफत वापरून ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अतिक्रमण धारकांवर वांगी ग्रामपंचायत एवढी मेहेरबान का झाली?, असा सवाल विचारला जात आहे.वांगी (ता. कडेगाव) येथे यल्लम्मा मंदिर परिसरात गेल्या ४० वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय उभारले आहेत. मात्र ४० वर्षात भाडे म्हणून काहीही रक्कम ग्रामपंचायतीला दिलेली नाही. मागील वर्षापासून ग्रामपंचायतीने गावातील शासकीय सर्व जागांवरील अतिक्रमणे हटवून, अतिक्रमणमुक्त वांगी करण्याचा ध्यास घेतला होता. त्याचीच सुरूवात म्हणून गावातील मुख्य बाजार कट्ट्यावर असणारी १५ ते २० खोकी काढून ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहिमेचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जागेत असणारे अतिक्रमण काढण्यात आले. त्याचबरोबर न्यायालयीन लढाई करून महाराष्ट्र शासनाच्या जागेवर असणारे ८ ते १० खोक्यांचे अतिक्रमण काढण्यात ग्रामपंचायतीला यश आले. ही अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबविली जात असल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. त्यानंतर ग्रामपंचायतीने एसटी बसस्थानकाच्या पाठीमागील हायस्कूल रस्त्यावरील १० ते १२ अतिक्रमणे काढली. ही सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायतीने दोन दिवसांची मुदत देऊन काढली आहेत. मात्र येथील यल्लम्मा मंदिर परिसरात असणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम गेल्या महिन्यापासून सुरू असूनही, अद्याप येथील अतिक्रमणे पूर्णत: निघालेली नाहीत. याउलट ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने या अतिक्रमण धारकांबरोबर संगनमत केले आहे. येथे रिकाम्या होणाऱ्या जागेवर गाळे बांधून ते गाळे पूर्वीपासून अतिक्रमण करणाऱ्या लोकांना देण्यासाठी वांगी ग्रामपंचायतीकडून ५० हजार रूपये भरून घेतले आहेत. गेल्या चाळीस वर्षांपासून ग्रामपंचायतीची जागा मोफत वापरणाऱ्यांवर ग्रामपंचायत एवढी मेहेरबान का झाली आहे?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.वांगीत अतिक्रमण केलेल्या जागेवर गाळे बांधून त्यांचा जाहीर लिलाव केला, तर ग्रामपंचायतीला मोठा फायदा होणार असताना, केवळ ५० हजार रूपयांत ही जागा अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात घालण्यात कोणाचे कोणते हितसंबंध गुंतले आहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे. गावातील अतिक्रमणे काढताना ३० ते ३५ व्यावसायिक रस्त्यावर आले असताना, ग्रामपंचायत याच लोकांवर मेहेरबान का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.