शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडील रुग्णालयात ड्युटी? नको रे बाबा ! एमबीबीएस डॉक्टरांचा ग्रामीण रुग्णसेवा नाकारण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरेशा संख्येने एमबीबीएस डाॅक्टर्स असले तरी अनेकजण प्रशासकीय कामकाजात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरेशा संख्येने एमबीबीएस डाॅक्टर्स असले तरी अनेकजण प्रशासकीय कामकाजात बुडून गेले आहेत. प्रत्यक्ष आरोग्यसेवेसाठी डॉक्टर मिळत नसल्याचे चित्र आहे. या स्थितीत बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी भरती करून रुग्णसेवा अखंडित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टरांची १२८ पदे आहेत, त्यापैकी १२३ पदांवर डॉक्टर कार्यरत आहेत. पाच जागा रिक्त आहेत. अर्थात, रिक्त पदांचा प्रश्न फार गंभीर नाही. पण उपलब्ध डॉक्टरांना रुग्णसेवेऐवजी अन्य प्रशासकीय कामांसाठीच जुंपले जात आहे. कोरोनाकाळात ही समस्या प्रकर्षाने जाणवली. जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक व महापालिकनेे वारंवार जाहिराती काढल्या, तरीही एमबीबीएस डॉक्टर्स मिळाले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाला २५, महापालिकेला ५ व जिल्हा परिषदेला फक्त १० एमबीबीएस डॉक्टर्स मिळाले. रिक्त जागांवर बीएएमएस डॉक्टर नियुक्त करून रुग्णसेवा अखंडित ठेवावी लागली.

एमबीबीएस डॉक्टरांच्या रिक्त जागांची समस्या ग्रामिण भागातील गंभीर स्वरूपाची ठरली आहे. विशेषत: जत, आटपाडीसारख्या दूरच्या तालुक्यांत कामासाठी डॉक्टर तयार होत नसल्याचा प्रशासनाचा अनुभव आहे.

बॉक्स

पाच रिक्त जागा

जिल्हाभरातील ६२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टरांच्या १२८ जागा आहेत, त्यापैकी पाच जागा रिक्त आहेत. त्याठिकाणी बीएएमएस डॉक्टर्स भरून रुग्णसेवा सुरू ठेवली जात आहे. उर्वरित ठिकाणी डॉक्टर्स असले तरी प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी सगळेच उपलब्ध नसतात. कोरोना काळात प्रशासकीय कामकाजात अनेकजण अडकून पडत आहेत. पंचायत समितीच्या बैठका, तालुकास्तरीय वैद्यकीय आढावा बैठका, ग्रामदक्षता समित्यांच्या बैठका, वेगवेगळी सर्वेक्षणे, लसीकरणाचे नियोजन यातच डॉक्टर्स अडकले आहेत.

बॉक्स

खेडेगावात ड्युटी नको रे बाबा !

- बहुतांश डॉक्टरांचा कल शहरी भागातील सेवेकडे आहे. ग्रामीण भागात ड्युटी नको रे बाबा अशीच त्यांची भूमिका दिसते.

- दूरचा प्रवास, रात्री-अपरात्री रुग्णांचे येणे, चांगल्या राहणीमानासाठी सोयीसुविधांचा अभाव आदी कारणांनी खेडेगावात ड्युटीला डॉक्टर नाके मुरडतात.

- आरोग्य केंद्रात रुग्णसेवेसाठी अनेक प्राथमिक सुविधांचीही वाणवा असते. गंभीरप्रसंगी रुग्ण दगावण्याचा धोका असतो. त्यामुळेही शहरातील सोप्या ड्युटीकडे डॉक्टरांचा कल आहे.

ग्राफ

कोरोनाकाळातील एकूण नियुक्त्या ४०

शहरी भागातील नियुक्त्या ५

हजर झाले ५

ग्रामीण भागातील नियुक्त्या ४५

हजर झाले ३५

कोट

दूरचा प्रवास आणि सोयी-सुविधांचा अभाव

शहरापासून ४० किलोमीटरचा प्रवास करून ड्युटीवर जावे लागते. दिवसभराच्या कामानंतर पुन्हा लांबचा प्रवास करून घरी येतो. यामुळे प्रचंड दमछाक होते. स्वत:साठी वेळ देता येत नाही. ग्रामीण भागात रुग्णवाहिका, सुसज्ज शस्त्रक्रियागृह, तज्ज्ञ मदतनीस, अैाषधांचा पुरेसा साठा याबाबतीतही सतत संघर्ष करावा लागतो. त्यामुळेही ग्रामीण भागातील ड्युटी जोखमीची व कंटाळवाणी ठरते.

- एक डॉक्टर

ग्रामिण भागात आरोग्यसेवेतील राजकीय हस्तक्षेप त्रासदायक ठरतो. लसीसाठी दबाव, रुग्ण दगावल्यास नातेवाइकांकडून होणारा त्रास अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागते. गंभीर प्रसंगी मार्गदर्शनासाठी वरिष्ठ डॉक्टरही उपलब्ध नसतात. शिवाय स्वत:च्या कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळेही गावाकडील ड्युटीकडे अनेकजण पाठ फिरवतात.

- एक डॉक्टर

खेडेगावातील गैरसोयींमुळे डॉक्टर ड्युटीसाठी नाखुश असतात. शहरापासून लांबचा प्रवास हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. शहरी सुखसोयींची सवय झालेले डॉक्टर्स गावातील दूर अंतरावरील ड्युटीकडे पाठ फिरवतात. तरीही कोरोनाकाळात अनेक चांगले डॉक्टर शासकीय सेेवेत आले आहेत.

- डॉ. विनायक पाटील, समन्वयक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान