शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाला अध्यात्माची जोड हवी

By admin | Updated: December 16, 2014 00:02 IST

शंकर अभ्यंकर : ‘शिकू आनंदे’ उपक्रमाची सांगलीत सांगता

सांगली : भारत देशाचे मूळ हे अध्यात्म आहे, हे विसरुन कधीही चालणार नाही. साहजिकच आपली शिक्षण प्रणाली ही अध्यात्मावर आधारितच असली पाहिजे. परंतु दुर्दैवाने सध्या तशी परिस्थिती नाही, अशी खंत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली. सांगली शिक्षण संस्था आणि लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिकू आनंदे’ या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आयोजित उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते ‘उद्याचे शिक्षण’ याविषयी बोलत होते. अभ्यंकर म्हणाले की, मानवी जीवनच आनंदी आहे. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बिघडण्यापूर्वी मानवाला जे घडविते, त्याला शिक्षण असे म्हणतात. ज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीही नाही, असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. पूर्वीची शिक्षण प्रणाली ही कष्टसाध्य होती. आजकाल मात्र त्यात बरीच सुलभता आली आहे. शिक्षण प्रणाली तयार करताना भारतीय परंपरेचा विचार होणे गरजेचे होते. परंतु बहुतांश राज्यकर्त्यांना आणि शिक्षणक्रम तयार करणाऱ्यांना येथील मातीची ओळखच नसल्याने, त्यांनी वेगळी शिक्षण प्रणाली निर्माण केली. यामुळे भारतीय परंपरेतील सर्वच टाकावू आहे, अशी मानसिकता येथील विद्यार्थ्यांत निर्माण झाली. अध्यात्म आणि विज्ञान यांनी हातात हात घालून चालले पाहिजे. सध्याच्या विद्यालयात ‘विद्या’ ही ‘लयाला’ जात असल्याचेच चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मूळच्या अमेरिकेतील बर्सन मॅस्किन यांनी, भारतीय संस्कृती टिकवायची असेल आणि शिक्षणाची समज लवकर यायची असेल, तर प्रत्येकाने मातृभाषेतूनच शिक्षण घेतले पाहिजे असे आवाहन केले. येथील भावे नाट्य मंदिरात प्रकाश पाठक आणि विवेक पोंक्षे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात रमेश पानसे आणि कांचन परुळेकर यांनी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. पाल्यांशी नियमित सुसंवाद कसा साधावा, याविषयीची कौशल्ये उभयतांनी सांगितली. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास किशोर लुल्ला, नरेंद्र यरगट्टीकर, वसंत आपटे, नितीन खाडिलकर, जनार्दन लिमये, अरविंद मराठे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)राष्ट्रीय विचारप्रणाली...प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राने त्यांच्या संस्कृतीवर आधारित शिक्षणप्रणाली निर्माण केली. मात्र भारत देश याला अपवाद ठरला आहे. त्यामुळेच आपण निधर्मी झालो आहोत. देशाला गौरवशाली इतिहास असताना देखील दुसऱ्यांचे ते सर्व मार्गदर्शक असते, अशीच आपल्यापैकी कित्येकांची समजूत आहे. यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेतील जे चांगले आहे त्याचा स्वीकार केलाच पाहिजे, असे मत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी सांगितले.