शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

बदलते हवामान हापूससाठी परिणामकारक

By admin | Updated: December 15, 2015 00:40 IST

मुराद बुरोंडकर : दिल्लीत वनस्पती शरिर क्रिया शास्त्राबाबत आंतरराष्ट्रीय परिषद

दापोली : कोकणातील बदलते हवामान हापूसला घातक असून, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हापूस आंबा पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. वनस्पती शास्त्राशी निगडीत अभ्यासाची गरज असल्याचे मत वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी व्यक्त केले. वनस्पती शरीरक्रिया शास्त्र या विषयाच्या तिसऱ्या जागतिक परिषदेत दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालयात सोमवारी झालेल्या परिषदेत ते बोलत होते.दिल्ली येथे जागतिक वनस्पती शरीरक्रिया शास्त्र परिषद ११ ते १४ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.दिल्लीतील या आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर, डॉ. नितीन गोखले, डॉ. अविनाश शिंदे, प्रा. महेश कुलकर्णी, डॉ. अरुण माने यांची निवड करण्यात आली होती. बदलते हवामान आणि पुढील दिशा या विषयावर वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी या परिषदेत व्याख्यान दिले. परिषदेतील व्याख्याते म्हणून डॉ. बुरोंडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कोकणातील बदलते हवामान व हापूसवर होणारा परिणाम हे संशोधन त्यांनी या परिषदेत मांडले.वनस्पती जीवनशास्त्रातील बदलते हवामान व भविष्यातील आव्हाने यासाठी वनस्पती शास्त्रज्ञांनी एकत्र येण्याची गरज आहे. शास्त्रज्ञाने बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी संशोधनातून मात करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचा सूर या परिषदेत शास्त्रज्ञांनी काढला. वनस्पती जीवशास्त्रातील हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्याचे आव्हान पेलण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज असल्याचे मत अनेक शास्त्रज्ञांनी मांडले.आंतरराष्ट्रीय वनस्पती जीवशास्त्र या परिषदेचे अध्यक्ष गोविंदजी यांनी उद्घाटन केले. जगद्विख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेत शास्त्रज्ञांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.कोकणातील हापूस आंब्यावरील बदलत्या हवामानामुळे होणारे परिणाम व भविष्यातील आव्हाने या विषयाचा परिषदेत सहभाग होता. (प्रतिनिधी)जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांचा सहभाग.परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचा सहभाग.वनस्पतीच्या शरिरावर हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज; शास्त्रज्ञांचे मत.