शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

बाजार समित्यांचे आर्थिक प्रश्न बिकट-- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:18 IST

इस्लामपूर : बाजार समितीचे अधिकार मर्यादित केल्याने, आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्दे इस्लामपूर बाजार समितीची वार्षिक सभा उत्साहातकृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : बाजार समितीचे अधिकार मर्यादित केल्याने, आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. शेतकºयांची लुबाडणूक टाळण्यासाठी ई-प्लॅटफॉर्मसारखा शाश्वत पर्याय शासन देऊ शकलेले नाही, असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उत्पन्न वाढीसारख्या आव्हानांना तोंड देत कायम अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येथील बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या वार्षिक सभेत आ. जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. सभापती आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते. उपसभापती सुरेश गावडे, पं. स. सभापती सचिन हुलवान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंजारराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.आ. पाटील म्हणाले, उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे हे राज्यातील बाजार समित्यांपुढील मोठे आव्हान आहे. सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांसह हमाल वर्ग अडचणीत आहे. कामगारांचे पगार होणे अवघड बनले आहे. त्यामुळे बाजार समितीने उलाढाल वाढवण्यावर भर द्यावा.आष्टा येथे हळद सौदे सुरु करुन १४ कोटींवर उलाढाल केली आहे. आमदार-खासदारांकडून विविध सुधारणांसाठी निधी मिळत असेल, तर त्याचे स्वागत व्हायला हवे.

सभापती पाटील म्हणाले, गेल्यावर्षी २ लाखांचा, तर यंदा मात्र आम्ही १२ लाखांवर वाढावा घेण्यात यशस्वी ठरलो. आ. जयंत पाटील, माजी आ. विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ताकारी बाजार आवारात सव्वा कोटी रुपये खर्चून पायाभूत सुविधा देत आहोत.जि. प. सदस्य संजीव पाटील यांनी चिकुर्डे येथे जनावरांचा बाजार करण्याची सूचना केली. विजय पवार यांनी बाजार आवारातील रस्त्यांसाठी ७ लाखांचा निधी दिल्याबद्दल खा. राजू शेट्टींच्या अभिनंदनाचा, तर भरत पाटील यांनी बाजार समितीसाठी शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्याबद्दल कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. ते मंजूर करण्यात आले.

यावेळी पवार यांनी, ४० टनी वजन काट्यासाठी खा. शेट्टी यांनी १६ लाख रुपये, तर आमदार मोहनराव कदम यांनी रस्त्यासाठी ५ लाख रुपये देऊनही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सत्ताधाºयांनी मांडला नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.संचालक अल्लाउद्दीन चौगुले यांनी स्वागत केले. सचिव विजय जाधव यांनी विषयपत्रिका, इतिवृत्ताचे वाचन केले. कलगोंडा पाटील यांनी श्रध्दांजलीचाठराव मांडला. यावेळी सुभाष सूर्यवंशी, दिलीपराव पाटील, माणिकराव गायकवाड, शंकरराव पाटील, माणिकराव पाटील, रणजित गायकवाड, सुश्मिता जाधव, संजय पाटील, विजय कुंभार, दिलीपराव देसाई आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सुभाष शिंगटे यांनी आभार मानले.जनावरांचा बाजारयावेळी बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील म्हणाले की, ताकारी बाजार आवारात सव्वा कोटी रुपये खर्चून पायाभूत सुविधा देत आहोत. आष्टा येथील हळद सौद्यांना चांगला प्रतिसाद आहे. चिकुर्डे येथे जनावरांचा बाजार सुरु करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.