शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीला १२ कोटींचा ‘शॉक’

By admin | Updated: June 1, 2015 00:20 IST

वादळी फटका : १६८ फिडर बंद; सहाशे गावांचा वीज पुरवठा खंडित

अंजर अथणीकर - सांगली -जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसाने वीज कंपनीचे जवळपास १२ कोटींचे नुकसान झाले. या वादळी पावसाने १६८ एक्स्प्रेस फिडर बंद पडले. त्यामुळे जवळपास सहाशे गावे व वाड्या-वस्त्यांमधील वीज पुरवठा खंडित झाला. वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करुन जवळपास सर्वच गावांतील वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. आता कर्मचारी कृषी क्षेत्रातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणखी दोन दिवसात सर्वच ठिकाणचा वीज पुरवठा पूर्ववत होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे लोखंडी व सिमेंटचे खांब मोडून पडले. झाडे उन्मळून पडल्याने वायरी तुटल्या. एक्स्प्रेस फिडर खराब झाले. सर्वाधिक फटका कवठेमहांकाळ तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात लघुदाब वाहिनीचे १५ खांब व उच्च दाब वाहिनीचे तीन खांब मोडून पडले आहेत. प्रत्येक तालुक्यात चार ते पाच खांब मोडून पडले आहेत. झाडे व त्यांच्या फांद्या तुटून पडल्याने शंभरहून अधिक ठिकाणी वायरिंग तुटले आहे. सांगलीमध्ये मिरज रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरात, विश्रामबाग गणपती मंदिरासमोरील झाड विजेच्या तारांवर कोसळले. त्याचबरोबर त्रिकोणी बागेजवळील झाडाची मोठी फांदी इलेक्ट्रीक खांबावर पडल्याने चारही बाजूच्या विजेच्या तारा तुटल्या. अद्याप या परिसरातील खांब उभारणी व वायरिंग दुरुस्ती सुरु आहे. वादळी पावसाने जिल्ह्यातील ११ के.व्ही.चे १६८ फिडर बंद पडले आहेत. एका फिडरवरून जवळपास चार ते पाच गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जवळपास सहाशेहून अधिक गावे व वाड्या-वस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होता. प्रथम शहर भागातील, त्यानंतर ग्रामीण व त्यानंतर कृषी क्षेत्रातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. आता सर्वच गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.निवृत्तीनंतरही सेवा...वीज कंपनीचे १९ कर्मचारी आज (रविवार) सेवानिवृत्त झाले. हे निवृत्त होणारे कर्मचारीही आज विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. शुक्रवारी रात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले. त्यामुळेच विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करण्यास मदत झाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी पी. एम. राठोड यांनी दिली.