शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचन योजनांचे वीज बिल ४२ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:28 IST

अशोक डोंबाळे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे ४२ कोटी ५१ लाखांचे ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे ४२ कोटी ५१ लाखांचे वीज बिल थकले आहे. यामध्ये एप्रिलच्या दहा कोटी ६० लाखांच्या वीज बिलाचा समावेश असल्यामुळे, ते भरण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगली पाटबंधारे विभागाकडे नोटीस बजावली आहे. पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाई निधीतून पैशाची मागणी केली आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद नसल्यामुळे अधिकारी हवालदिल झाले आहेत.लोकसभा निवडणुका आणि त्यातच यंदा जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळात होरपळत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू आहेत. दुष्काळात योजना चालू राहिल्यामुळे जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज अशा सात तालुक्यातील १२० गावांमध्ये टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. शासनाचा टंचाई निवारणावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला आहे. मात्र शासनाकडून टंचाईतून वीज बिल भरण्यासाठी पाटबंधारे विभागाला सहकार्य नसल्यामुळे शासकीय यंत्रणांच्या वादात ऐन दुष्काळात योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.म्हैसाळ योजनेची ३१ मार्च २०१९ पूर्वीची २३ कोटी सहा लाख रुपये वीज बिलाची थकबाकी होती. यामध्ये एप्रिलच्या बिलाची पाच कोटी ८६ लाखांची भर पडून तो आकडा २८ कोटी ९२ लाखांपर्यंत गेला आहे. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न काही प्रमाणात कमी आहे. कारण, तेथील साखर कारखाने आणि शेतकरीही नियमित पाणीपट्टीचे पैसे भरत असल्यामुळे या योजनांची थकबाकी कमी आहे. हे जरी खरे असले तरी, काही कारखान्यांनी शेतकºयांकडून वसूल केलेले पैसेही वेळेवर पाटबंधारे विभागाकडे भरले नाहीत. परिणामी टेंभू, ताकारी सिंचन योजनांच्या वीज बिलाच्या थकबाकीचा प्रश्न निर्माण होत आहे. काही ठिकाणी पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी वसुलीची यंत्रणाच नसल्यामुळे थकबाकी दिसत आहे. या सावळ्या गोंधळामुळेही पाणीपट्टी थकीत राहिली आहे. काही गावांमध्ये तर पाणीपट्टी १०० टक्के वसूल झाल्यानंतर ती पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ५० टक्केच पोहोचते, अशा शेतकºयांच्या तक्रारी आहेत.ताकारी योजनेचे मार्च २०१९ अखेरचे सहा कोटी सात लाखाचे वीज बिल थकीत आहे. यामध्ये तीन कोटी सहा लाख रुपये एप्रिल २०१९ च्या बिलाची भर पडून ९ कोटी १३ लाख रुपये झाले आहेत. टेंभू योजनेचे पूर्वीचे थकीत वीज बिल दोन कोटी २४ लाख असून, एप्रिल २०१९ चे वीज बिल एक कोटी ६७ लाखांचे आहे. एप्रिल २०१९ चे वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या अधिकाºयांनी टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेच्या अधिकाºयांना नोटीस बजावली आहे. यामध्ये पुन्हा मे महिन्याच्या बिलाचीही भर पडणार आहे.८१-१९ टक्केचा फॉर्म्युला : फायद्याचाताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे वीज बिल भरण्यासाठी शासनाने ८१-१९ टक्केचा फॉर्म्युला केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ८१ टक्के वीज बिल कृष्णा खोरे महामंडळाने भरायचे आहे, तर १९ टक्के वीज बिल शेतकºयांकडून वसूल करायचे आहे. १९ टक्केनुसार बहुतांशी शेतकºयांकडून वीज बिलाची रक्कम वसूल होत आहे.