शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाच्या दराचा पुन्हा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

सांगली : भारतातील खाद्यतेलाचे किरकोळ बाजारातील दर वाढतच असून, सामान्य नागरिक यामुळे हैराण झाला आहे. गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या दरात ...

सांगली : भारतातील खाद्यतेलाचे किरकोळ बाजारातील दर वाढतच असून, सामान्य नागरिक यामुळे हैराण झाला आहे. गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या दरात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे.

कच्च्या मालाचा तुटवडा, आयातीचा वाढता असलेला खर्च व इंधन दरवाढीमुळे खाद्यतेलाचे देशातील दर वाढतच आहेत. भारतातील एकूण खाद्यतेलात ७० टक्के खाद्यतेल हे आयात होते. सध्या मागणीच्या तुलनेत ३० टक्के पुरवठाही घटल्याने त्याचाही दरावर परिणाम होत आहे. गेले वर्षभर खाद्यतेलाच्या किमतीचा आलेख चढताच आहे. सध्याच्या लॉकडाऊन काळातही खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे.

खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी भारताने आयात शुल्क दहा टक्के कमी केले असले तरीही त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. निर्यातदार देशांतील या खाद्यतेलांवरील निर्यात शुल्काचा भार वाढविला आहे. त्यामुळे हे दर लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता दिसत नाही. यापुढेही दरात वाढ होण्याचा अंदाज विक्रेते व्यक्त करीत आहेत. मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिका, चीन आदी देशांकडून भारतात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात केले जात आहे.

चौकट

आयात घटली

फेब्रुवारी २०२१ मध्ये भारताने एकूण ७ लाख ९६ हजार ५६८ टन खाद्यतेलाची आयात केली. फेब्रुवारी २०२० मध्ये ही आयात १० लाख ८९ हजार टन इतकी होती. म्हणजेच आयातीत २७ टक्के घट झाली आहे.

चौकट

वर्षभरात हजार रुपयांनी वाढले दर (प्रती पंधरा लीटर)

तेल एप्रिल २० एप्रिल २१

सूर्यफूल १६०० २६००

सरकी १४०० २४७०

सोयाबीन १४०० २३००

चौकट

असे वाढले दर (रुपये प्रतिकिलो)

तेल मार्च २१ एप्रिल २१

सूर्यफूल १६५ १७५

सोयाबीन १४० १५३

शेंगदाणा १७० १८६

सरकी १४८ १६०

पाम १४० १४९

कोट

खाद्यतेलाच्या दरात एप्रिलमध्येही मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यातील प्रच्ंड कमतरता व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम आहे. पुरवठाही ३० टक्के घटला आहे. सर्व प्रकारच्या तेलांच्या दरावर सध्या परिणाम होत आहे.

- गजेंद्र कुल्लोळी, खाद्यतेल व्यापारी, मिरज