शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
2
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
3
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
4
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
5
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
6
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
7
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
8
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
9
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
10
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
11
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
12
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
13
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
14
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
15
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
16
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
17
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
18
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
19
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
20
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून

खाद्यतेल झाले स्वस्त, आता खुशाल खा चमचमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST

सांगली : सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का देत महागाईच्या आगीत तेल ओतणाऱ्या खाद्यतेलाच्या दरांत आता घसरण हाेत आहे. गेल्या काही दिवसांत ...

सांगली : सर्वसामान्यांच्या बजेटला धक्का देत महागाईच्या आगीत तेल ओतणाऱ्या खाद्यतेलाच्या दरांत आता घसरण हाेत आहे. गेल्या काही दिवसांत तेलांच्या दरात १२ ते १५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात सुरू असलेली खाद्यतेलाची काटकसरही थांबण्याची चिन्हे आहेत.

गेल्या चार दिवसांत खाद्यतेलांच्या किमतीत १५ टक्के कमी आली आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा बायो फ्यूलमध्ये इतर खाद्यतेल मिसळण्याचे प्रमाण वाढवले जाणार आहे. यात ४६ टक्के रिफाइंड ऑइल मिसळण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मलेशिया आणि इंडोनेशियामध्येही तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे याचा परिणाम भारतीय बाजारात पाहायला मिळत आहे. या सर्वांचा पामतेलाच्या दरावर सकारात्मक परिणाम दिसत आहे. दुसरीकडे गुजराती शेंगदाण्यासह अन्य राज्यांमधून शेंगदाणा मोठ्या प्रमाणावर येत असल्याने शेंगतेलाचे भावही गतीने खाली येत आहेत.

भारत हा खाद्यतेलाचा जगातील आघाडीचा खरेदीदार आहे. देशातील एकूण खाद्यतेलांत ७० टक्के खाद्यतेल हे आयात केलेले असते. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या काळात भारताने एकूण १ कोटी ३२ लाख ८२ हजार ४२७ टन खाद्यतेल आयात केले होते.

चौकट

शेंगदाणा, सूर्यफुलांचे उत्पादन घटले

तेल उत्पादकांच्या मते जिल्ह्यातील शेंगदाणा, सूर्यफुलांचे उत्पादन गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घटले आहे. कच्च्या मालाची उपलब्धता होत नसल्याने तेल उद्योगही बंद पडत आहेत. या उत्पादनांना प्रोत्साहन दिल्यास तेलांचे दर नियंत्रणात येऊ शकतात.

खाद्यतेलांचे किरकोळ बाजारातील भाव रुपये

तेल पूर्वी आता

शेंगतेल १९० १६८

पाम १४० १२५

सूर्यफूल १८५ १७८

सरकी १७० १५०

मोहरी १९० १७०

कोट

एकरी उत्पादकता कमी असल्यामुळे पूर्वीसारखे शेंग व सूर्यफूल उत्पादन घेतले जात नाही. पूर्वी हा शेतीमाल उत्पादित करून घाण्यावर तेल काढून वर्षभर कुटुंबाला पुरेल इतके तेल शेतकऱ्याला मिळत होते. आता शेतकरी तेल विकत घेत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाने बियाणे संशोधनाला वाव द्यावा.

- महेश खराडे, शेतकरी

कोट

वास्तविक आता घाणे परत येत आहेत. केवळ तेलासाठी आवश्यक शेतीमाल उत्पादित करताना शेतकऱ्याचा फायदा होण्याच्या दृष्टीने बियाणे संशोधन करावे. त्यातून उत्पादन वाढून खाद्यतेलाचे दर नियंत्रित राहतील. घाण्यावरील तेल उत्पादनालाही प्रोत्साहन मिळायला हवे, ते आरोग्यदायी आहे.

- बाळासाहेब यादव, शेतकरी, येळावी