शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

वाळवा-शिराळ्यात मातब्बरांना धक्का

By admin | Updated: February 24, 2017 23:48 IST

स्थानिक नेत्यांचेच वर्चस्व : बागणीत सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा पराभव; येलूरमध्ये महाडिक गट अबाधित, राष्ट्रवादीत दुही

अशोक पाटील ल्ल इस्लामपूरवाळवा-शिराळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री जयंत पाटील, आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे या मातब्बर नेत्यांना धक्का बसला आहे. नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांनी आपापले गड अबाधित ठेवले आहेत. बागणी मतदार संघात सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा पराभव झाला. मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचेच वर्चस्व सिध्द झाले.लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना ऊस उत्पादक आणि काँग्रेससह घटक पक्षांनी ताकद दिल्यानेच ते यशस्वी झाले. याच शेट्टींच्या ताकदीवर आणि शिफारशीवर सदाभाऊ खोत मंत्री झाले. त्याची कबुलीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीपासून खा. शेट्टी आणि खोत यांच्यात धुसफूस सुरु झाली आहे. त्यातच घराणेशाही, मतदारांना पैसे वाटप आणि विनय कोरे यांची भेट याची भर पडल्याने खा. शेट्टी नाराज झाले आहेत. याचा परिणाम बागणी मतदार संघातील मतदानावर झाला आहे.येलूर जिल्हा परिषद मतदार संघावर पहिल्यापासूनच महाडिक गटाने वर्चस्व ठेवले आहे. येथील जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समिती गणाच्या उमेदवारांना निवडून आणण्यात नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांना यश आले आहे. त्यांनी आपला गड अबाधित ठेवला आहे, तर कामेरी मतदार संघात सी. बी. पाटील यांनी यावेळी भूमिका बदलली होती. ते विकास आघाडीत सामील झाले होते. त्यांनी कामेरी जि. प. व कामेरी गणातील आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. परंतु त्यांना ऐतवडे बुद्रुक गणातील उमेदवार निवडून आणता आला नाही. ही जागा राष्ट्रवादीला मिळाली. पेठ गटावरही महाडिक यांचेच राज्य असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. येथील सर्व जबाबदारी सम्राट महाडिक यांनी पेलली होती. साखराळे गणातील जागा राष्ट्रवादीला गेली. वाळव्यातील हुतात्मा गटाचा फॉर्म्युला यावेळीही अबाधित राहिला. यावेळी आघाडीतून लढलेल्या सुषमा नायकवडी यांना चार हजारावर मतांचे अधिक्य मिळाले. पडवळवाडीची आघाडी जागा निवडून आणली असली तरी, वाळवा पंचायत समिती गण राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला.बोरगावमध्ये स्वत: आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु येथे राष्ट्रवादीतील अंतर्गत दुहीचा फटका पुन्हा एकदा बसला. काँग्रेसच्या जितेंद्र पाटील यांनी येथे तिसऱ्यांदा विजयी होतानाच सोबत बोरगाव गणातील विजय खरात यांनाही विजयी केले. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी ताकारी गण अबाधित ठेवण्यात यश मिळवले.खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी जर राष्ट्रवादीविरोधात असलेले स्थानिक नेते आणि घटकपक्ष असतील तरच हे विजयी होऊ शकतात, हेच या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.दोन भाऊंची गट्टी : भाजपची सुट्टी!शिराळ्यात पूर्वी दोन शिवाजीराव (देशमुख व नाईक) एकत्र होते. त्यावेळी मानसिंगराव नाईक यांना प्रत्येक निवडणुकीत पराभव पत्करावा लागत होता. आता दोन शिवाजीरावांत दरी असल्याने सत्यजित देशमुख आणि मानसिंगराव नाईक या दोन भाऊंनी गट्टी करून विधानसभेला मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांच्याविरोधात असलेल्या शिवाजीराव नाईक यांना पराभव पत्करावा लागला होता. आता या निवडणुकीतही दोन भाऊंनी गट्टी करुन आ. नाईक यांच्या भाजपचा धुव्वा उडवला.