शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

आधी कोरोना आता इंधन दरवाढीने रिक्षाचालकांचे मीटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आधीच कोरोनामुळे उपासमारीशी सामना कराव्या लागणाऱ्या जिल्ह्यातील रिक्षाचालकांना आता इंधन दरवाढीचे चटकेही सहन करावे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आधीच कोरोनामुळे उपासमारीशी सामना कराव्या लागणाऱ्या जिल्ह्यातील रिक्षाचालकांना आता इंधन दरवाढीचे चटकेही सहन करावे लागत आहेत. दररोज होणाऱ्या दरवाढीने या चालकासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक रिक्षाचालकांनी हा व्यवसायच बंद करून रोजंदारीवर गेले, तर काहीजण दिवसभर अन्य काम आणि रात्री रिक्षा चालवून कुटुंबाचा खर्च भागवत आहेत.

जिल्ह्यात जवळपास साडेनऊ हजारच्या आसपास रिक्षाचालक आहेत. बहुतांश रिक्षाचालकांचा उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन आहे. आठ ते दहा वर्षी हा व्यवसायही मोठा प्रतिष्ठेचा होता. उत्पन्नही चांगले मिळत होते. पण, वाहनांची वाढत्या संख्येमुळे हा व्यवसायही आता अडचणीत आला आहे. त्यात गेल्या वर्षी कोरोनामुळे सात ते आठ महिने संपूर्ण व्यवसायच बंद होता. लाॅकडाऊननंतर थोडाफार व्यवसाय रुळावर येईल, असे वाटत असतानाच इंधनाचे दर भडकले.

बँकांची थकीत कर्जे, मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या खर्चाचा ताळमेळ घालताना या रिक्षाचालकांची कसरत होत आहे. त्यातून उत्पन्न घटल्याने काही रिक्षाचालकांनी बांधकामावर रोजंदारीने काम पत्करले आहे, तर काहीजण फळ, भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत. काहीजण दिवसभर मिळेल ते काम करून रात्री रिक्षा चालवीत आहेत.

चौकट

दरवाढीचा व्यवसायावर मोठा परिणाम

गेल्या तीन महिन्यांत इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावरही झाला आहे. पूर्वी दिवसभरात तीनशे ते चारशे रुपये मिळत होते. ते आता दोनशे रुपयांच्या घरात आले आहे. त्यामुळे अनेकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत.

चौकट

पैसे उरत नसल्याने करावे लागते इतर काम

कोरोनापूर्वी रिक्षाचालक दिवसभरात तीनशे ते चारशे रुपये मिळत होता; पण आता इंधन दरवाढीने त्याचे कंबरडे मोडले आहे. जवळपास २० टक्के रिक्षाचालकांनी हा व्यवसायच बंद केला आहे. काहीजण भाजीपाला, फळे विक्रीचा व्यवसाय करीत आहेत, तर काही सेंट्रिंगच्या कामावर जात आहेत. काहीजण दिवसभर रोजंदारीवर जाऊन रात्री रिक्षा फिरवत आहेत.

चौकट

कोट

इंधनवाढीचा मोठा फटका रिक्षाचालकांना बसला आहे. आधीच कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. दिवसभरात रिक्षा थांब्यावर थांबून राहावे लागते. त्यानंतर कुठे एखादे भाडे मिळते. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाहही चालत नाही. राज्य शासनाने इतरांना मदत केली; पण रिक्षाचालकांना दमडीही दिली नाही. बँकेकडून तगादा सुरू आहे. आरटीओकडून कारवाई होत आहे. आम्हाला कुणीच वाली नाही. - महादेव पवार, अध्यक्ष रिक्षाचालक संघटना

चौकट

कोट

मी बी.ए., बी.पी.एड.चे शिक्षण घेतले. पण, नोकरी न मिळाल्याने रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. त्यावर आमचे कुटुंब चालते. दिवसभर रिक्षा चालविल्यावर चारशे, पाचशे रुपये मिळतात. त्यातून कर्जाचे हप्ते कुटुंबाचा खर्च भागवावा लागतो. आता इंधनवाढीने उत्पन्नात घट झाली आहे. कुटुंबाचा दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आहे. - सुलेमान शेख, रिक्षाचालक

चौकट

कोट

कोरोनानंतर इंधन दरवाढीचे चटके रिक्षाचालकांना बसत आहेत. त्यात ऑनलाईन परमीट सुरूच असल्याने नव्याने रिक्षाची भर पडत आहे. बँकेकडूनही कर्जाच्या हप्त्याच्या तगादा सुरू आहे. सध्या दिवसभरात दोनशे, तीनशे रुपये मिळविणेही जिकिरीचे झाले आहे. घराचा खर्च भागविताना मुलांच्या शाळेची फीही भरता आलेली नाही. रिक्षाचालकांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. - महेश चौगुले, रिक्षाचालक

चौकट

पेट्रोल, डिझेलचे दर (प्रतिलिटर)

डिसेंबर : पेट्रोल ८९.०३, डिझेल ७७.८४

जानेवारी : पेट्रोल ९०.३५, डिझेल ७९.३४

फेब्रुवारी : पेट्रोल ९२.८७, डिझेल ८२.०८