शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

बदलते हवामान हापूससाठी परिणामकारक

By admin | Updated: December 15, 2015 00:40 IST

मुराद बुरोंडकर : दिल्लीत वनस्पती शरिर क्रिया शास्त्राबाबत आंतरराष्ट्रीय परिषद

दापोली : कोकणातील बदलते हवामान हापूसला घातक असून, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हापूस आंबा पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. वनस्पती शास्त्राशी निगडीत अभ्यासाची गरज असल्याचे मत वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी व्यक्त केले. वनस्पती शरीरक्रिया शास्त्र या विषयाच्या तिसऱ्या जागतिक परिषदेत दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालयात सोमवारी झालेल्या परिषदेत ते बोलत होते.दिल्ली येथे जागतिक वनस्पती शरीरक्रिया शास्त्र परिषद ११ ते १४ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.दिल्लीतील या आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर, डॉ. नितीन गोखले, डॉ. अविनाश शिंदे, प्रा. महेश कुलकर्णी, डॉ. अरुण माने यांची निवड करण्यात आली होती. बदलते हवामान आणि पुढील दिशा या विषयावर वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी या परिषदेत व्याख्यान दिले. परिषदेतील व्याख्याते म्हणून डॉ. बुरोंडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कोकणातील बदलते हवामान व हापूसवर होणारा परिणाम हे संशोधन त्यांनी या परिषदेत मांडले.वनस्पती जीवनशास्त्रातील बदलते हवामान व भविष्यातील आव्हाने यासाठी वनस्पती शास्त्रज्ञांनी एकत्र येण्याची गरज आहे. शास्त्रज्ञाने बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी संशोधनातून मात करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचा सूर या परिषदेत शास्त्रज्ञांनी काढला. वनस्पती जीवशास्त्रातील हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्याचे आव्हान पेलण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज असल्याचे मत अनेक शास्त्रज्ञांनी मांडले.आंतरराष्ट्रीय वनस्पती जीवशास्त्र या परिषदेचे अध्यक्ष गोविंदजी यांनी उद्घाटन केले. जगद्विख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेत शास्त्रज्ञांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.कोकणातील हापूस आंब्यावरील बदलत्या हवामानामुळे होणारे परिणाम व भविष्यातील आव्हाने या विषयाचा परिषदेत सहभाग होता. (प्रतिनिधी)जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांचा सहभाग.परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचा सहभाग.वनस्पतीच्या शरिरावर हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज; शास्त्रज्ञांचे मत.