शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे दीड हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पाण्यात

By admin | Updated: October 29, 2014 00:14 IST

उत्पन्नातही घट : वाळव्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका

आष्टा : पावसामुळे वाळवा तालुक्यातील दीड हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकामध्ये पाणी साचून राहिले आहे. यामुळे येथील सर्व सोयाबीन भिजल्यामुळे कुजले आहे. मळणी सुरु असलेले सोयाबीनही आष्टा परिसरात भिजले आहे.वाळवा तालुक्यात १५ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली होती. पैकी यातील १० टक्के क्षेत्रावर उशिरा पेरणी केल्याने या क्षेत्रावरील सोयाबीन अवेळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाऊस व खराब बियाणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. वाळवा तालुक्यात जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात सोयाबीनची लागवड करण्यात आली. काहींनी उसातही सोयाबीन टोकणी केली. ऊसक्षेत्रामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात घट होत आहे. मागील काही वर्षांत सोयाबीन काढणीवेळी पाऊस झाल्याने प्रतिवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दिवाळीमुळे यातील बहुतांशी सोयाबीन काढण्यात आले आहे. प्रतिवर्षी एकरी २० ते २५ पोती सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यास १० ते १२ पोती सोयाबीन निघाले आहे, तर एकरी २ ते ३ पोतीही उत्पादन मिळाले आहे. निकृष्ट बियाणे व नियमित पाऊस यामुळे ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी उशिरा सोयाबीन लागवड केल्याने या शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसातच अडकले आहे. ते भिजल्यामुळे क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांचा फटका बसणार आहे. (वार्ताहर)गोटखिंडीत सोयाबीनचे उत्पादन घटलेआष्टा : शेतकऱ्यांसाठी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचा उत्पादन उतारा यावर्षी कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पिकासंबंधी नाराजी पसरली आहे.गोटखिंडी परिसरात बावची, भडकंबे परिसरात आर्थिक उत्पन्न देणारे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात असते. मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनचे आगाऊ टोकण होत असते. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढते, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या मध्यंतरी सतत पडलेला पाऊस, त्यामुळे तणांचा वाढता प्रादुर्भाव, वातावरणाच्या फेरबदलामुळे तांबेरासारख्या रोगांचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसत होता. या सर्वांचा परिणाम म्हणून बहुतांशी शेतकऱ्यांचे उत्पादन पूर्वी कोलमडले आहे. बहुतांशी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी झालेला खर्चसुद्धा उत्पादनामधून मिळलेला नाही. दीपावली सणासाठी सोयाबीन विक्रीतून आलेला पैसा वापरायचा, असे शेतकऱ्यांचे नियोजन असते. परंतु घटलेल्या उत्पादनामुळे दीपावली सणासाठी हात आखडता घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ऊस बिलाचा दीपावली हप्ताही नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)