शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शिक्षणाला अध्यात्माची जोड हवी

By admin | Updated: December 16, 2014 00:02 IST

शंकर अभ्यंकर : ‘शिकू आनंदे’ उपक्रमाची सांगलीत सांगता

सांगली : भारत देशाचे मूळ हे अध्यात्म आहे, हे विसरुन कधीही चालणार नाही. साहजिकच आपली शिक्षण प्रणाली ही अध्यात्मावर आधारितच असली पाहिजे. परंतु दुर्दैवाने सध्या तशी परिस्थिती नाही, अशी खंत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली. सांगली शिक्षण संस्था आणि लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिकू आनंदे’ या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आयोजित उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते ‘उद्याचे शिक्षण’ याविषयी बोलत होते. अभ्यंकर म्हणाले की, मानवी जीवनच आनंदी आहे. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बिघडण्यापूर्वी मानवाला जे घडविते, त्याला शिक्षण असे म्हणतात. ज्ञानासारखे दुसरे पवित्र काहीही नाही, असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. पूर्वीची शिक्षण प्रणाली ही कष्टसाध्य होती. आजकाल मात्र त्यात बरीच सुलभता आली आहे. शिक्षण प्रणाली तयार करताना भारतीय परंपरेचा विचार होणे गरजेचे होते. परंतु बहुतांश राज्यकर्त्यांना आणि शिक्षणक्रम तयार करणाऱ्यांना येथील मातीची ओळखच नसल्याने, त्यांनी वेगळी शिक्षण प्रणाली निर्माण केली. यामुळे भारतीय परंपरेतील सर्वच टाकावू आहे, अशी मानसिकता येथील विद्यार्थ्यांत निर्माण झाली. अध्यात्म आणि विज्ञान यांनी हातात हात घालून चालले पाहिजे. सध्याच्या विद्यालयात ‘विद्या’ ही ‘लयाला’ जात असल्याचेच चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मूळच्या अमेरिकेतील बर्सन मॅस्किन यांनी, भारतीय संस्कृती टिकवायची असेल आणि शिक्षणाची समज लवकर यायची असेल, तर प्रत्येकाने मातृभाषेतूनच शिक्षण घेतले पाहिजे असे आवाहन केले. येथील भावे नाट्य मंदिरात प्रकाश पाठक आणि विवेक पोंक्षे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात रमेश पानसे आणि कांचन परुळेकर यांनी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. पाल्यांशी नियमित सुसंवाद कसा साधावा, याविषयीची कौशल्ये उभयतांनी सांगितली. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास किशोर लुल्ला, नरेंद्र यरगट्टीकर, वसंत आपटे, नितीन खाडिलकर, जनार्दन लिमये, अरविंद मराठे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)राष्ट्रीय विचारप्रणाली...प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राने त्यांच्या संस्कृतीवर आधारित शिक्षणप्रणाली निर्माण केली. मात्र भारत देश याला अपवाद ठरला आहे. त्यामुळेच आपण निधर्मी झालो आहोत. देशाला गौरवशाली इतिहास असताना देखील दुसऱ्यांचे ते सर्व मार्गदर्शक असते, अशीच आपल्यापैकी कित्येकांची समजूत आहे. यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेतील जे चांगले आहे त्याचा स्वीकार केलाच पाहिजे, असे मत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी सांगितले.