शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

एकवीसाव्या शतकात शिक्षण माणसाला आधुनिक बनवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:48 IST

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना ...

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना डॉ. माणिकराव साळुंखे, जितेश कदम, राजश्री एटम उपस्थित होते.

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : शिक्षण हे दशकानुरूप बदलत जाणारी गोष्ट आहे जसा शिक्षणाचा प्रसार होत चालला आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वत:ला बदलून घेऊन रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत. आजच्या आधुनिक युगात शिकत असताना तंत्रज्ञानाचा वापर हा शिक्षणासाठी मारक ठरतोय की काय अशी देखील भीती एका बाजूला वाटत आहे. माणूस हा युगानुयुगे शिकत असतो शिकण्याला कोणतीच बंधने नसतात, असे प्रतिपादन भारती विद्यापीठचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. जितेश कदम होते तर सत्यजित देशमुख, राजेश्री एटम, बी. एन. पवार, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी या पाच दिवस चालणाऱ्या या ऑनलाईन व्याख्यानमालेचे उद्घाटन देवराज पाटील यांच्या हस्ते व डॉ. माणिकराव साळुंखे, जितेश कदम, मंडळाचे संस्थापक पं. स. सदस्य आनंदराव पाटील उपस्थित होते.

देवराज पाटील म्हणाले, ३२ वर्षांमध्ये आजपर्यंत अखंडपणे चालत आलेली ही व्याख्यानमाला या कोरोनाच्या काळात देखील जय किसान मंडळाने एक अप्रतिम प्रयोग करत चालू ठेवलेली आहे ही गोष्ट अभिनंदनीय आहे.

डॉ. जितेश कदम म्हणाले, आज इतर देश प्रगत झाले कारण त्यांनी शिक्षण, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा योग्यरीतीने वापर केला. जगात अनेक साऱ्या मोठ्या ठिकाणी भारतीय माणूस अभिमानाने कार्यरत आहे परंतु आपल्या शिक्षणाची व्याप्ती आजही आपल्याला वाढवता आलेली नाही.

डॉ. दीपक स्वामी यांनी स्वागत केले. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कालिदास पाटील यांनी आभार मानले.