शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:27 IST

देवराष्ट्रे : शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करू. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, ...

देवराष्ट्रे : शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करू. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे ताकारी योजनेच्या वितरिका क्रमांक दोनचे पाणी परिचलन व पाणी पूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, प्रांताधिकारी गणेश मरकड, आयुष सिंह, ताकारी पंपगृह क्र. एकचे कार्यकारी अभियंता राजन डवरी, तहसीलदार शैलजा पाटील, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन नाईक उपस्थित होते .

विश्वजित कदम म्हणाले, जिल्ह्यात ताकारी, टेंभू, आरफळ, म्हैसाळ या सिंचन योजना दुष्काळी भागासाठी वरदायिनी ठरत आहेत. उर्वरित दुष्काळी भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या योजना पूर्ण करण्यावर भर देत आहोत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग असल्याने येत्या काळात जिल्ह्यातील सिंचन योजनांची उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यात येतील.

कार्यकारी अभियंता डवरी म्हणाले, ताकारी पंपगृह क्रमांक एकची वितरिका क्रमांक दोन ही दहा किलोमीटरची आहे. यासाठी नऊ कोटी ५० लाखांचा खर्च झाला आहे. या वितरिकेवर २४ पाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आले असून, याव्दारे २४०० हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या वितरिकेव्दारे देवराष्ट्रे, कुंभारगाव, जाधवनगर, बलवडी, कुंडल, आंधळी, पलूस येथील शेतीस पाणीपुरवठा होणार आहे.

विश्वजित कदम यांच्याहस्ते पाणी वितरण प्रारंभ करण्यात आला. कुंभारगाव येथे पाण्याचे पूजन करण्यात आले.

महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, बाळासाहेब पवार, सुरेश खारगे, खाशाबा दळवी, रतन पाटील, उत्तमराव पवार, उमेश साळोखे, एन. बी. कांबळे, पी. एम. येसणे उपस्थित होते.