शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एकवीसाव्या शतकात शिक्षण माणसाला आधुनिक बनवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:48 IST

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना ...

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना डॉ. माणिकराव साळुंखे, जितेश कदम, राजश्री एटम उपस्थित होते.

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : शिक्षण हे दशकानुरूप बदलत जाणारी गोष्ट आहे जसा शिक्षणाचा प्रसार होत चालला आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वत:ला बदलून घेऊन रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजेत. आजच्या आधुनिक युगात शिकत असताना तंत्रज्ञानाचा वापर हा शिक्षणासाठी मारक ठरतोय की काय अशी देखील भीती एका बाजूला वाटत आहे. माणूस हा युगानुयुगे शिकत असतो शिकण्याला कोणतीच बंधने नसतात, असे प्रतिपादन भारती विद्यापीठचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील जय किसान मंडळ आयोजित स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या ३२ व्या स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. जितेश कदम होते तर सत्यजित देशमुख, राजेश्री एटम, बी. एन. पवार, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी या पाच दिवस चालणाऱ्या या ऑनलाईन व्याख्यानमालेचे उद्घाटन देवराज पाटील यांच्या हस्ते व डॉ. माणिकराव साळुंखे, जितेश कदम, मंडळाचे संस्थापक पं. स. सदस्य आनंदराव पाटील उपस्थित होते.

देवराज पाटील म्हणाले, ३२ वर्षांमध्ये आजपर्यंत अखंडपणे चालत आलेली ही व्याख्यानमाला या कोरोनाच्या काळात देखील जय किसान मंडळाने एक अप्रतिम प्रयोग करत चालू ठेवलेली आहे ही गोष्ट अभिनंदनीय आहे.

डॉ. जितेश कदम म्हणाले, आज इतर देश प्रगत झाले कारण त्यांनी शिक्षण, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा योग्यरीतीने वापर केला. जगात अनेक साऱ्या मोठ्या ठिकाणी भारतीय माणूस अभिमानाने कार्यरत आहे परंतु आपल्या शिक्षणाची व्याप्ती आजही आपल्याला वाढवता आलेली नाही.

डॉ. दीपक स्वामी यांनी स्वागत केले. स्वप्निल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कालिदास पाटील यांनी आभार मानले.