शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे पाणीटंचाई

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

आटपाडीत स्थिती गंभीर : जुन्या मोटारी जळाल्या; नव्या योजनेला वीज कंपनीचे ‘कनेक्शन’च नाही

अविनाश बाड -आटपाडी --विजेच्या कमी-जास्त दाबामुळे आटपाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या मोटारी जळाल्या आहेत. आधीच ८ ते १० दिवसांतून एकदा मिळणाऱ्या पाण्यामुळे आटपाडीकर वैतागले असताना, वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे येथील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. भारत निर्माण योजनेतून तब्बल १६ कोटी ६ लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्पासह पाणी पुरवठ्यासाठी सज्ज असलेल्या योजनेला जुन्या पाणी योजनेच्या थकबाकीचे कारण पुढे करून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन जोडण्यास नकार दिला आहे.सध्या आटपाडी तलावाखालील विहिरीत तलावातील पाणी सोडून ८ ते १० दिवसांतून एकदा अत्यंत गढूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे. जुनाट यंत्रणेमुळे नागरिकांसह कारभाऱ्यांचेही पाण्याने हाल सुरू केले असताना, शुक्रवारी तारा तुटल्या, त्यावेळी २० अश्वशक्तीची ग्रामपंचायतीची पहिली मोटार जळाली. त्यानंतर दुसरी आणि शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास विजेच्या कमी-जास्त दाबामुळे तिसरी मोटारही जळाली. २० अश्वशक्तीच्या तिन्ही मोटारी २० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या आटपाडीत दुरुस्त होईनात, म्हणून कारभाऱ्यांनी सांगली गाठली. त्यामुळे आटपाडीकरांवर पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आणली आहे.वास्तविक या मोटारी दुरुस्त झाल्या तरी आटपाडीची पाणीटंचाई दूर होऊ शकत नाही. त्यासाठी भारत निर्माण योजनेतून केलेली नवी योजना तात्काळ सुरू होण्याची गरज आहे. ही योजना सध्या आटपाडीला जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी पुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. आटपाडी तलावातून विहिरीसह जॅकवेल व त्यातील ४० अश्वशक्तीचे दोन पंप आणि जलशुद्धीकरण प्रकल्पातील ३५ अश्वशक्तीचे दोन पंप बसवून दोन महिने झाले. ९० आणि ५१ अश्वशक्तीचा वीजपुरवठा करण्यासाठी तिथे दोन डीपी बसवून १० दिवस झाले. आता फक्त वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या डीपीना विजेचे कनेक्शन जोडणे बाकी आहे. तलावातील पाणी सध्या पिण्यासाठी आरक्षित केल्याने आवश्यक तेवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. आटपाडी हे तालुक्याचे गाव. ग्रामस्थ पाणी-पाणी करीत असताना, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या पाणी पुरवठा योजनेची थकित वीज बाकी वसुलीची ही नामी संधी समजली आहे. आटपाडी ग्रामपंचायतीकडे ९७ लाख वीज बिल थकित असल्याचे वीज कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, तर एवढे बिल ग्रामपंचायत प्रशासनाला मान्य नाही. वीज कंपनीची वीज बिलापोटीची जी काही वसुली असेल, ती ग्रामपंचायतीने द्यायलाच हवी. पण ३२ हजार ७८० एवढी लोकसंख्या असलेल्या आटपाडीतील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल करून वीज बिलाची वसुली परकीय इंग्रजांनी सुद्धा केली नसती. लोकांना गढूळ पाणी पिल्यामुळे पोटाचे आजार वाढत असताना, ते पाणीही आता वीज कंपनीच्या वसुलीबहाद्दर अधिकाऱ्यांमुळे मिळणे मुश्कील झाले आहे. सरकारने केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला वीज कनेक्शन न जोडणाऱ्या वीज कंपनीच्या बेफिकीर अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.शुद्ध पाण्याची प्रतीक्षा आटपाडीतील पाणी टंचाईला वैतागून येथील काही सामाजिक संघटनांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आटपाडी पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन आंदोलकांना शांत केले. सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाऊन इथल्या लोकांमध्ये कमालीची सोशिकता आली आहे. त्यामुळे जीवघेणी पाणीटंचाई निर्माण होऊनही नागरिक पावसाच्या अपेक्षेप्रमाणे ही भीषण पाणी टंचाई नष्ट होण्याची वाट मोठ्या आशेने पाहत आहेत.