शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

अतिक्रमण काढण्यापूर्वीच जागा खोकीधारकांच्या घशात

By admin | Updated: May 27, 2015 01:02 IST

वांगी ग्रामपंचायतीचा अजब कारभार : ग्रामस्थांत संतप्त प्रतिक्रिया; खोकीधारक व पदाधिकाऱ्यांत तडजोड

मोहन मोहिते - वांगी -वांगी येथील एसटी बसस्थानक परिसरात यल्लम्मा मंदिराजवळ गेल्या ४० वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या जागेवर असणारे अतिक्रमण काढण्यापूर्वीच ती जागा संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात घालण्याचा अजब प्रकार वांगी ग्रामपंचायतीच्या प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही जागा मोफत वापरून ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अतिक्रमण धारकांवर वांगी ग्रामपंचायत एवढी मेहेरबान का झाली?, असा सवाल विचारला जात आहे.वांगी (ता. कडेगाव) येथे यल्लम्मा मंदिर परिसरात गेल्या ४० वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी छोटे-मोठे व्यवसाय उभारले आहेत. मात्र ४० वर्षात भाडे म्हणून काहीही रक्कम ग्रामपंचायतीला दिलेली नाही. मागील वर्षापासून ग्रामपंचायतीने गावातील शासकीय सर्व जागांवरील अतिक्रमणे हटवून, अतिक्रमणमुक्त वांगी करण्याचा ध्यास घेतला होता. त्याचीच सुरूवात म्हणून गावातील मुख्य बाजार कट्ट्यावर असणारी १५ ते २० खोकी काढून ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहिमेचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या जागेत असणारे अतिक्रमण काढण्यात आले. त्याचबरोबर न्यायालयीन लढाई करून महाराष्ट्र शासनाच्या जागेवर असणारे ८ ते १० खोक्यांचे अतिक्रमण काढण्यात ग्रामपंचायतीला यश आले. ही अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबविली जात असल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. त्यानंतर ग्रामपंचायतीने एसटी बसस्थानकाच्या पाठीमागील हायस्कूल रस्त्यावरील १० ते १२ अतिक्रमणे काढली. ही सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायतीने दोन दिवसांची मुदत देऊन काढली आहेत. मात्र येथील यल्लम्मा मंदिर परिसरात असणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम गेल्या महिन्यापासून सुरू असूनही, अद्याप येथील अतिक्रमणे पूर्णत: निघालेली नाहीत. याउलट ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने या अतिक्रमण धारकांबरोबर संगनमत केले आहे. येथे रिकाम्या होणाऱ्या जागेवर गाळे बांधून ते गाळे पूर्वीपासून अतिक्रमण करणाऱ्या लोकांना देण्यासाठी वांगी ग्रामपंचायतीकडून ५० हजार रूपये भरून घेतले आहेत. गेल्या चाळीस वर्षांपासून ग्रामपंचायतीची जागा मोफत वापरणाऱ्यांवर ग्रामपंचायत एवढी मेहेरबान का झाली आहे?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.वांगीत अतिक्रमण केलेल्या जागेवर गाळे बांधून त्यांचा जाहीर लिलाव केला, तर ग्रामपंचायतीला मोठा फायदा होणार असताना, केवळ ५० हजार रूपयांत ही जागा अतिक्रमण करणाऱ्यांच्या घशात घालण्यात कोणाचे कोणते हितसंबंध गुंतले आहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे. गावातील अतिक्रमणे काढताना ३० ते ३५ व्यावसायिक रस्त्यावर आले असताना, ग्रामपंचायत याच लोकांवर मेहेरबान का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.