शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वाळवा-शिराळ्यात मातब्बरांना धक्का

By admin | Updated: February 24, 2017 23:48 IST

स्थानिक नेत्यांचेच वर्चस्व : बागणीत सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा पराभव; येलूरमध्ये महाडिक गट अबाधित, राष्ट्रवादीत दुही

अशोक पाटील ल्ल इस्लामपूरवाळवा-शिराळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री जयंत पाटील, आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे या मातब्बर नेत्यांना धक्का बसला आहे. नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांनी आपापले गड अबाधित ठेवले आहेत. बागणी मतदार संघात सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा पराभव झाला. मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचेच वर्चस्व सिध्द झाले.लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना ऊस उत्पादक आणि काँग्रेससह घटक पक्षांनी ताकद दिल्यानेच ते यशस्वी झाले. याच शेट्टींच्या ताकदीवर आणि शिफारशीवर सदाभाऊ खोत मंत्री झाले. त्याची कबुलीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीपासून खा. शेट्टी आणि खोत यांच्यात धुसफूस सुरु झाली आहे. त्यातच घराणेशाही, मतदारांना पैसे वाटप आणि विनय कोरे यांची भेट याची भर पडल्याने खा. शेट्टी नाराज झाले आहेत. याचा परिणाम बागणी मतदार संघातील मतदानावर झाला आहे.येलूर जिल्हा परिषद मतदार संघावर पहिल्यापासूनच महाडिक गटाने वर्चस्व ठेवले आहे. येथील जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समिती गणाच्या उमेदवारांना निवडून आणण्यात नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांना यश आले आहे. त्यांनी आपला गड अबाधित ठेवला आहे, तर कामेरी मतदार संघात सी. बी. पाटील यांनी यावेळी भूमिका बदलली होती. ते विकास आघाडीत सामील झाले होते. त्यांनी कामेरी जि. प. व कामेरी गणातील आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. परंतु त्यांना ऐतवडे बुद्रुक गणातील उमेदवार निवडून आणता आला नाही. ही जागा राष्ट्रवादीला मिळाली. पेठ गटावरही महाडिक यांचेच राज्य असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. येथील सर्व जबाबदारी सम्राट महाडिक यांनी पेलली होती. साखराळे गणातील जागा राष्ट्रवादीला गेली. वाळव्यातील हुतात्मा गटाचा फॉर्म्युला यावेळीही अबाधित राहिला. यावेळी आघाडीतून लढलेल्या सुषमा नायकवडी यांना चार हजारावर मतांचे अधिक्य मिळाले. पडवळवाडीची आघाडी जागा निवडून आणली असली तरी, वाळवा पंचायत समिती गण राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला.बोरगावमध्ये स्वत: आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु येथे राष्ट्रवादीतील अंतर्गत दुहीचा फटका पुन्हा एकदा बसला. काँग्रेसच्या जितेंद्र पाटील यांनी येथे तिसऱ्यांदा विजयी होतानाच सोबत बोरगाव गणातील विजय खरात यांनाही विजयी केले. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी ताकारी गण अबाधित ठेवण्यात यश मिळवले.खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी जर राष्ट्रवादीविरोधात असलेले स्थानिक नेते आणि घटकपक्ष असतील तरच हे विजयी होऊ शकतात, हेच या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.दोन भाऊंची गट्टी : भाजपची सुट्टी!शिराळ्यात पूर्वी दोन शिवाजीराव (देशमुख व नाईक) एकत्र होते. त्यावेळी मानसिंगराव नाईक यांना प्रत्येक निवडणुकीत पराभव पत्करावा लागत होता. आता दोन शिवाजीरावांत दरी असल्याने सत्यजित देशमुख आणि मानसिंगराव नाईक या दोन भाऊंनी गट्टी करून विधानसभेला मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांच्याविरोधात असलेल्या शिवाजीराव नाईक यांना पराभव पत्करावा लागला होता. आता या निवडणुकीतही दोन भाऊंनी गट्टी करुन आ. नाईक यांच्या भाजपचा धुव्वा उडवला.