शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

‘मिशन इस्लामपूर’साठी येलूरमध्ये एल्गार

By admin | Updated: September 30, 2016 01:24 IST

निवडणुकीचे वारे : राहतील ते मावळे, जातील ते कावळे : राजू शेट्टी; राष्ट्रवादीविरोधी सर्वच नेत्यांना सुनावले

अशोक पाटील -- इस्लामपूर मागील विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत मी नवखा होतो. आता जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच मुरलो आहे. केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. भिण्याचे कारण नाही. आगामी सर्वच निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला लोळवू. या लढाईत कोणाची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. आपल्याबरोबर राहतील ते मावळे, जे जातील ते कावळे’, असे खडे बोल खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीविरोधी असलेल्या सर्वच नेत्यांना सुनावले.वाळवा, शिराळ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादीचे म्हणजेच माजी मंत्री जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. जयंत पाटील यांना राजकीय शत्रू मानून पेठनाक्यावरील महाडिक गटाचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांच्या समर्थकांनी वाळवा, शिराळा, मिरज, शाहुवाडी आणि हातकणंगले या तालुक्याच्या सीमेवर असलेल्या येलूर जिल्हा परिषद मतदारसंघातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील येलूर येथे राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी वगळून सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी शेट्टी यांनी भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, महाडिक गटासह इतर पक्षांनी एकत्र करून राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे करण्याचा सल्ला दिला. गद्दारी करणाऱ्यांना बाजूला सारून पुढे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनाकडक शब्दात सुनावले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह, इस्लामपूर व आष्टा पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विकासकामांचा डांगोरा पिटण्यास सुरुवात केली आहे. ही कामे निकृष्ट कशी आहेत, यामध्ये किती भ्रष्टाचार आहे, याचा सात-बारा काढण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. परंतु या विरोधकांत एकमत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने विरोधकांना बेदखल करून टाकले आहे.आगामी इस्लामपूर पालिका निवडणुकीसाठी विद्यमान नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक, अमित ओसवाल, जलाल मुल्ला, चेतन शिंदे, सोमनाथ फल्ले, अ‍ॅड. फिरोज मगदूम यांनी महाडिक युवा शक्तीकडून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे. दुसरीकडे भाजपचे विक्रम पाटील, शिवसेनेचे आनंदराव पवार, कॉँग्रेसचे वैभव पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा सूर्यवंशी त्यांच्यातील राजकीय दुरावा आजही कायम आहे. सर्वांना समान अंतरावर ठेवत माजी नगरसेवक एल. एल. शहा यांनीही पालिका निवडणुकीत उतरण्याचे निश्चित केले आहे. गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात आघाडी कॉँग्रेसचे सरकार होते. परंतु स्थानिक पातळीवरील निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. परिणामी शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक यांनी विकास आघाडी करून आघाडी कॉँग्रेसला तिसरा पर्याय उभा केला होता. त्यामुळे काही जि. प. मतदारसंघात कॉँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का बसला. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीविरोधात कॉँग्रेस अशाच लढती झाल्या. भाजप, शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेत शिरकावही करता आला नाही. त्यानंतर मोदी लाटेने केंद्रात व राज्यात भाजपचे वारे आले. यामध्ये घटक पक्षाच्या रूपाने राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत सत्तेत जाऊन बसले. परंतु या दोघांचे कार्यक्षेत्र असलेल्या वाळवा, शिराळ्यातील राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी आजही विरोधकांची ताकद एकवटली नसल्याचे चित्र आहे.