शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे पाणीटंचाई

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

आटपाडीत स्थिती गंभीर : जुन्या मोटारी जळाल्या; नव्या योजनेला वीज कंपनीचे ‘कनेक्शन’च नाही

अविनाश बाड -आटपाडी --विजेच्या कमी-जास्त दाबामुळे आटपाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या मोटारी जळाल्या आहेत. आधीच ८ ते १० दिवसांतून एकदा मिळणाऱ्या पाण्यामुळे आटपाडीकर वैतागले असताना, वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे येथील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. भारत निर्माण योजनेतून तब्बल १६ कोटी ६ लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्पासह पाणी पुरवठ्यासाठी सज्ज असलेल्या योजनेला जुन्या पाणी योजनेच्या थकबाकीचे कारण पुढे करून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन जोडण्यास नकार दिला आहे.सध्या आटपाडी तलावाखालील विहिरीत तलावातील पाणी सोडून ८ ते १० दिवसांतून एकदा अत्यंत गढूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे. जुनाट यंत्रणेमुळे नागरिकांसह कारभाऱ्यांचेही पाण्याने हाल सुरू केले असताना, शुक्रवारी तारा तुटल्या, त्यावेळी २० अश्वशक्तीची ग्रामपंचायतीची पहिली मोटार जळाली. त्यानंतर दुसरी आणि शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास विजेच्या कमी-जास्त दाबामुळे तिसरी मोटारही जळाली. २० अश्वशक्तीच्या तिन्ही मोटारी २० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या आटपाडीत दुरुस्त होईनात, म्हणून कारभाऱ्यांनी सांगली गाठली. त्यामुळे आटपाडीकरांवर पुन्हा पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आणली आहे.वास्तविक या मोटारी दुरुस्त झाल्या तरी आटपाडीची पाणीटंचाई दूर होऊ शकत नाही. त्यासाठी भारत निर्माण योजनेतून केलेली नवी योजना तात्काळ सुरू होण्याची गरज आहे. ही योजना सध्या आटपाडीला जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी पुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. आटपाडी तलावातून विहिरीसह जॅकवेल व त्यातील ४० अश्वशक्तीचे दोन पंप आणि जलशुद्धीकरण प्रकल्पातील ३५ अश्वशक्तीचे दोन पंप बसवून दोन महिने झाले. ९० आणि ५१ अश्वशक्तीचा वीजपुरवठा करण्यासाठी तिथे दोन डीपी बसवून १० दिवस झाले. आता फक्त वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या डीपीना विजेचे कनेक्शन जोडणे बाकी आहे. तलावातील पाणी सध्या पिण्यासाठी आरक्षित केल्याने आवश्यक तेवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. आटपाडी हे तालुक्याचे गाव. ग्रामस्थ पाणी-पाणी करीत असताना, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या पाणी पुरवठा योजनेची थकित वीज बाकी वसुलीची ही नामी संधी समजली आहे. आटपाडी ग्रामपंचायतीकडे ९७ लाख वीज बिल थकित असल्याचे वीज कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, तर एवढे बिल ग्रामपंचायत प्रशासनाला मान्य नाही. वीज कंपनीची वीज बिलापोटीची जी काही वसुली असेल, ती ग्रामपंचायतीने द्यायलाच हवी. पण ३२ हजार ७८० एवढी लोकसंख्या असलेल्या आटपाडीतील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल करून वीज बिलाची वसुली परकीय इंग्रजांनी सुद्धा केली नसती. लोकांना गढूळ पाणी पिल्यामुळे पोटाचे आजार वाढत असताना, ते पाणीही आता वीज कंपनीच्या वसुलीबहाद्दर अधिकाऱ्यांमुळे मिळणे मुश्कील झाले आहे. सरकारने केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला वीज कनेक्शन न जोडणाऱ्या वीज कंपनीच्या बेफिकीर अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.शुद्ध पाण्याची प्रतीक्षा आटपाडीतील पाणी टंचाईला वैतागून येथील काही सामाजिक संघटनांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आटपाडी पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन आंदोलकांना शांत केले. सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाऊन इथल्या लोकांमध्ये कमालीची सोशिकता आली आहे. त्यामुळे जीवघेणी पाणीटंचाई निर्माण होऊनही नागरिक पावसाच्या अपेक्षेप्रमाणे ही भीषण पाणी टंचाई नष्ट होण्याची वाट मोठ्या आशेने पाहत आहेत.