शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

खाद्यतेलाच्या दराचा पुन्हा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

सांगली : भारतातील खाद्यतेलाचे किरकोळ बाजारातील दर वाढतच असून, सामान्य नागरिक यामुळे हैराण झाला आहे. गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या दरात ...

सांगली : भारतातील खाद्यतेलाचे किरकोळ बाजारातील दर वाढतच असून, सामान्य नागरिक यामुळे हैराण झाला आहे. गेल्या महिनाभरात खाद्यतेलाच्या दरात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे.

कच्च्या मालाचा तुटवडा, आयातीचा वाढता असलेला खर्च व इंधन दरवाढीमुळे खाद्यतेलाचे देशातील दर वाढतच आहेत. भारतातील एकूण खाद्यतेलात ७० टक्के खाद्यतेल हे आयात होते. सध्या मागणीच्या तुलनेत ३० टक्के पुरवठाही घटल्याने त्याचाही दरावर परिणाम होत आहे. गेले वर्षभर खाद्यतेलाच्या किमतीचा आलेख चढताच आहे. सध्याच्या लॉकडाऊन काळातही खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे.

खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी भारताने आयात शुल्क दहा टक्के कमी केले असले तरीही त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. निर्यातदार देशांतील या खाद्यतेलांवरील निर्यात शुल्काचा भार वाढविला आहे. त्यामुळे हे दर लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता दिसत नाही. यापुढेही दरात वाढ होण्याचा अंदाज विक्रेते व्यक्त करीत आहेत. मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिका, चीन आदी देशांकडून भारतात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात केले जात आहे.

चौकट

आयात घटली

फेब्रुवारी २०२१ मध्ये भारताने एकूण ७ लाख ९६ हजार ५६८ टन खाद्यतेलाची आयात केली. फेब्रुवारी २०२० मध्ये ही आयात १० लाख ८९ हजार टन इतकी होती. म्हणजेच आयातीत २७ टक्के घट झाली आहे.

चौकट

वर्षभरात हजार रुपयांनी वाढले दर (प्रती पंधरा लीटर)

तेल एप्रिल २० एप्रिल २१

सूर्यफूल १६०० २६००

सरकी १४०० २४७०

सोयाबीन १४०० २३००

चौकट

असे वाढले दर (रुपये प्रतिकिलो)

तेल मार्च २१ एप्रिल २१

सूर्यफूल १६५ १७५

सोयाबीन १४० १५३

शेंगदाणा १७० १८६

सरकी १४८ १६०

पाम १४० १४९

कोट

खाद्यतेलाच्या दरात एप्रिलमध्येही मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यातील प्रच्ंड कमतरता व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा परिणाम आहे. पुरवठाही ३० टक्के घटला आहे. सर्व प्रकारच्या तेलांच्या दरावर सध्या परिणाम होत आहे.

- गजेंद्र कुल्लोळी, खाद्यतेल व्यापारी, मिरज