शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

शिराळा तालुक्यात वृक्षताेडीमुळे वनसंपदा धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:25 IST

विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या ग्रामीण आणि दुर्गम शिराळा ...

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या ग्रामीण आणि दुर्गम शिराळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. प्लॅनेट अर्थ फाउंडेशनने यासंदर्भात अभ्यास करून शेतकऱ्यांची ही भीती अनाठायी असल्याचे सांगत त्यांना वृक्षताेडीपासुन परावृत्त करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

शेतीच्या बांधावर असणारी मोठी झाडे तोडल्यानंतर वानरांचा त्रास कमी होईल, या विचाराने बऱ्याच शेतकऱ्यांनी बांधावर तसेच ओढ्याशेजारील मोठी झाडे तोडली आहेत. परिणामी वानरांचे शेतीवरील हल्ले कमी होण्याऐवजी वाढले आहेत. वानरांना उपलब्ध होणारे नैसर्गिक अन्न कमी झाल्यामुळे तसेच त्यांचे नैसर्गिक अधिवास संपल्यामुळे वानरे जास्त प्रमाणात शेतीकडे आकर्षित होत आहेत.

परिणामी गावात असलेली सर्व झाडे नष्ट होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्या झाडावरील नैसर्गिक जैवविविधतादेखील नष्ट होत आहे. या वृक्षतोडीमध्ये प्रामुख्याने कडुलिंब, जांभूळ, करंज, निलगिरी, आंबा, वड, पिंपळ, उंबर, काटेसावर, आदी वृक्षांच्या तोडीचे प्रमाण जास्त आहे. याबाबत अभ्यास करून शिराळा तालुक्यात प्लॅनेट अर्थ फाैंडेशनने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती चालविली आहे.

चौकट

पर्यावरणाचा समताेल राखण्यास मदत करा

जगभरात तापमान वाढीमुळे होणारी भीषण परिस्थिती सुधारण्यासाठी आपला खारीचा वाटा म्हणून शेतकऱ्यांनी आपले बांधावरील झाड वाचवावे. शेतकऱ्यांनी व लाकूड तोड करणाऱ्या कंत्राटदारांनी तालुक्यात होणारी वृक्षतोड थांबवावी. पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत करावी, असे आवाहन प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे उपाध्यक्ष आणि पर्यावरण अभ्यासक प्रणव महाजन यांनी केले आहे.