शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दुप्पट शेती उत्पन्न म्हणजे सरकारचे दिवास्वप्न : पृथ्वीराज चव्हाण 

By admin | Updated: April 26, 2017 13:56 IST

शेतीचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करून दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची घोषणा म्हणजे एक दिवास्वप्न आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 26 - शेतीचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करून दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची घोषणा म्हणजे एक दिवास्वप्न आहे. सरकारमधील अर्थतज्ज्ञांनी या गोष्टी कशा शक्य आहेत, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे संघर्ष यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना केली.
 
ते म्हणाले की, निती आयोगाने प्रत्येकाला घर, पुरेशी वीज, वातानुकुलीत यंत्र मिळण्याचेही स्वप्न दाखविले आहे. अनेक लोकांना दोनवेळच्या पोटाची चिंता असताना त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुखसोयी कशा मिळणार, याचे स्पष्टीकरण अर्थतज्ज्ञांनी द्यावे. 
 
पाच वर्षात शेतीमधील उत्पन्नात दुप्पट वाढीचेही आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले आहे. वास्तविक आघाडी सरकारच्या कालावधीत असलेला शेती उत्पन्नाचा टक्का भाजप सरकारच्या कालावधीत घटलेला आहे. त्यामुळे उत्पन्न दुप्पट कसे होणार. दरवर्षी १५ ते १६ टक्के शेतीमालांसाठी दरवाढ द्यायला हवी. प्रतिकूल परिस्थितीतून शेतक-यांना बाहेर पडण्याचे मार्ग दिले पाहिजेत. तरच उत्पन्न वाढू शकते. सध्याची सरकारची धोरणे पाहिली, तर ती नेमकी उलटी आहेत. त्यामुळे उत्पन्नवाढीचे हे दिवास्वप्नच ठरणार आहे, असे ते म्हणाले.
 
आगामी काळातही शेतीला प्रतिकूल सरकारी धोरणाचा मोठा फटका बसण्याचीच चिन्हे दिसत आहेत. शेतकरी दिवसेंदिवस अधिक अडचणीत येत आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याऐवजी सरकार केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहे, असे ते म्हणाले. 
 
नारायण राणे यांच्याबद्दल चव्हाण म्हणाले की, ते संघर्ष यात्रेत नसले तरी कॉंग्रेसमध्येच आहेत. नुकतीच त्यांनी राहुल गांधींचीही भेट घेतली होती. ते नाराज असल्याची चर्चा चुकीची आहे.