शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे पाणीटंचाई

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

आटपाडीत स्थिती गंभीर : जुन्या मोटारी जळाल्या; नव्या योजनेला वीज कंपनीचे ‘कनेक्शन’च नाही

अविनाश बाड -आटपाडी --विजेच्या कमी-जास्त दाबामुळे आटपाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या मोटारी जळाल्या आहेत. आधीच ८ ते १० दिवसांतून एकदा मिळणाऱ्या पाण्यामुळे आटपाडीकर वैतागले असताना, वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे येथील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. भारत निर्माण योजनेतून तब्बल १६ कोटी ६ लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्पासह पाणी पुरवठ्यासाठी सज्ज असलेल्या योजनेला जुन्या पाणी योजनेच्या थकबाकीचे कारण पुढे करून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन जोडण्यास नकार दिला आहे.सध्या आटपाडी तलावाखालील विहिरीत तलावातील पाणी सोडून ८ ते १० दिवसांतून एकदा अत्यंत गढूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे. जुनाट यंत्रणेमुळे नागरिकांसह कारभाऱ्यांचेही पाण्याने हाल सुरू केले असताना, शुक्रवारी तारा तुटल्या, त्यावेळी २० अश्वशक्तीची ग्रामपंचायतीची पहिली मोटार जळाली. त्यानंतर दुसरी आणि शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास विजेच्या कमी-जास्त दाबामुळे तिसरी मोटारही जळाली. २० अश्वशक्तीच्या तिन्ही मोटारी २० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या आटपाडीत दुरुस्त होईनात, म्हणून कारभाऱ्यांनी सांगली गाठली. त्यामुळे आटपाडीकरांवर पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आणली आहे.वास्तविक या मोटारी दुरुस्त झाल्या तरी आटपाडीची पाणीटंचाई दूर होऊ शकत नाही. त्यासाठी भारत निर्माण योजनेतून केलेली नवी योजना तात्काळ सुरू होण्याची गरज आहे. ही योजना सध्या आटपाडीला जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी पुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. आटपाडी तलावातून विहिरीसह जॅकवेल व त्यातील ४० अश्वशक्तीचे दोन पंप आणि जलशुद्धीकरण प्रकल्पातील ३५ अश्वशक्तीचे दोन पंप बसवून दोन महिने झाले. ९० आणि ५१ अश्वशक्तीचा वीजपुरवठा करण्यासाठी तिथे दोन डीपी बसवून १० दिवस झाले. आता फक्त वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या डीपीना विजेचे कनेक्शन जोडणे बाकी आहे. तलावातील पाणी सध्या पिण्यासाठी आरक्षित केल्याने आवश्यक तेवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. आटपाडी हे तालुक्याचे गाव. ग्रामस्थ पाणी-पाणी करीत असताना, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या पाणी पुरवठा योजनेची थकित वीज बाकी वसुलीची ही नामी संधी समजली आहे. आटपाडी ग्रामपंचायतीकडे ९७ लाख वीज बिल थकित असल्याचे वीज कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, तर एवढे बिल ग्रामपंचायत प्रशासनाला मान्य नाही. वीज कंपनीची वीज बिलापोटीची जी काही वसुली असेल, ती ग्रामपंचायतीने द्यायलाच हवी. पण ३२ हजार ७८० एवढी लोकसंख्या असलेल्या आटपाडीतील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल करून वीज बिलाची वसुली परकीय इंग्रजांनी सुद्धा केली नसती. लोकांना गढूळ पाणी पिल्यामुळे पोटाचे आजार वाढत असताना, ते पाणीही आता वीज कंपनीच्या वसुलीबहाद्दर अधिकाऱ्यांमुळे मिळणे मुश्कील झाले आहे. सरकारने केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला वीज कनेक्शन न जोडणाऱ्या वीज कंपनीच्या बेफिकीर अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.शुद्ध पाण्याची प्रतीक्षा आटपाडीतील पाणी टंचाईला वैतागून येथील काही सामाजिक संघटनांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आटपाडी पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन आंदोलकांना शांत केले. सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाऊन इथल्या लोकांमध्ये कमालीची सोशिकता आली आहे. त्यामुळे जीवघेणी पाणीटंचाई निर्माण होऊनही नागरिक पावसाच्या अपेक्षेप्रमाणे ही भीषण पाणी टंचाई नष्ट होण्याची वाट मोठ्या आशेने पाहत आहेत.