शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

धुरळा संपला; आता साठमारी सरपंचपदासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा संपल्यानंतर आता सरपंचपदासाठी साठमारी सुरू होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण महिन्याच्या आत काढणार असल्याची घोषणा ...

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा संपल्यानंतर आता सरपंचपदासाठी साठमारी सुरू होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण महिन्याच्या आत काढणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कारभाऱ्यांच्या नजरा आरक्षणाकडे लागल्या आहेत.

सरपंचपदासाठी सट्टाबाजार होत असल्याने तसेच जातीचे बोगस दाखले काढण्याचा प्रकार होत असल्याने आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय शासनाने घेतला. यापूर्वी आरक्षण अगोदरच काढल्याने फक्त सरपंचपदासाठीच ताकद लावली जायची. पॅनेल हातातून निसटले तरी सरपंचपद आपल्याकडेच राहिल्याने अंमल अप्रत्यक्षपणे ताब्यात राहायचा. यावेळी मात्र आरक्षण स्पष्ट नसल्याने सर्वच जागांवर काटाजोड लढती झाल्या. आता नेमके संख्याबळ स्पष्ट झाल्याने सरपंचपदासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत.

आरक्षण निश्चित नसल्याने सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही गोंधळात आहेत. आरक्षणानुसार उमेदवार पॅनेलमध्ये नसल्यास सरपंचपद कमी संख्याबळाच्या विरोधकांकडे जाण्याचेही संकट आहे. त्यामुळे विजयाचा निर्भेळ आनंद कारभाऱ्यांना साजरा करताना सरपंचपदाची धाकधुकही कायम आहे.

काही गावांत अधिकृत पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांनी अन्य उमेदवार पुरस्कृत केले होते. निवडून आल्यानंतर त्यांचा पाठिंबा कोणाला, यावरही संख्याबळ आणखी स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे आगामी महिनाभर आता अपक्षांच्या खेचाखेचीचा खेळ गावोगावी रंगणार आहे.

चौकट

आमच्याकडेच सर्वाधिक ग्रामपंचायती

निकालानंतरच्या प्राथमिक आकडेवारीनुसार महाविकास आघाडी अव्वल स्थानावर आहे; पण शिवसेनेसह सर्वच पक्षांनी आपल्याकडेच सर्वाधिक ग्रामपंचायती असल्याचा दावा केला आहे. सद्य:स्थितीला कॉंग्रेस २३, राष्ट्रवादी २९, भाजप ३२, शिवसेना १३, महाविकास आघाडी ९ व स्थानिक आघाड्या ३७ असे सत्ताबल आहे.

चौकट

अनेक गावांत ‘मुख्यमंत्री गणप्या गावडे’

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींत अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पॅनेलना समसमान जागा मिळाल्याने सत्तेचा लंबक अपक्षांनी धरून ठेवला आहे. सोमवारी (दि. १८) संध्याकाळी निकाल जाहीर होताच नेत्यांनी अपक्षांना पकडण्याचे प्रयत्न केले; पण ‘सरपंचपदाचे आरक्षण निघू दे, मग पाठिंब्याचा निर्णय घेतो’, अशी पक्की राजकीय भूमिका अपक्षांनी घेतली. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीत अपक्ष म्हणजे ऐनवेळी स्वत:च खुर्ची पटकावणारे ‘मुख्यमंत्री गणप्या गावडे’ ठरू शकतात.

कोट

सरपंच कोणाचा, हे आरक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीकडे ग्रामपंचायती किती, यापेक्षा सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादीचेच निवडून आले, हा आमचा मोठा विजय आहे. वाळवा, शिराळा तालुक्यांत प्रत्येकी दोनच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या, अन्यथा आमचे संख्याबळ आणखी वाढले असते. काही तालुक्यांत भाजपचे बडे नेते असतानाही तेथे आम्ही वरचढ ठरलो आहोत.

- अविनाश पाटील, अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस.

कोट

जिल्ह्यात चौतीसहून अधिक ग्रामपंचायतींत शिवसेनेने विजय मिळविला आहे. काही ठिकाणी आम्ही पुरस्कृत केलेले उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक नेत्यांचा दबाव असल्याने भूमिका लगेच जाहीर केलेली नाही. सरपंचाच्या आरक्षणानंतर ते निर्णय स्पष्ट करतील. त्यामुळे आमच्या ग्रामपंचायती आणखी वाढतील, हे निश्चित आहे.

- संजय विभूते, जिल्हाध्यक्ष, शिवसेना.