शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

बदलते हवामान हापूससाठी परिणामकारक

By admin | Updated: December 15, 2015 00:40 IST

मुराद बुरोंडकर : दिल्लीत वनस्पती शरिर क्रिया शास्त्राबाबत आंतरराष्ट्रीय परिषद

दापोली : कोकणातील बदलते हवामान हापूसला घातक असून, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हापूस आंबा पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. वनस्पती शास्त्राशी निगडीत अभ्यासाची गरज असल्याचे मत वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी व्यक्त केले. वनस्पती शरीरक्रिया शास्त्र या विषयाच्या तिसऱ्या जागतिक परिषदेत दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विश्व विद्यालयात सोमवारी झालेल्या परिषदेत ते बोलत होते.दिल्ली येथे जागतिक वनस्पती शरीरक्रिया शास्त्र परिषद ११ ते १४ डिसेंबरदरम्यान संपन्न झाली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.दिल्लीतील या आंतरराष्ट्रीय परिषदेकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर, डॉ. नितीन गोखले, डॉ. अविनाश शिंदे, प्रा. महेश कुलकर्णी, डॉ. अरुण माने यांची निवड करण्यात आली होती. बदलते हवामान आणि पुढील दिशा या विषयावर वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांनी या परिषदेत व्याख्यान दिले. परिषदेतील व्याख्याते म्हणून डॉ. बुरोंडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कोकणातील बदलते हवामान व हापूसवर होणारा परिणाम हे संशोधन त्यांनी या परिषदेत मांडले.वनस्पती जीवनशास्त्रातील बदलते हवामान व भविष्यातील आव्हाने यासाठी वनस्पती शास्त्रज्ञांनी एकत्र येण्याची गरज आहे. शास्त्रज्ञाने बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी संशोधनातून मात करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचा सूर या परिषदेत शास्त्रज्ञांनी काढला. वनस्पती जीवशास्त्रातील हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्याचे आव्हान पेलण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज असल्याचे मत अनेक शास्त्रज्ञांनी मांडले.आंतरराष्ट्रीय वनस्पती जीवशास्त्र या परिषदेचे अध्यक्ष गोविंदजी यांनी उद्घाटन केले. जगद्विख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेत शास्त्रज्ञांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.कोकणातील हापूस आंब्यावरील बदलत्या हवामानामुळे होणारे परिणाम व भविष्यातील आव्हाने या विषयाचा परिषदेत सहभाग होता. (प्रतिनिधी)जगातील २० राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांचा सहभाग.परिषदेत ७०० शास्त्रज्ञ प्रतिनिधी, विद्यार्थ्यांचा सहभाग.वनस्पतीच्या शरिरावर हवामानाच्या बदलामुळे येणाऱ्या अडथळ्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी जागतिक एकजुटीची गरज; शास्त्रज्ञांचे मत.