शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
2
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
3
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
4
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
5
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
6
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
7
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
8
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
9
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
10
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
11
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
12
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
13
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
14
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
15
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
16
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
17
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
18
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
19
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
20
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
Daily Top 2Weekly Top 5

धुरळा संपला; आता साठमारी सरपंचपदासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा संपल्यानंतर आता सरपंचपदासाठी साठमारी सुरू होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण महिन्याच्या आत काढणार असल्याची घोषणा ...

सांगली : ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा संपल्यानंतर आता सरपंचपदासाठी साठमारी सुरू होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण महिन्याच्या आत काढणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कारभाऱ्यांच्या नजरा आरक्षणाकडे लागल्या आहेत.

सरपंचपदासाठी सट्टाबाजार होत असल्याने तसेच जातीचे बोगस दाखले काढण्याचा प्रकार होत असल्याने आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय शासनाने घेतला. यापूर्वी आरक्षण अगोदरच काढल्याने फक्त सरपंचपदासाठीच ताकद लावली जायची. पॅनेल हातातून निसटले तरी सरपंचपद आपल्याकडेच राहिल्याने अंमल अप्रत्यक्षपणे ताब्यात राहायचा. यावेळी मात्र आरक्षण स्पष्ट नसल्याने सर्वच जागांवर काटाजोड लढती झाल्या. आता नेमके संख्याबळ स्पष्ट झाल्याने सरपंचपदासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत.

आरक्षण निश्चित नसल्याने सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही गोंधळात आहेत. आरक्षणानुसार उमेदवार पॅनेलमध्ये नसल्यास सरपंचपद कमी संख्याबळाच्या विरोधकांकडे जाण्याचेही संकट आहे. त्यामुळे विजयाचा निर्भेळ आनंद कारभाऱ्यांना साजरा करताना सरपंचपदाची धाकधुकही कायम आहे.

काही गावांत अधिकृत पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांनी अन्य उमेदवार पुरस्कृत केले होते. निवडून आल्यानंतर त्यांचा पाठिंबा कोणाला, यावरही संख्याबळ आणखी स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे आगामी महिनाभर आता अपक्षांच्या खेचाखेचीचा खेळ गावोगावी रंगणार आहे.

चौकट

आमच्याकडेच सर्वाधिक ग्रामपंचायती

निकालानंतरच्या प्राथमिक आकडेवारीनुसार महाविकास आघाडी अव्वल स्थानावर आहे; पण शिवसेनेसह सर्वच पक्षांनी आपल्याकडेच सर्वाधिक ग्रामपंचायती असल्याचा दावा केला आहे. सद्य:स्थितीला कॉंग्रेस २३, राष्ट्रवादी २९, भाजप ३२, शिवसेना १३, महाविकास आघाडी ९ व स्थानिक आघाड्या ३७ असे सत्ताबल आहे.

चौकट

अनेक गावांत ‘मुख्यमंत्री गणप्या गावडे’

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींत अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पॅनेलना समसमान जागा मिळाल्याने सत्तेचा लंबक अपक्षांनी धरून ठेवला आहे. सोमवारी (दि. १८) संध्याकाळी निकाल जाहीर होताच नेत्यांनी अपक्षांना पकडण्याचे प्रयत्न केले; पण ‘सरपंचपदाचे आरक्षण निघू दे, मग पाठिंब्याचा निर्णय घेतो’, अशी पक्की राजकीय भूमिका अपक्षांनी घेतली. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीत अपक्ष म्हणजे ऐनवेळी स्वत:च खुर्ची पटकावणारे ‘मुख्यमंत्री गणप्या गावडे’ ठरू शकतात.

कोट

सरपंच कोणाचा, हे आरक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीकडे ग्रामपंचायती किती, यापेक्षा सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादीचेच निवडून आले, हा आमचा मोठा विजय आहे. वाळवा, शिराळा तालुक्यांत प्रत्येकी दोनच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या, अन्यथा आमचे संख्याबळ आणखी वाढले असते. काही तालुक्यांत भाजपचे बडे नेते असतानाही तेथे आम्ही वरचढ ठरलो आहोत.

- अविनाश पाटील, अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस.

कोट

जिल्ह्यात चौतीसहून अधिक ग्रामपंचायतींत शिवसेनेने विजय मिळविला आहे. काही ठिकाणी आम्ही पुरस्कृत केलेले उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक नेत्यांचा दबाव असल्याने भूमिका लगेच जाहीर केलेली नाही. सरपंचाच्या आरक्षणानंतर ते निर्णय स्पष्ट करतील. त्यामुळे आमच्या ग्रामपंचायती आणखी वाढतील, हे निश्चित आहे.

- संजय विभूते, जिल्हाध्यक्ष, शिवसेना.