शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

नऊ फुकट्या प्रवाशांमुळे सात वाहकांवर अपहाराची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:50 IST

वाहकांची नजर चुकवून प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी एस. टी.च्या सांगली विभागाने सात विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ...

वाहकांची नजर चुकवून प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी एस. टी.च्या सांगली विभागाने सात विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. सोमवार, दि. १५ ते २५ फेब्रुवारी दरम्यान यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. यामुळे एस. टी.तून फुकट प्रवास करणाऱ्यांना लगाम बसणार आहे.

एस. टी. महामंडळाचे सांगलीचे प्रभारी विभाग नियंत्रक अरुण वाघाटे म्हणाले की, विनातिकीट प्रवास करणारे आणि वाहकांचा गैरकारभार थांबविण्यासाठी विभागीय स्तरावर शाखाप्रमुख, पर्यवेक्षकीय कर्मचारी यांची सात पथके तयार केली आहेत. या पथकाने पाच दिवसांमध्ये ४६६ बसेसची तपासणी केली होती. यामध्ये नऊ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पथकाला आढळून आले आहेत. याप्रकरणी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे आणि दंड अशी रक्कम वसूल केली आहे. तसेच सात वाहकांवर अपहाराची कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये आणि वाहकांनीही विनातिकीट प्रवास कोण करत आहे का, याची पाहणी केली पाहिजे. यामध्ये वाहकांनी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

चौकट

अशी होणार वसुली

एस. टी.चे तपासणी पथक २४ तास काम करणार असून, ही विशेष मोहीम संपल्यानंतरही प्रवाशांचे तिकीट प्राधान्याने तपासले जाणार आहे. त्यासाठी नेमलेली सात पथके कायमस्वरूपी कार्यरत राहतील. १०० रुपयांच्या आत तिकीट असल्यास १०० रुपये दंड व तिकिटाची रक्कम असे पैसे आकारण्यात येतील, तर १०० रुपयांच्या वर तिकीट असल्यास दुप्पट रकमेची आकारणी करण्यात येईल, अशी माहितीही अरुण वाघाटे यांनी दिली.