शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

एकनाथ खडसे केवळ कुटुंबाचे महसूलमंत्री!

By admin | Updated: June 4, 2016 00:30 IST

वृंदा करात : देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा मोदींचा अजेंडा; देशातील सर्वसामान्यांची स्थिती गंभीर

सांगली : एकीकडे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करायची आणि दुसरीकडे त्यांनी लिहिलेले संविधान बदलण्याचा प्रयत्न करायचा, असा घाट सध्या मोदी सरकारकडून घातला जात आहे. केवळ हिंदू राष्ट्र बनविण्याचा एकमेव अजेंडा मोदी सरकारचा असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या वृंदा करात यांनी शुक्रवारी केला. दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे हे नक्की राज्याचे महसूलमंत्री आहेत, की कुटुंबाचे? असा सवाल करत त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नसल्याची टीकाही त्यांनी केली. जनवादी महिला संघटनेच्या राज्य अधिवेशनानिमित्त येथील स्टेशन चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत करात बोलत होत्या. वृंदा करात म्हणाल्या की, महिला प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कमावित असताना, त्यांनी घरकामातच राहावे अशी मानसिकता आरएसएस आणि भाजपची आहे. देशातील ३५ टक्के कुटुंबे महिलांवर अवलंबून असतानाही, महिलांचे महत्त्व समजायला ते तयार नाहीत. त्यामुळे महिला आंदोलनांना आरएसएस आणि भाजपकडून धोका आहे. त्यामुळेच सध्या त्यांचे लोक माफियासारखे वागत आहेत. देशातील महिलांची आणि सर्वसामान्यांची स्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. देशात वर्षाला १७ हजारहून अधिक महिलांवर अत्याचार होत असताना, अत्याचार करणाऱ्यांवर शिक्षेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोणतेही कारण न देता महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. मोदी सरकारकडून सध्या ‘मेक इन इंडिया’ अभियान सुरू असले तरी शहरी भागात ‘मेक इन इंडिया’ आणि ग्रामीण भागात ‘ब्रेक इन इंडिया’ अशी अवस्था असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील सरकार हे बड्या भांडवलदारांच्या आणि काळ्या पैसेवाल्यांच्या इशाऱ्यावर चालते आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर येत आहे. राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे हे नक्की राज्याचे की कुटुंबाचे महसूलमंत्री आहेत? त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. आता आम्ही जनतेच्या प्रश्नावर लढा तीव्र करणार आहोत. यावेळी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मालिनी भट्टाचार्य, उपाध्यक्षा सुधा सुंदररामन, राज्याध्यक्षा मरियम ढवळे, उपाध्यक्षा नसिमा शेख, सोन्या गिल, हेमलता पाटील, डॉ. बाबूराव गुरव, रेहाना शेख, किरण मोघे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रोहित वेमुला : आत्महत्या नव्हे हत्यामोदींच्या कारभारावर आणि त्यांच्या दुहेरी नीतीवर प्रश्न उपस्थित केला, म्हणून रोहित वेमुला या होतकरू विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यापासून रोखण्यात आले. सरकारकडून झालेल्या मानसिक त्रासामुळेच त्याने आत्महत्या केली. पण ही आत्महत्या नसून सरकारकडून त्याची हत्याच झाल्याचे असल्याचे करात यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या ‘मनरेगा’ योजनेतून एका मजुराला किमान शंभर दिवस मजुरी मिळावी, असा कायदा असताना, गुजरातमध्ये ३२ दिवस, महाराष्ट्रात ४२ दिवस, तर त्रिपुरात सर्वाधिक ९५ दिवस मजुरांना काम मिळत आहे. यावरून गुजरात मॉडेल फसवे असल्याचे सिध्द झाले असून कुठाय गुजरात मॉडेल? असा सवाल करात यांनी उपस्थित केला.