शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

वाजंत्री विकताहेत दुर्वा आणि फुले, तर मंडप व्यावसायिक दबले कर्जाच्या ओझ्याखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST

सांगली : गणरायाच्या आगमनाने अवघ्या भक्तगणांत उत्साहाचे वातावरण आहे, पण उत्सवावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या घरात मात्र चूलही पेटलेली नाही. ...

सांगली : गणरायाच्या आगमनाने अवघ्या भक्तगणांत उत्साहाचे वातावरण आहे, पण उत्सवावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या घरात मात्र चूलही पेटलेली नाही. बॅंडपथकात काम करणाऱ्या वाजंत्र्यांवर उत्सवकाळात दुर्वा आणि फुले विकून पोट भरण्याची वेळ आली आहे.

मंडप व्यावसायिकांसाठी गणेशोत्सव आणि नवरात्र हे सुगीचे दिवस ठरतात. गेल्या महिन्यात शासनाने निर्णय घेताना १०० चौरस फुटांच्या मंडपाला परवानगी दिली होती, त्यामुळे व्यावसायिकांना धंद्याची अपेक्षा होती. प्रत्यक्ष उत्सवापूर्वी मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मंडपांना परवानगी नाकारली. उधार-उसनवार करून साहित्य खरेदी केलेले व्यावसायिक आता कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. मंडळांनी दोन-चार टेबल, रोषणाईच्या काही माळा आणि थोडे रंगीत कापड इतकीच मागणी केली. ऐन उत्सवाच्या व व्यवसायाच्या काळात मंडप व्यावसायिकांना हातावर हात बांधून बसावे लागले आहे.

चौकट

सुपाऱ्यांचे पैसे परत नेले

बॅंड पथकांची अवस्थाही अशीच आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्याने मिरवणुकांना परवानगी मिळेल, अशी पथकांना अपेक्षा होती. महिन्याभरापासून त्यांचा सरावही सुरू होता. नदीकाठी ढोलांचे आवाज घुमत होते. पण या साऱ्यावरच प्रतिबंध आल्याने उत्साहावर विरजण पडले आहे. मंडळांनी दिलेल्या सुपाऱ्यांचे पैसे परत नेले आहेत.

कोट

गेली दीड वर्षे व्यवसाय पूर्णत: ठप्प आहे. महापालिका क्षेत्रात ६०० हून अधिक मंडप व्यावसायिक आहेत. मोठे व्यावसायिक कसेबसे तग धरून असले तरी, छोटे व्यावसायिक मात्र उद्ध्वस्त झाले आहेत. गणेशोत्सवात चांगल्या व्यवसायाची अपेक्षा होती, त्यासाठी मोठी गुंतवणूकही केली होती. पण शासनाने ऐनवेळेस मंडपांना परवानगी नाकारल्याने मोठा फटका बसला आहे.

- संतोष माळी, मंडप, संचालक, लायटिंग व डेकोरेशन असोसिएशन

बॅंड पथकांना लग्नाच्या हंगामात रुपयाचाही व्यवसाय करता आला नाही. गणेशोत्सवात चांगल्या व्यवसायाची अपेक्षा होती. मंडळांनी आगाऊ पैसेही दिले होते, पण मिरवणुकांवर बंदी आणल्याने सगळाच धंदा बंद झाला आहे. आमचे वाजंत्री सेंट्रिंग किंवा वीटभट्ट्यांवर कामाला जात आहेत. काहींनी उत्सवात फुले, दुर्वा फळे विकून चार पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला.

- नंदकुमार जाधव, मोरया ब्रास बॅण्ड कंपनी, हरिपूर.