शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

संस्थांच्या निवडणुकांचा डिसेंबरला धडाका

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

खानापूर तालुका : बाजार समिती, विटा बँकेचीही निवडणूक; मतदारयाद्यांची माहिती संकलनाचे काम सुरू

दिलीप मोहिते- विटा -विधानसभा निवडणुकीचे वादळ शांत होत असतानाच आता खानापूर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. आॅक्टोबरपूर्वी मुदत संपलेल्या खानापूर तालुक्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया राज्यस्तरावर नव्याने स्थापन झालेल्या सहकार प्राधिकरणाने हाती घेतली असून, डिसेंबरअखेर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका संपविण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे. त्यासाठी मतदार याद्यांसह अन्य माहिती संकलित करण्याची मोहीम सहकार खात्याने राबविली आहे. त्यामुळे आता खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील स्थानिक राजकीय गट विधानसभेनंतर पुन्हा एकदा आमने-सामने येण्याचे संकेत आहेत.खानापूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, खानापूर तालुका सहकारी सूतगिरणी, दि विटा मर्चंटस् को-आॅप. बॅँक व विटा अर्बन को-आॅप. बॅँक या प्रमुख चार मोठ्या संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे. मात्र, या संस्थांसह अन्य सहकारी संस्थांच्या संचालकांना मुदतवाढ देण्यात आली होती. दुष्काळ, टंचाई परिस्थिती यासह विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सहकार खात्याने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नोव्हेंबर व डिसेंबर महिनाअखेर राबविण्याची तयारी केली आहे.विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व खानापूर तालुका सहकारी सूतगिरणी या दोन्ही संस्था आ. अनिल बाबर यांच्या ताब्यात आहेत, तर आ. बाबर यांचे समर्थक विनोद गुळवणी यांच्या ताब्यात दि विटा मर्चंटस् को-आॅप. बॅँक आहे. येथील विटा अर्बन को-आॅप. बॅँक माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्याकडे आहे. या चार महत्त्वाच्या सहकारी संस्था असल्या तरी, विटा अर्बन बॅँकेचा अपवाद वगळता अन्य संस्थांत मतदान प्रक्रिया राबविली जाण्याचे संकेत आहेत.याशिवाय खानापूर तालुक्यातील २७ सहकारी सेवा सोसायट्या, १८ नागरी पतसंस्था, १२ औद्योगिक संस्था, एक ग्राहक संस्था, ५ सेवक पतसंस्था, एक प्रक्रिया संस्था, १० यंत्रमाग संस्था, २ पाणी पुरवठा संस्था, ६ मजूर सोसायट्या व २ सहकारी वाहतूक व स्वयंरोजगार संस्थांची मुदत संपल्यामुळे येत्या डिसेंबरअखेर या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांवर आता राज्यस्तरीय सहकार प्राधिकरणाचे नियंत्रण राहणार असून, त्यांच्या सूचनेनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा हंगाम संपताच आता शहरीसह ग्रामीण भागातील राजकारणाचा केंद्रबिंंदू असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची तुतारी वाजली असल्याने, खानापूर तालुक्यातील वातावरण डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा निवडणूकमय होणार आहे.