शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

एकवीसाव्या शतकात शिक्षण माणसाला आधुनिक बनवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:48 IST

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना ...

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना डॉ. माणिकराव साळुंखे, जितेश कदम, राजश्री एटम उपस्थित होते.

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : शिक्षण हे दशकानुरूप बदलत जाणारी गोष्ट आहे जसा शिक्षणाचा प्रसार होत चालला आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वत:ला बदलून घेऊन रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत. आजच्या आधुनिक युगात शिकत असताना तंत्रज्ञानाचा वापर हा शिक्षणासाठी मारक ठरतोय की काय अशी देखील भीती एका बाजूला वाटत आहे. माणूस हा युगानुयुगे शिकत असतो शिकण्याला कोणतीच बंधने नसतात, असे प्रतिपादन भारती विद्यापीठचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. जितेश कदम होते तर सत्यजित देशमुख, राजेश्री एटम, बी. एन. पवार, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी या पाच दिवस चालणाऱ्या या ऑनलाईन व्याख्यानमालेचे उद्घाटन देवराज पाटील यांच्या हस्ते व डॉ. माणिकराव साळुंखे, जितेश कदम, मंडळाचे संस्थापक पं. स. सदस्य आनंदराव पाटील उपस्थित होते.

देवराज पाटील म्हणाले, ३२ वर्षांमध्ये आजपर्यंत अखंडपणे चालत आलेली ही व्याख्यानमाला या कोरोनाच्या काळात देखील जय किसान मंडळाने एक अप्रतिम प्रयोग करत चालू ठेवलेली आहे ही गोष्ट अभिनंदनीय आहे.

डॉ. जितेश कदम म्हणाले, आज इतर देश प्रगत झाले कारण त्यांनी शिक्षण, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा योग्यरीतीने वापर केला. जगात अनेक साऱ्या मोठ्या ठिकाणी भारतीय माणूस अभिमानाने कार्यरत आहे परंतु आपल्या शिक्षणाची व्याप्ती आजही आपल्याला वाढवता आलेली नाही.

डॉ. दीपक स्वामी यांनी स्वागत केले. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कालिदास पाटील यांनी आभार मानले.