शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पावसामुळे दीड हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पाण्यात

By admin | Updated: October 29, 2014 00:14 IST

उत्पन्नातही घट : वाळव्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका

आष्टा : पावसामुळे वाळवा तालुक्यातील दीड हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकामध्ये पाणी साचून राहिले आहे. यामुळे येथील सर्व सोयाबीन भिजल्यामुळे कुजले आहे. मळणी सुरु असलेले सोयाबीनही आष्टा परिसरात भिजले आहे.वाळवा तालुक्यात १५ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली होती. पैकी यातील १० टक्के क्षेत्रावर उशिरा पेरणी केल्याने या क्षेत्रावरील सोयाबीन अवेळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाऊस व खराब बियाणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. वाळवा तालुक्यात जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात सोयाबीनची लागवड करण्यात आली. काहींनी उसातही सोयाबीन टोकणी केली. ऊसक्षेत्रामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात घट होत आहे. मागील काही वर्षांत सोयाबीन काढणीवेळी पाऊस झाल्याने प्रतिवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दिवाळीमुळे यातील बहुतांशी सोयाबीन काढण्यात आले आहे. प्रतिवर्षी एकरी २० ते २५ पोती सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यास १० ते १२ पोती सोयाबीन निघाले आहे, तर एकरी २ ते ३ पोतीही उत्पादन मिळाले आहे. निकृष्ट बियाणे व नियमित पाऊस यामुळे ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी उशिरा सोयाबीन लागवड केल्याने या शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसातच अडकले आहे. ते भिजल्यामुळे क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांचा फटका बसणार आहे. (वार्ताहर)गोटखिंडीत सोयाबीनचे उत्पादन घटलेआष्टा : शेतकऱ्यांसाठी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचा उत्पादन उतारा यावर्षी कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पिकासंबंधी नाराजी पसरली आहे.गोटखिंडी परिसरात बावची, भडकंबे परिसरात आर्थिक उत्पन्न देणारे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात असते. मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनचे आगाऊ टोकण होत असते. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढते, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या मध्यंतरी सतत पडलेला पाऊस, त्यामुळे तणांचा वाढता प्रादुर्भाव, वातावरणाच्या फेरबदलामुळे तांबेरासारख्या रोगांचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसत होता. या सर्वांचा परिणाम म्हणून बहुतांशी शेतकऱ्यांचे उत्पादन पूर्वी कोलमडले आहे. बहुतांशी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी झालेला खर्चसुद्धा उत्पादनामधून मिळलेला नाही. दीपावली सणासाठी सोयाबीन विक्रीतून आलेला पैसा वापरायचा, असे शेतकऱ्यांचे नियोजन असते. परंतु घटलेल्या उत्पादनामुळे दीपावली सणासाठी हात आखडता घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ऊस बिलाचा दीपावली हप्ताही नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)