शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पथदिव्यांचे वीजबिले शासनाने भरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची वीजबिले महाराष्ट्र शासनानेच भरावीत, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची वीजबिले महाराष्ट्र शासनानेच भरावीत, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषद शिराळा तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सांगली जिल्हा सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष विजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सरपंचांनी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनच गावातील पथदिव्यांची बिले शासन भरत आहे. कोरोनाच्या बिकट स्थितीत ही बिले ग्रामपंचायतीने भरावे, असे आदेश शासनाने काढले आहेत. वास्तविक या काळात वसुली नसल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली आहे. वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार पायाभूत सुविधांसाठी देत आहे. त्यावर डोळा ठेवून पथदिव्यांची वीज बिले भरावयास लावणे म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला खीळ बसविणे असे आहे. अशा काळात शासन ग्रामपंचायतींना वाऱ्यावर सोडून देत आहे. ही बाब खेदजनक आहे. तालुक्यातील एकही ग्रामपंचायत पथदिवे वीजबिल व पाणीपुरवठा वीजबिल ग्रामनिधी अथवा १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरणार नाही. शासनाने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनावर विजय महाडिक, विनोद पन्हाळकर, विजय पाटील, पांडुरंग कुसळे, मनीषा कुंभार, विश्वास पाटील, शशिकांत पाटील, राकेश सुतार, रामचंद्र पाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत.