शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पट शेती उत्पन्न म्हणजे सरकारचे दिवास्वप्न : पृथ्वीराज चव्हाण 

By admin | Updated: April 26, 2017 13:56 IST

शेतीचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करून दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची घोषणा म्हणजे एक दिवास्वप्न आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 26 - शेतीचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करून दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची घोषणा म्हणजे एक दिवास्वप्न आहे. सरकारमधील अर्थतज्ज्ञांनी या गोष्टी कशा शक्य आहेत, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे संघर्ष यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना केली.
 
ते म्हणाले की, निती आयोगाने प्रत्येकाला घर, पुरेशी वीज, वातानुकुलीत यंत्र मिळण्याचेही स्वप्न दाखविले आहे. अनेक लोकांना दोनवेळच्या पोटाची चिंता असताना त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुखसोयी कशा मिळणार, याचे स्पष्टीकरण अर्थतज्ज्ञांनी द्यावे. 
 
पाच वर्षात शेतीमधील उत्पन्नात दुप्पट वाढीचेही आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले आहे. वास्तविक आघाडी सरकारच्या कालावधीत असलेला शेती उत्पन्नाचा टक्का भाजप सरकारच्या कालावधीत घटलेला आहे. त्यामुळे उत्पन्न दुप्पट कसे होणार. दरवर्षी १५ ते १६ टक्के शेतीमालांसाठी दरवाढ द्यायला हवी. प्रतिकूल परिस्थितीतून शेतक-यांना बाहेर पडण्याचे मार्ग दिले पाहिजेत. तरच उत्पन्न वाढू शकते. सध्याची सरकारची धोरणे पाहिली, तर ती नेमकी उलटी आहेत. त्यामुळे उत्पन्नवाढीचे हे दिवास्वप्नच ठरणार आहे, असे ते म्हणाले.
 
आगामी काळातही शेतीला प्रतिकूल सरकारी धोरणाचा मोठा फटका बसण्याचीच चिन्हे दिसत आहेत. शेतकरी दिवसेंदिवस अधिक अडचणीत येत आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याऐवजी सरकार केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहे, असे ते म्हणाले. 
 
नारायण राणे यांच्याबद्दल चव्हाण म्हणाले की, ते संघर्ष यात्रेत नसले तरी कॉंग्रेसमध्येच आहेत. नुकतीच त्यांनी राहुल गांधींचीही भेट घेतली होती. ते नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे.